शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आतापर्यंत ९६ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 06:00 IST

जिल्ह्यात सरासरी १३३० मिलीमीटर पाऊस बरसतो, असे गृहीत धरले जाते. मागील वर्षी म्हणजेच २०१८ च्या मान्सून सत्रात १ जून ते १० आॅक्टोबर पर्यंत सरासरी १००७ मिलीमीटर पाऊस बरसला होता. मात्र यावर्षी याच तारखेपर्यंत एकुण १२८२ मिलीमीटर पाऊस बरसला आहे. यात सर्वाधिक पावसाची नोंद पवनी तालुक्यात करण्यात आली आहे.

ठळक मुद्देचांगल्या उत्पादनाची आशा : धानपिकावर कीडींचा प्रादूर्भाव कायम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दरवर्षी हुलकावणी देणाऱ्या वरुण राजाने मात्र यावर्षी जिल्ह्यावर कृपादृष्टी ठेवली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या मान्सून सत्रात आतापर्यंत ९६ टक्के पाऊस बरसला आहे. विशेष म्हणजे धानाला भरपूर पाण्याची गरज असल्यामुळे धानाचे चांगले उत्पादन होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.जिल्ह्यात सरासरी १३३० मिलीमीटर पाऊस बरसतो, असे गृहीत धरले जाते. मागील वर्षी म्हणजेच २०१८ च्या मान्सून सत्रात १ जून ते १० आॅक्टोबर पर्यंत सरासरी १००७ मिलीमीटर पाऊस बरसला होता. मात्र यावर्षी याच तारखेपर्यंत एकुण १२८२ मिलीमीटर पाऊस बरसला आहे. यात सर्वाधिक पावसाची नोंद पवनी तालुक्यात करण्यात आली आहे.तालुकानिहाय बरसलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार भंडारा तालुक्यात ११२१ मिलीमीटर, मोहाडी तालुक्यात १०७६.७ मिलीमीटर, तुमसर तालुक्यात १०४६.५ मिलीमीटर, पवनी तालुक्यात १५४५.९ मिलीमीटर, साकोली तालुक्यात १२०० मिलीमीटर, लाखांदूर तालुक्यात १५०७ तर लाखनी तालुक्यात १४७६ मिलीमीटर पाऊस बरसल्याची नोंद करण्यात आली आहे. या सर्वांची एकुण सरासरी १२८२.१ मिलीमीटर अशी नोंद करण्यात आली आहे.यावर्षी दमदार पावसामुळे जिल्ह्याची जीवनदायीनी नदी समजल्या जाणाऱ्या वैनगंगेला दोन वेळा पूर आला. विशेष म्हणजे मध्यप्रदेश व वैनगंगेच्या नदीखोऱ्यात मुसळधार पावसामुळे धरणाची दारे उघडण्यात आली होती. परिणामी जिल्ह्यातील नदीकाठावरील ८२ गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला होता. अतिवृष्टीमुळे जीर्ण इमारतीही कोसळल्याची घटना घडली. तर मोठ्या प्रमाणात घर तथा जनावरांचे गोठेही कोसळल्याची घटना घडल्या होत्या. विशेष म्हणजे या पुरात आठ जणांना जीव गमवावा लागला होता.किडीचे व्यवस्थापन आवश्यकजिल्ह्यात दमदार पाऊस बरसल्याने धानपिकाचे चांगले उत्पादन होईल अशी आशा शेतकरी बाळगून आहेत. मात्र गत १५ दिवसांपासून धानपिकांवर किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. परिणामी या किडीमुळे धानाचे उत्पादन घटणार तर नाही ना अशी भीती सुद्धा व्यक्त केली जात आहे. तुडतुडा या रोगाचे प्रमाण जास्त प्रमाणात असून शेतकऱ्यांना वेळीच मार्गदर्शन करून या किडीवर योग्य व्यवस्थापन व नियंत्रण आणणे अतीआवश्यक झाले आहे. हलक्या धान कापणीचा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यातच पावसाने उसंत घेतल्याने किडीवर नियंत्रण करणे शक्य होऊ शकते. मात्र कृषी विभागामार्फत सबसीडीवर शेतकºयांना औषधी उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे झाले आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांची स्थिती नसतानाही कर्ज घेऊन महागडी औषध फवारणी करण्याचे संकट बळावले आहे. दुसरीकडे काही तालुक्यात कृषी अधिकाºयांनी बांध्यावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचेही मोहीम हाती घेतली आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती