शेतकऱ्यांना फायदा : शिवसेनेचा रास्ता रोको, राजेंद्र पटले यांचा पुढाकारतुमसर : शिवसेनेच्या आंदोलनानंतर अखेर शेतकऱ्यांना बावनथडी सिंचन प्रकल्पाचे पाणी मिळाले आहे. यासाठी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पटले यांनी पुढाकार घेत ना. विजय शिवतारे यांना या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. विशेष म्हणजे सात दिवसांच्या प्रयत्नाचे फलीत शेतकऱ्यांच्या धानाला सिंचन प्राप्त होऊन झाले. तुमसर तालुक्यातील शेतकरी उन्हाळी धानाची लागवड करतात. परंतू सिंचनाअभावीे शेतकऱ्यांचे टेंशन बळावले होते. बावनथडी प्रकल्पाचे पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी अनेकदा मागणी केली. वारंवार सांगुनही समस्या सुटत नसल्याने सरतेशेवटी शिवसेनेने या प्रकरणात उडी घेतली. अधिकाऱ्यांना तब्बल तीन तास घेराव घातल्यानंतर चार दिवसात पाणी मिळण्याचे आशवासन मिळाले. यातही याची दखल ना. विजय शिवतारे यांना घ्यावी लागली. यादरम्यान शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे डोळे उघडले. आंदोलनादरम्यान धरणाचे पाणी सोडण्यात यावे, या मागणीला घेवून शेकडो शेतकरी जमले आहे. जेव्हापर्यंत धानाला पाणी मिळत नाही तो पर्यंत धरण स्थळाहून हलणार नाही. अशी भूमिका घेतली. ना. शिवतारे यांनी जलसंपदा खात्याचे सुर्वे यांना भम्रणध्वनीवर संपर्क करून याबाबत पाऊले उचलण्याची सुचना केली. त्यांनी पुढील कारवाईसाठी जलसंपदा खात्याचे अधीक्षक अभियंता गवई यांना सांगितले. सरतेशेवटी शिवसेनेच्या आंदोलनाचे फलीत झाले. धरणाचे पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले. इंजि. पटले यांया नेतृत्वातील लढ्याला सात दिवसांनी यश लाभले, हे येथे विशेष. सकाळीच अधिक्षक अभियंता गवई यांनी धरणातून पाणी सोडत असल्याचे भ्रमणध्वनीहून कळविले. शेवटच्या टप्प्यात असलेल्या धानाला पाण्याची नितांत आवश्यकता होती. धान वाचवण्यासाठी पाणी मिळवून देणे गरजेचे होते. पटले यांनी धरणातील पाणी मिळवून देण्यासाठी सतत आठवडाभर संघर्ष केला. अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे भर उन्हात दोनदा आंदोलन करावे लागले लागले. ना. शिवतारे यांंच्या हस्तक्षेप व शिवसेनेच्या पुढाकाराने शेतकऱ्यांच्या धानाला सात दिवसांनी का असेना पाणी मिळाले आहे. धरणातील पाणी सोडण्यासाठी खासदार अनिल देसाई यांचेही सहकार्य लाभले. (शहर प्रतिनिधी)
धानाला मिळाले सिंचन
By admin | Updated: May 1, 2017 00:28 IST