शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

मागणी 40 लाख बारदाना नगाची, जिल्ह्याला मिळाले केवळ दहा लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 05:00 IST

गाेदामाच्या अभावी धानखरेदीला उशीर झाला. भरडाईसाठी धान मिलर्सने वेळेत उचलला नाही परिणामी गाेदाम फुल्ल हाेते. रबीतील धान काेठे ठेवावा? असा प्रश्न हाेता. शेवटी यावर ताेडगा काढत बंद असलेल्या शाळा धान साठविण्यासाठी घेण्याचा निर्णय झाला. अखेर १८ मेपासून जिल्ह्यात धानखरेदीला प्रारंभ झाला. जिल्ह्यात १३८ आधारभूत केंद्रांना मंजुरी मिळाली. त्यापैकी १३३ केंद्राचे उद्घाटन झाले. तर प्रत्यक्षात १२९ केंद्रावर धानखरेदी झाली.

ठळक मुद्देरबी धान खरेदी : बारदान्याअभावी धान खरेदी ठप्प

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  सुरुवातीला भरडाईसाठी धानाची उचल न झाल्याने गाेदामाचा प्रश्न आणि आता खरेदी झालेले धान भरण्यासाठी बारदान्याचा अभाव असे शुक्लकाष्ठ यंदा रबी हंगामातील धानखरेदीचा मागे लागले आहे. सुरुवातीपासूनच अडचणीत आलेली धानखरेदी अंतिम टप्यात असताना आता बहुतांश केंद्रावर बारदानच नाही. पणन महासंघाने ४० लाख बारदान नगाची मागणी केली. परंतु जिल्ह्याला केवळ दहा लाख बारदाना नग प्राप्त झाले. त्यामुळे अनेक केंद्रांवरील धानखरेदी आता ठप्प झाली आहे. भंडारा जिल्ह्यात दरवर्षी १ मेपासून धानखरेदीला प्रारंभ हाेताे. परंतु गाेदामाच्या अभावी धानखरेदीला उशीर झाला. भरडाईसाठी धान मिलर्सने वेळेत उचलला नाही परिणामी गाेदाम फुल्ल हाेते. रबीतील धान काेठे ठेवावा? असा प्रश्न हाेता. शेवटी यावर ताेडगा काढत बंद असलेल्या शाळा धान साठविण्यासाठी घेण्याचा निर्णय झाला. अखेर १८ मेपासून जिल्ह्यात धानखरेदीला प्रारंभ झाला. जिल्ह्यात १३८ आधारभूत केंद्रांना मंजुरी मिळाली. त्यापैकी १३३ केंद्राचे उद्घाटन झाले. तर प्रत्यक्षात १२९ केंद्रावर धानखरेदी झाली. २८ जूनपर्यंत २० हजार १५४ शेतकऱ्यांनी ८ लाख ७७ हजार ४४५ क्विंटल धानाची विक्री केली. मात्र आता बारदानांचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश केंद्रावर बारदानांचा तुटवडा निर्माण झाला आहे.यावर ताेडगा काढण्यासाठी जिल्हा पणन कार्यालयाने संबंधितांकडे ४० लाख बारदान नगाची मागणी केली. मात्र जिल्ह्याला आतापर्यंत केवळ १० लाख नग बारदान प्राप्त झाले आहे. अद्यापही धानखरेदी सुरू आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार १४ लाख क्विंटल धानाचे उत्पन्न अपेक्षित आहे. ऐवढा धान साठविण्यासाठी माेठ्या प्रमाणात बारदान्याची गरज आहे. परंतु जिल्ह्याला केवळ १० लाख बारदान मिळाल्याने धानखरेदी प्रभावित झाली आहे. बारदाना नसल्याने अनेक केंद्र चालकांपुढे खरेदीचा प्रश्न आहे.

२० हजार शेतकऱ्यांनी विकला धान- रबी हंगामात जिल्ह्यातील २० हजार १५४ शेतकऱ्यांनी आधारभूत किंमतीनुसार धान विकला आहे. पणन महासंघाने ८ लाख ७७ हजार ४४५ क्विंटल धान खरेदी केला आहे. भंडारा तालुक्यात ५५ हजार २३६ क्विंटल, माेहाडी तालुक्यात १ लाख ५५ हजार ८२० क्विंटल, तुमसर तालुक्यात दोन लाख ४७ हजार ५४९, लाखनी तालुक्यात ६६ हजार ८६ क्विंटल, साकाेली तालुक्यात एक लाख १९ हजार ७७८ क्विंटल, लाखांदूर तालुक्यात एक लाख ३६ हजार ९३४ क्विंटल आणि पवनी तालुक्यात ७६ हजार ३९ असा आठ लाख ७७ हजार ४४५ क्विंटल धानखरेदी करण्यात आला आहे.

धानखरेदीचा आज शेवटचा दिवसआधारभूत धानखरेदी करण्याचा ३० जून हा शेवटचा दिवस आहे. मात्र यंदा उशिराने खरेदी सुरू झाल्याने आधारभूत खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी शेतकरी करीत आहे. आतापर्यंत निम्माच धान खरेदी झाला आहे. त्यामुळे एक महिना मुदतवाढ देण्याची गरज आहे. मुदत वाढ मिळाली नाही तर शेतकऱ्यांना आपला धान व्यापाऱ्यांना विकावा लागेल. त्यात त्यांची आर्थिक पिळवणूक हाेणार आहे.

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड