शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

बावनथडी प्रकल्पातून ७० दलघमी पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 05:00 IST

महाराष्ट्र-मध्यप्रदेशाच्या सीमेवर असलेल्या आंतरराज्यीय प्रकल्प शेतकºयांसाठी वरदान ठरणारा आहे. यंदा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुबलक पाऊस झाला. त्यामुळे हा प्रकल्प तब्बल आठ वर्षानंतर ९५ टक्के भरला आहे. यापुर्वी या प्रकल्पातून पऱ्हे वाचविण्यासाठी २५ दिवस पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. आगामी उन्हाळी पिकांसाठीही या प्रकल्पातून शेतकऱ्यांना पाणी मिळणार असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली आहे.

ठळक मुद्देप्रकल्पात विक्रमी ९५ टक्के जलसाठा, दोनही राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी होतोय लाभ

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : यंदा झालेल्या मुबलक पावसाने आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्प तुडूंब भरले असून सद्यस्थिती या प्रकल्पात विक्रमी ९५ टक्के जलसाठा आहे. आतापर्यंत या प्रकत्पातून ७० दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. याचा फायदा महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशासाठी शेतकऱ्यांना सिंचनासाठी होत आहे.महाराष्ट्र-मध्यप्रदेशाच्या सीमेवर असलेल्या आंतरराज्यीय प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा आहे. यंदा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुबलक पाऊस झाला. त्यामुळे हा प्रकल्प तब्बल आठ वर्षानंतर ९५ टक्के भरला आहे. यापुर्वी या प्रकल्पातून पऱ्हे वाचविण्यासाठी २५ दिवस पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. आगामी उन्हाळी पिकांसाठीही या प्रकल्पातून शेतकऱ्यांना पाणी मिळणार असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली आहे. आतापर्यंत या प्रकल्पातून ७० दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा झाला आहे.प्रकल्पाचे अधिकारी पाणी विसर्गादरम्यान व मुख्य कालवा व इतर माईनरवर लक्ष ठेवून आहे. तुमसर व मोहाडी तालुक्यातील सर्व मायनर सध्या सुरू आहे. पुढील आदेशापर्यंत पाण्याचा विसर्ग सुरू राहणार आहे. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा हा प्रकल्प ऑगस्ट महिन्यात मात्र कर्दनकाळ ठरला होता. महापुराने नदीतीरावरील अनेक गावे आणि शेती जलमय झाली होती. शेतकऱ्यांचे यात मोठे नुकसान झाले आहे.दोनही राज्यांसाठी पाण्याचा विसर्गबावनथडी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात येणाऱ्या महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील शेतकºयांसाठी पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हा प्रकल्प दोनही राज्यांसाठी वरदान असून तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील शेतकºयांना याचा मोठा फायदा होत आहे. आतापर्यंत या प्रकल्पातून ७० दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले असून सर्व मायनरने पाणी सिंचनाकरीता देण्यात येत असल्याची माहिती बावनथडी प्रकल्पाचे अभियंता आर.आर. बडोले यांनी दिली आहे. यंदा हा प्रकल्प तुडूंब भरल्याने उन्हाळी धान पिकालाही त्याचा फायदा होणार आहे. केवळ कालव्यांची डागडुजी आणि दुरूस्ती करण्याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. पूर्ण क्षमतेने सिंचनासाठी पाणी सोडल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चितच भर पडणार आहे. लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्पIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प