शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मतभेदामुळे रखडला गावाचा विकास

By admin | Updated: October 8, 2014 23:22 IST

पवनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पालोरा येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या आपसी मतभेदामुळे गावाचा विकास रखडला आहे. गावकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. गावातील

पालोरा (चौ.) : पवनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पालोरा येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या आपसी मतभेदामुळे गावाचा विकास रखडला आहे. गावकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. गावातील नाल्या घाणीने तुडूंब आहेत. लक्षावधी रुपये खर्च करून विकत घेतलेले सौरउर्जेचे दिवे अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे शोभेची वास्तू ठरत आहेत. येथील सरपंच संगीता गिऱ्हेपुंजे या मनाप्रमाणे खर्च दाखवीत असल्यामुळे ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.येथील सरपंचाच्या मनमर्जी कारभाराने सारेच त्रस्त झाले आहेत. सरपंच, उपसरपंच एका बाजूला तर सात सदस्य विरुद्ध बाजूने असल्यामुळे बिल पास करण्यात प्रशासकीय कामे करण्यात सरपंचाची गोची होत आहे. येथे महिला सरपंच असली तरी मात्र त्यांचे पतिदेव कारभार सांभाळीत असल्याचा आरोप आहे. उपसरपंच दिलीप धारगावे हे दे ्नधक्का प्रमाणे भूमिका करीत आहेत. सरपंचाची विकासात्मक कामात बघ्याची भूमिका पाहून ते लवकरच पायउतार होण्याचे चिन्ह दिसत आहेत. याबाबत विरोधी सदस्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिल्याचे बोलले जात आहे. पालोरा हे परिसरातून मध्यभागी असून जवळपास दोन हजार लोकवस्तीचे आहे. नवसदस्यांनी भरलेली ही ग्रामपंचायतीचा कारभार रामभरोसे सुरु आहे. ग्राम पंचायत सदस्यात रस्सीखेच सुरु आहे. येथील सरपंच गावातील खर्चाचे बिल स्वमर्जीने काढणे, ग्राम पंचायत कार्यालयामध्ये पतिदेवाची उपस्थिती ठेवणे, ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांसोबत अरेरावीची भाषा वापरणे, गावात विकासात्मक कामाकडे दुर्लक्ष करणे, मी म्हणेन तो कायदा अमलात आणणे आदी कारणामुळे ग्रा.पं. पदाधिकारी त्रस्त झाले आहेत. गावकऱ्यांना पाणी पुरवठा करणारी लाखो रुपयाची नळ योजना नियोजनाअभावी धूळ खात पडली आहे, याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले आहे. नाव मोठे दर्शन खोटे अशी परिस्थिती येथे निर्माण झाली आहे. गावातील स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. गावात प्रवेश करण्यापूर्वी नाकाला रुमाल बांधावे लागते. स्वत:च्या दोन्ही कडेला घाणच नघाण पाहायला मिळत आहे. ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांच्या आपसी मतभेदामुळे हा गाव विकासापासून कोसो दूर आहे. संबंधित लोकप्रतिनिधींने याकडे लक्ष द्यावे, अशी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)