शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

बावनथडी प्रकल्पातून ७० दलघमी पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 05:00 IST

महाराष्ट्र-मध्यप्रदेशाच्या सीमेवर असलेल्या आंतरराज्यीय प्रकल्प शेतकºयांसाठी वरदान ठरणारा आहे. यंदा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुबलक पाऊस झाला. त्यामुळे हा प्रकल्प तब्बल आठ वर्षानंतर ९५ टक्के भरला आहे. यापुर्वी या प्रकल्पातून पऱ्हे वाचविण्यासाठी २५ दिवस पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. आगामी उन्हाळी पिकांसाठीही या प्रकल्पातून शेतकऱ्यांना पाणी मिळणार असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली आहे.

ठळक मुद्देप्रकल्पात विक्रमी ९५ टक्के जलसाठा, दोनही राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी होतोय लाभ

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : यंदा झालेल्या मुबलक पावसाने आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्प तुडूंब भरले असून सद्यस्थिती या प्रकल्पात विक्रमी ९५ टक्के जलसाठा आहे. आतापर्यंत या प्रकत्पातून ७० दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. याचा फायदा महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशासाठी शेतकऱ्यांना सिंचनासाठी होत आहे.महाराष्ट्र-मध्यप्रदेशाच्या सीमेवर असलेल्या आंतरराज्यीय प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा आहे. यंदा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुबलक पाऊस झाला. त्यामुळे हा प्रकल्प तब्बल आठ वर्षानंतर ९५ टक्के भरला आहे. यापुर्वी या प्रकल्पातून पऱ्हे वाचविण्यासाठी २५ दिवस पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. आगामी उन्हाळी पिकांसाठीही या प्रकल्पातून शेतकऱ्यांना पाणी मिळणार असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली आहे. आतापर्यंत या प्रकल्पातून ७० दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा झाला आहे.प्रकल्पाचे अधिकारी पाणी विसर्गादरम्यान व मुख्य कालवा व इतर माईनरवर लक्ष ठेवून आहे. तुमसर व मोहाडी तालुक्यातील सर्व मायनर सध्या सुरू आहे. पुढील आदेशापर्यंत पाण्याचा विसर्ग सुरू राहणार आहे. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा हा प्रकल्प ऑगस्ट महिन्यात मात्र कर्दनकाळ ठरला होता. महापुराने नदीतीरावरील अनेक गावे आणि शेती जलमय झाली होती. शेतकऱ्यांचे यात मोठे नुकसान झाले आहे.दोनही राज्यांसाठी पाण्याचा विसर्गबावनथडी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात येणाऱ्या महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील शेतकºयांसाठी पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हा प्रकल्प दोनही राज्यांसाठी वरदान असून तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील शेतकºयांना याचा मोठा फायदा होत आहे. आतापर्यंत या प्रकल्पातून ७० दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले असून सर्व मायनरने पाणी सिंचनाकरीता देण्यात येत असल्याची माहिती बावनथडी प्रकल्पाचे अभियंता आर.आर. बडोले यांनी दिली आहे. यंदा हा प्रकल्प तुडूंब भरल्याने उन्हाळी धान पिकालाही त्याचा फायदा होणार आहे. केवळ कालव्यांची डागडुजी आणि दुरूस्ती करण्याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. पूर्ण क्षमतेने सिंचनासाठी पाणी सोडल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चितच भर पडणार आहे. लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्पIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प