शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

खरीप हंगामाच्या प्रारंभीच नियतीने डाव मोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 11:31 PM

सुटलेला वादळी वारा. ढगांचा आवाज अन् अंधारात लकाकणारी वीज. शिवारात बांधलेली जनावरे. अशातच झाडावर वीज कोसळली. क्षणात तडफडत-तडफडत एका बैलाचा व म्हशीचा मृत्यू झाला. खरीप हंगामात औत ओढण्यासाठी आसूसलेल्या शेतकºयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. असा हा दुर्देवी प्रकार रोहणा येथे रात्री घडला.

ठळक मुद्देवीज कोसळल्याने बैल ठार : ५० हजाराचे नुकसान, शेतकऱ्यावर संकट

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : सुटलेला वादळी वारा. ढगांचा आवाज अन् अंधारात लकाकणारी वीज. शिवारात बांधलेली जनावरे. अशातच झाडावर वीज कोसळली. क्षणात तडफडत-तडफडत एका बैलाचा व म्हशीचा मृत्यू झाला. खरीप हंगामात औत ओढण्यासाठी आसूसलेल्या शेतकºयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. असा हा दुर्देवी प्रकार रोहणा येथे रात्री घडला.रोहिणी व मृगाच्या जोडनक्षत्राचा योग जुळला. वादळी वाºयासह पाऊस झाला. मेघांची गर्जना रात्री होत होती. लखलखणारी ती वीज कुठेतरी काही उद्ध्वस्त करुन गेली असेल असा अंदाज येत होता. अनेकांचा तो अंदाज खरा ठरला. रोहणा या गावशेजारी बेटाळा रस्त्यावरच्या शिवारात नेहमीप्रमाणे पुरुषोत्तम पंचबुध्दे यांनी जनावरे बांधलेली होती. निबांच्या झाडाला एक बैल तर दुसरा बैल औताला बांधला होता. शेजारीच म्हशीचा पिल्लू (वघार) बांधलेली होती. जनावरांना पाणी पाजले. खायला वैरण देवून पुरुषोत्तम घरी आले. पण, रात्री वीजेने डाव साधला. निंबाच्या झाडावर वीज कोसळली. त्यात झाडाला बांधलेला एक बैल व शेजारी असलेली म्हशीचा तो मोठा झालेला बछडा जागीच तडफडून मृत झाला. औता बांधलेल्या बैलाने झटका दिला. बांधलेला दावा तुटला व तो पळण्यास यशस्वी ठरला. तरीही तो काहीसा जखमी झाला. वीजेच्या लख्ख प्रकाशाने त्या बैलाचे डोळे पणती कमजोर झाली. त्या बैलाला दिसत नसल्याचे सांगण्यात आले. वैरण अन् पाणी देवून आलेला पुरुषोत्तम निवांतपणे झोपला. सकाळी उठून तो शिवाराकडे गेला. झाडाखाली मृत पडलेली जनावरे बघून तो स्तब्धच राहिला. त्याने डोक्यावर हात मांडत आलेल्या संकटाची परिक्षाच बघीतली. या घटनेची खबर मिळताच रोहणाचे सरपंच नरेश ईश्वरकर, ग्रा. पं. सदस्य देवचंद सेलोकर, नितेश मारवाडे, संदीप बोंदरे यांनी घटनास्थळ गाठले.घटनेची माहिती सरपंच नरेश ईश्वरकर यांनी तहसीलदार सुर्यकांत पाटील, ठाणेदार मोहाडी, तलाठी यांना दिली. शासनाकडून योग्य ती मदत मिळण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर एका बैलाचा मृत्यू व दुसरा जखमी झाल्याने पुरुषोत्तम पंचबुध्दे आर्थिक संकटात सापडला आहे. बाजारात बैलाच्या जोडीची किंमत ५० हजारावर आहे.नैसर्गिक आपत्तीमध्ये जनावरांचा मृत्यू झाल्यास शासनाकडून मदत दिली जाईल. घटनेचा अहवाल प्राप्त होताच तातडीने धनादेशाने आर्थिक मदतीचा हात दिला जाईल.- सूर्यकांत पाटीलतहसीलदार, मोहाडी