शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

आमगाव येथील नळाला नियमित पाणीपुरवठ्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:33 IST

आमगाव येथे सुरू असलेल्या नळ योजनेला पंधरा वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाल्याने ती पाण्याची टाकी व पाइपलाइन निर्लेखित करून नव्याने ...

आमगाव येथे सुरू असलेल्या नळ योजनेला पंधरा वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाल्याने ती पाण्याची टाकी व पाइपलाइन निर्लेखित करून नव्याने पाण्याची टाकी बांधण्यात आली तसेच गावांमध्ये नव्याने पाइपलाइन घालण्यात आली. या योजनेला करंचखेडा येथून वैनगंगा नदीचे पाणी पुरवठा करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र रोज नळाला पाणी येत नाही तसेच गावातील कुटुंबे वाढल्यामुळे गावाची लोकसंख्या वाढली. मात्र त्या प्रमाणात या योजनेच्या पाणीपुरवठा करण्यासाठी टाकी वाढविण्यात आली नसल्याने नळाला पाणी मिळाले पाहिजे त्या प्रमाणात पाणी येत नाही. अशी ओरड गावकरी करीत आहेत. या योजनेवर लाखो रुपये खर्च करण्यात आले असून गावकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात फायदा होताना दिसत नाही. नळाला पाणी नियमित येत नसल्याने गावातील अनेक कुटुंबांनी आपल्या स्वतःची बोरवेल तयार करण्याचे धोरण आखले असून अनेकांनी आपल्या घरी बोरवेल तयार केली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये विहीर व बोरवेलमधील पाण्याची पातळी खालावत असते. त्यामुळे बोरवेललासुद्धा पाहिजे त्या प्रमाणात पाणी येत नसल्याने या योजनेचा पाणीपुरवठा नियमित सुरळीत सुरू ठेवण्याची मागणी आमगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.