शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
2
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
3
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
4
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
5
सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
6
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
7
भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
8
'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज
9
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
10
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
11
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
12
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा
13
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
14
बीडची बिहारच्या दिशेनं वाटचाल, माजलगावात बिलाच्या कारणावरून ढाबा मालकाची हत्या
15
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
16
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
17
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
18
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
19
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
20
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?

बावनथडी प्रकल्पातून ७० दलघमी पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 05:00 IST

महाराष्ट्र-मध्यप्रदेशाच्या सीमेवर असलेल्या आंतरराज्यीय प्रकल्प शेतकºयांसाठी वरदान ठरणारा आहे. यंदा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुबलक पाऊस झाला. त्यामुळे हा प्रकल्प तब्बल आठ वर्षानंतर ९५ टक्के भरला आहे. यापुर्वी या प्रकल्पातून पऱ्हे वाचविण्यासाठी २५ दिवस पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. आगामी उन्हाळी पिकांसाठीही या प्रकल्पातून शेतकऱ्यांना पाणी मिळणार असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली आहे.

ठळक मुद्देप्रकल्पात विक्रमी ९५ टक्के जलसाठा, दोनही राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी होतोय लाभ

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : यंदा झालेल्या मुबलक पावसाने आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्प तुडूंब भरले असून सद्यस्थिती या प्रकल्पात विक्रमी ९५ टक्के जलसाठा आहे. आतापर्यंत या प्रकत्पातून ७० दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. याचा फायदा महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशासाठी शेतकऱ्यांना सिंचनासाठी होत आहे.महाराष्ट्र-मध्यप्रदेशाच्या सीमेवर असलेल्या आंतरराज्यीय प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा आहे. यंदा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुबलक पाऊस झाला. त्यामुळे हा प्रकल्प तब्बल आठ वर्षानंतर ९५ टक्के भरला आहे. यापुर्वी या प्रकल्पातून पऱ्हे वाचविण्यासाठी २५ दिवस पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. आगामी उन्हाळी पिकांसाठीही या प्रकल्पातून शेतकऱ्यांना पाणी मिळणार असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली आहे. आतापर्यंत या प्रकल्पातून ७० दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा झाला आहे.प्रकल्पाचे अधिकारी पाणी विसर्गादरम्यान व मुख्य कालवा व इतर माईनरवर लक्ष ठेवून आहे. तुमसर व मोहाडी तालुक्यातील सर्व मायनर सध्या सुरू आहे. पुढील आदेशापर्यंत पाण्याचा विसर्ग सुरू राहणार आहे. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा हा प्रकल्प ऑगस्ट महिन्यात मात्र कर्दनकाळ ठरला होता. महापुराने नदीतीरावरील अनेक गावे आणि शेती जलमय झाली होती. शेतकऱ्यांचे यात मोठे नुकसान झाले आहे.दोनही राज्यांसाठी पाण्याचा विसर्गबावनथडी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात येणाऱ्या महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील शेतकºयांसाठी पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हा प्रकल्प दोनही राज्यांसाठी वरदान असून तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील शेतकºयांना याचा मोठा फायदा होत आहे. आतापर्यंत या प्रकल्पातून ७० दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले असून सर्व मायनरने पाणी सिंचनाकरीता देण्यात येत असल्याची माहिती बावनथडी प्रकल्पाचे अभियंता आर.आर. बडोले यांनी दिली आहे. यंदा हा प्रकल्प तुडूंब भरल्याने उन्हाळी धान पिकालाही त्याचा फायदा होणार आहे. केवळ कालव्यांची डागडुजी आणि दुरूस्ती करण्याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. पूर्ण क्षमतेने सिंचनासाठी पाणी सोडल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चितच भर पडणार आहे. लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्पIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प