शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्रशासन म्हणते, नुकसान शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 22:32 IST

रविवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यात उघड्यावर ठेवलेल्या धानासह कठाण धान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असताना जिल्हा प्रशासन मात्र, नुकसान निरंक असल्याचे म्हणत आहे.

ठळक मुद्देफटका वादळी वाऱ्याचा : उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार

इंद्रपाल कटकवार ।आॅनलाईन लोकमतभंडारा : रविवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यात उघड्यावर ठेवलेल्या धानासह कठाण धान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असताना जिल्हा प्रशासन मात्र, नुकसान निरंक असल्याचे म्हणत आहे.गहू पिकासह भाजीपाला पिकांची नासाडी झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. दुसरीकडे राज्याच्या कृषी मंत्र्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. यात जिल्ह्यातील सातही तालुक्यातील महसूल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवार दुपारपर्यंतच जिल्हा मुख्यालयाला अवकाळी पावसामुळे कुठलेही नुकसान झाले नाही, असा संदेश पाठविला. ‘हॉश-पॉश’ घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मारक ठरणारा असू शकतो. प्रत्यक्षात झालेल्या नुकसानीचे मौका पंचनामे करण्याची गरज आहे, परंतू तसे झालेले नाही. यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने उन्हाळी धानपीक घेऊ नये असा फतवा काढला होता, तरीही बहुतांश हेक्टरमध्ये उन्हाळी भाताची लागवड करण्यात आलेली आहे. दुसरीकडे रबी हंगामात ४७ हजार ४०२ हेक्टर क्षेत्रात रबी पिकाची पेरणी करण्यात आली आहे. वादळी वाºयासह पावसाचा मार या पिकांना बसला असताना काही तासांच्या पाहणीतच नुकसान शुन्य कसे, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. रबी पिकांतर्गत गहू यासह कडधान्य अंतर्गत हरभरा, लाख, लाखोळी, पोपट, वाटाणा, उडीद, मुग, मसूर, चवळी, मोट व अन्य धान्याचा समावेश आहे.सातही तालुक्यातून प्राप्त माहितीनुसार वादळी वाºयासह बरसलेल्या पावसामुळे कुठलेही नुकसान झालेले नाही.-डॉ. सुजाता गंधेउपजिल्हाधिकारी (महसूल), भंडारा