शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

मच्छीमार समाजबांधवांमध्ये असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 22:49 IST

मच्छीमार समाजाच्या विकासाचे नाव पुढे करीत शासनाने एक शासन निर्णय निर्गमित केला. मात्र हा निर्णय मच्छीमार समाजाच्या विकासासाठी की, अधोगतीसाठी असा सवाल संघर्ष वाहिनीचे दिनानाथ वाघमारे यांनी उपस्थित केला. या शासन निर्णयाविरुद्ध समाजात असंतोष पसरल्याचे साकोली येथे झालेल्या सभेतून दिसून आले.

ठळक मुद्देसाकोली येथे सभा : शासन निर्णय समाजाच्या विकासासाठी की अधोगतीसाठी?

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मच्छीमार समाजाच्या विकासाचे नाव पुढे करीत शासनाने एक शासन निर्णय निर्गमित केला. मात्र हा निर्णय मच्छीमार समाजाच्या विकासासाठी की, अधोगतीसाठी असा सवाल संघर्ष वाहिनीचे दिनानाथ वाघमारे यांनी उपस्थित केला. या शासन निर्णयाविरुद्ध समाजात असंतोष पसरल्याचे साकोली येथे झालेल्या सभेतून दिसून आले.भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील मच्छीमार संस्थांचे अध्यक्ष व सचिवांची सभा संघर्ष वाहिनीतर्फे रविवारी साकोली येथे घेण्यात आली. सभेत राज्य सरकारच्या मत्स्य विभागाद्वारे २२ फेब्रुवारी रोजी निर्गमित शासन निर्णयावर चर्चा करण्यात आली. या सभेत दिनानाथ वाघमारे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी साकोली येथे पाटबंधारे विभागाद्वारे निर्मित तलाव, जलाशयांची क्षमता शून्य ते पाचशे हेक्टरपर्यंत आहे. त्या तलावांचा ठेका निशुल्क राहील, अशी घोषणा केली. त्यामुळे मच्छीमारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. परंतु शासन निर्णयाचे वाचन करून त्यातील बारीकसारीक गोष्टींवर विचार केले असता या शासन निर्णयाप्रमाणे शून्य ते पाचशे हेक्टर पर्यंतची ठेका रक्कम शून्य राहील, तर पाचशे ते एक हजार हेक्टर पर्यंतच्या जलशयासाठी सहाशे रुपये प्रति हेक्टर ठेका रक्कम व एक हजारावरील जलाशयासाठी प्रति हेक्टर नवशे रुपये प्रति हेक्टर ठेका रक्कम भरावी लागेल, असे सांगण्यात आले.महाराष्ट्रातील एकूण २५ हजार १०७ तलावापैकी पाटबंधारे विभागाद्वारे निर्मित २ हजार ५७९ तलावांना या शासन निर्णयाचा फायदा होवू शकेल. मात्र उरलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या मालकीच्या तलावासाठी लागु होणार नाही. राज्यातील २५ हजार १०७ तलावांपैकी पूर्व विदभार्तील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा या सहा जिल्ह्यात २० हजार १४९ तलाव असून त्यातील ९७ टक्के माजी मालगुजारी तलावासाठी या निर्णयाचा लाभ होणार नाही, असे सांगितले.३० जून २०१७ च्या शासन निर्णयाप्रमाणे प्रति हेक्टरी १८०० रुपये ठेका रक्कम, जुन्या निर्णयाप्रमाणे प्रति हेक्टरी ठेका ३०० रुपये रक्कम जाहीर केल्यावर याचा संघर्ष वाहिनीने पूर्व विदर्भातील ६३ तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. तसेच भंडारा-गोंदिया येथे ‘दे धक्का’ आंदोलन करण्यात आले हाते. हे लक्षात घेवून सरकारने तलाव निशुल्क देण्याची घोषणा केली. परंतु ठेका रक्कम माफ करून प्रति हेक्टरी ५ हजार रुपये मत्स्य बीजची रक्कम जिल्हा मत्स्य आयुक्तांकड़े जमा करण्याचे सांगितले आहे. म्हणजे एकीकडे तलाव ठेका रक्कम माफीची घोषणा करायची दूसरीकड़े प्रति हेक्टरी पाच हजार रुपये जमा करण्याचे सांगणे, हे मच्छिमारांच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखे आहे, असे दिनानाथ वाघमारे यांनी सांगितले.या अन्यायाच्या विरोधात सरकारच्या विरोधात पूर्व विदभार्तील ६ जिल्ह्यात पुन्हा ‘दे धक्का’ ची पुनरावृत्ती करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. यावेळी संघर्ष वाहिनीचे विनोद मेश्राम, उमराव मांढरे, यशवंत दीघोरे, मनीराम मौजे, हौसलाल वलथरे, यादवराव सोनवाने, गणराज नान्हे, राजकुमार मोहनकर, देवीलाल केवट, राजू दिघोरे, घनश्याम नान्हे, रामचंद्र वलथरे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.