शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

आदिवासींमधून धनगरांना आरक्षण सहन करणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 13:40 IST

आदिवासींच्या जनआक्रोश मोर्चाची जिल्हा कचेरीवर धडक : राज्यपालांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने सोमवारला दुपारच्या सुमारास भंडारा शहरातील मिस्कीन टैंक गार्डन येथून मोर्चा काढण्यात आला.

काही गैर आदिवासी लोकप्रतिनिधी धनगर समाजाला अनुसूचित जमातींच्या सूचीत घुसविण्याचा असंवैधानिक प्रयत्न करीत आहेत. भाजपा, शिंदे सरकार त्यांना खतपाणी घालीत आहेत. धनगर व धनगड है दोन्ही शब्द अनुसूचित जमातीच्या सूचीत नाहीत, त्यामुळे धनगरांना आदिवासींचे आरक्षण देण्यात येऊ नये. परंतु, तसे कटकारस्थान विद्यमान सरकारकडून होत असल्याने भाजपा शिंदे सरकारच्या लोकप्रतिनिधींना गावबंदी घाला, निवडणुकीत त्यांची जागा दाखवा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चातून आदिवासी पुढान्यांनी केले. 

जिल्हाधिकारी चौकात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या मोर्चाचे नेतृत्व आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष विनोद वट्टी यांनी केले. मोर्चाचे समापन झाल्यानंतर विश्रामगृहात शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली व मागण्यांचे निवेदन सोपविले. 

सभेच्या मंचावर विनोद वट्टी, बिसन सयाम, जगदीश मडावी, डॉ. वामन शेडमाके, दुर्गाप्रसाद परतेकी, जगन उईके, बी. डी. खांडवाये, हरीभाऊ येळणे, केशव भलावी, कुंदा कुंभरे, पं. स. सदस्य अर्चना इळपाते, सोपचंद सिरसाम, लक्ष्मीकांत सलामे, कांचन वरठे, अनिल कोडापे, एच. एस. मडावी, भोला उईके, अर्चना न्यायमूर्ती, स्मिता सिडाम, प्रमेश मरस्कोल्हे, पंकज पंथधरे, परमेश वलके आदी उपस्थित होते. 

याप्रसंगी जयसेवाच्या घोषणांनी परिसर दणाणला होता. आदिवासी बांधवांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करावा, या संकल्पाचा पुनरुच्चार करण्यात आला. मोर्चाचे संचालन प्रमेश मरस्कोल्हे यांनी केले तर आभार केशव भलावी यांनी मानले. 

महिलांची उपस्थिती लक्षणीय सोमवारला जिल्हाधिकारी कार्या- लयावर काढण्यात आलेल्या मोर्चात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो आदिवासी समाजबांधव सहभागी झाले होते. यात पुरुषांच्या संख्येपेक्षा महिलांची संख्या अधिक होती. तरुष्ण व बालगोपालसुद्धा आई- वडिलांसोबत उपस्थित असल्याचे दिसून आले. हातात फलक घेऊन आणि खांद्यावर पिवळे दुपट्टे घालून आदिवासी बांधवही सहभागी होते.

प्रमुख मागण्या धनगर व इतर कोणत्याही जातीला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात येऊ नये, आदिवासींसाठी विशेष पदभरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी, पेसा क्षेत्रातील १७ संवर्ग पदभरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात वाची, आदिवासी वसतिगृहातील भोजन डीबीटी योजना बंद करून पूर्वीप्रमाणे मेस व्यवस्था सुरू करावी, विदर्भातील गोंड राजे यांचे गडकिल्ले संरक्षित करून सौंदर्यो- करण करावे, या मागण्यांचा समावेश आहे.

 

टॅग्स :bhandara-acभंडारा