शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
4
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
5
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
6
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
7
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
8
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
9
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
10
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
11
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
12
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
13
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
14
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
15
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
16
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
17
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
18
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
19
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
20
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."

परिसंवादात सखींच्या प्रश्नांची उकल

By admin | Updated: June 28, 2016 00:41 IST

लोकमत सखी मंचतर्फे येथील मंगलम् सभागृहात परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

‘टॉक शो’ला उत्स्फूर्त प्रतिसाद : तज्ज्ञांचे विविध विषयांवर मार्गदर्शनभंडारा : लोकमत सखी मंचतर्फे येथील मंगलम् सभागृहात परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील सखी, युवती व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमात विविध विषयांवर तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.जया व्यास प्रमुख वक्ता कुमुदिनी कडव, डॉ.राधिका कोतवाल व तुमसर सखी विभाग प्रतिनिधी रितू पशिने यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.आरोग्यपूर्ण आहार विषयावर डॉ.राधिका कोतवाल यांनी सखींना मार्गदर्शन करताना सांगितले की, पोषक आहार नियमित सेवन करून त्यांची वेळ पाळली पाहिजे. कमीत कमी दोन तासांच्या अंतराने आहार घ्यायला हवा. मुलांना त्यांच्या आवडीचे पदार्थ देताना त्यामध्ये पोषक तत्वांचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल याचा विचार करावा. तसेच मुलांना शाळेत जाण्याच्या आधी दूध व ड्राय फ्रुट्स देणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांच्यात स्टॅमिना टिकून राहील व अभ्यासात लक्ष लागेल. सगळ्यांनी दिवसातून कोणतेही एक तरी फळ नक्कीच खायला पाहिजे. आरोग्यपूर्ण सकस आहार घेतल्यास दैनंदिन जीवनात कोणताही तास उद्भवणार नाही. उलट असलेले त्रास नाहिसे होतील. अ‍ॅसीडीटी, बीपी, चक्कर येणे यासारख्या आजारांवर नियंत्रण ठेवता येईल व निरोगी सुदृढ जीवन जगता येईल. नाते माय लेकीचे या विषयावर कुमुदिनी कडव यांनी सखींना मोलाचे मार्गदर्शन केले. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. आईची महती सांगताना आई व मुलीचे नाते किती एकरुप असते. मोठी बहिण, मैत्रीण आणि वेळ आल्यास आईची मुलगी पण होऊन जाते. पुढे बोलले आई जेवढे मुलीवर विश्वास करते तेवढेच मुलींनी आईवर विश्वास ठेवून कोणतीही गोष्ट मग ती भावनिक, शारीरिक, सामाजिक असो लपवू नये. आईच खऱ्या अर्थाने मुलीला समजवून योग्य वळण देते व मार्गदर्शन देते. कुमारिका अवस्थेतील मुलींना साध्या शब्दात कडव यांनी समस्यांची उकल करून दिली.कार्यक्रमात उपस्थित सखींनी त्यांना पडलेले आहार विषयक प्रश्न डॉ.कोतवाल तर मुलींच्या संबंधित प्रश्न कुमुदिनी कडव यांना विचारले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.जया व्यास यांनी देखील उपस्थितांना आपल्या मुलांबरोबर कसे वागावे यांचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा संयोजक ललीत घाटबांधे तर आभार सीमा नंदनवार यांनी मानले. सुहासिनी अल्लडवार, कल्पना डांगरे, मंगला डहाके, मंदा पडोळे, रेखा गिऱ्हेपुंजे, संध्या रामटेके, मंगला क्षीरसागर, मनिषा रक्षिये, प्रतिभा खोब्रागडे, सोनाली तिडके, अल्का खराबे, शालीनी सूर्यवंशी, श्वेता वाडीभस्मे, कांता बांते, वैशाली झाडे, वंदना दंडारे, किरण भावसार, स्नेहा वरकडे व दिगांबर बारापात्रे यांनी सहकार्य केले. (मंच प्रतिनिधी)