शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पोटगी देऊनही न्यायालयाच्या निर्णयाची अवहेलना

By admin | Updated: June 11, 2014 23:12 IST

कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात महिलेला कुटुंबियांकडून मारहाण केल्याची राजश्री वाहने यांची तक्रार खोटी आहे. खोटे आरोप लावून आई, मावशी व माझ्यासह कुटुंबियांविरुद्ध खोट्या तक्रारी करुन अडकवण्याचा

भंडारा : कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात महिलेला कुटुंबियांकडून मारहाण केल्याची राजश्री वाहने यांची तक्रार खोटी आहे. खोटे आरोप लावून आई, मावशी व माझ्यासह कुटुंबियांविरुद्ध खोट्या तक्रारी करुन अडकवण्याचा प्रयत्न आहे. गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे सहकार्य घेऊन धमकावण्याचा प्रकार असल्याची तक्रार संदीप वाहाणे यांनी केली आहे.संदीप व राजश्री यांचा प्रेमविवाह २०१२ मध्ये झाला होता. पत्नीच्या संशयी वृत्तीमुळे नेहमी भांडण व्हायचे. छोट्याशा कारणावरुन होणाऱ्या प्रकरणात राजश्रीने मला व माझ्या कुटुंबियांच्या विरोधात खोट्या तक्रारी केल्या. कौटुंबिक हिंसाचार २००५ व महाराष्ट्र अंधश्रद्धा प्रथा २०१३ नुसार खोट्या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वारंवार होणाऱ्या भांडणामुळे व संशय वृत्तीमुळे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. माहिती समुपदेशन केंद्रात झालेल्या समोपदेश प्रक्रियेत दोघांनी एकत्र ठेवणे धोक्याचे आहे असे सांगितले. त्यानंतर ते २२ मे २०१३ पासून वेगळे राहत आहेत. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार दरमहा २००० रुपये व नागपूर येथे भाड्याने घर करुन दिले आहे. त्यानुसार तिने तिथे न राहता ५ एप्रिल २०१४ रोजी संदीप वाहाने यांची आई पौर्णिमा वाहने यांच्या घरात बळजबरीने प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर आई व मावशी यांना त्रास देऊन त्यांच्याविरुद्ध खोट्या तक्रारी पोलिसात दिल्या. सदर घर आईचे असून त्यात असलेले सर्व साहित्य तिच्या मालकीचे आहे. आईला घरात बळजबरीने प्रवेश करुन त्रास देत असल्यामुळे ६ मे २०१४ रोजी तिच्या जाचाला कंटाळून आई व मावशीने घर सोडले. घर सोडल्यानंतर त्यांचे सामान जुन्या घरी असल्यामुळे आईने ३१ मे २०१४ रोजी सामान आणण्याकरीता गेल्यावर शुभांगीने भांडण करुन खोट्या तक्रारी केल्या. भंडारा व नागपूर येथील गुंडांनी गावातील जिल्हा परिषद सदस्य दिलीप उके यांना धमकाविले. शेजारी राहत असलेले माझे मावशी यांच्याघरी जाऊन मारण्याची धमकी दिली. यावरुन ते सर्व गुंड मला व माझ्या कुटुंबियांना संपवण्याच्या बेतात आले होते. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठे जीवित हानीचे प्रकरण टळले. या प्रकरणात दोषीवर कारवाई करण्याची मागणी संदीप वाहने यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)