शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ अनधिकृत बांधकाम हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:39 IST

गडेगाव स्थित अशोक लेलँड कंपनीने ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चिखली (हमेशा) या रिठी गावातील गट क्रमांकावरील जागेत अनधिकृतपणे पक्के बांधकाम केले आहे. या जागेवरील अतिक्रमण तात्काळ काढून जमीन मोकळी करुन द्यावी, अन्यथा २ आॅक्टोंबर रोजी आंदोलन छेडण्यात येईल.

ठळक मुद्देराजेगाववासीयांची मागणी : प्रकरण अशोक लेलँड कंपनीचे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गडेगाव स्थित अशोक लेलँड कंपनीने ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चिखली (हमेशा) या रिठी गावातील गट क्रमांकावरील जागेत अनधिकृतपणे पक्के बांधकाम केले आहे. या जागेवरील अतिक्रमण तात्काळ काढून जमीन मोकळी करुन द्यावी, अन्यथा २ आॅक्टोंबर रोजी आंदोलन छेडण्यात येईल. अशा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.माहितीनुसार अशोक लेलँड कंपनीने चिखली हमेश या रिठी गावातील गट क्रमांक १, ४७, ५७ व ५५ या एकुण २६ एकर जागेवर पक्के बांधकाम केले आहे. बळजबरीने व चुकीच्या पध्दतीने हे अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. सदर बांधकाम हटविण्यासाठी महसुल मंत्री व अप्पर सचिव मुंबई तथा नागपूरच्या आयुक्तांना २१ जुलै २०१८रोजी पत्र देण्यात आले होते. यासंदर्भात चार आॅगस्ट २०१८ला भंडाराचे उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे यांनी प्रत्यक्ष मौका चौकशी करुन अतिक्रमण बाबतची माहिती व पुरावे ग्रामस्थांकडून घेतले आहे. यासंदर्भात ३० आॅगस्टला भंडारा येथे सभा बोलाविली होती. यात अशोक लेलँड कंपनीचे व्यवस्थापक अनुपस्थित असल्याने सभा बरखास्त करण्यात आली. ७ सप्टेंबरलाही झालेल्या बैठकीत कंपनीचे व्यवस्थापक आले नाहीत. एसडीओ महिरे यांनी सभा घेतली. यात अतिक्रमण पाडण्यासाठी आपण ‘‘आग्रह धरु नका, कुणाकडे तक्रार करु नका, कुणालाही याबाबत सांगु नका मी आणि जिल्हाधिकारी व अशोक लेलँड कंपनीचे व्यवस्थापक यांना भेटून गावातील लोकांना नोकरी लावुन देतो’’, अशी हमी दिली. २०० लोक बेरोजगार आहेत.१८ सप्टेंबर व त्यानंतर २५ सप्टेंबरला तहसील कार्यालयात सभेसाठी ग्रामस्थांनी पुराव्यासह हजेरी लावली होती. मात्र या सभेतही अधिकाऱ्यांनी कंपनीचीच बाजू घेतली. अशा आरोप या ग्रामस्थांनी केला आहे. कंपनीचे व्यवस्थापक कुठलीही बाजू मांडत नव्हते. याउलट ‘‘परत सातबारा द्या’’ अशी उत्तरे देत होते. १६ नोव्हेंबर २०१६ च्या पत्रानुसार चिखली हमेशा येथील ही जमीन औद्योगिक प्रकल्प म्हणून चुकीची नोंद घेतली आहे.याबाबत पुरावा देवूनही उपविभागीय अधिकाऱ्यांनी राजेगाव वासीयांचे म्हणने लक्षात घेतले नाही. असेही निवेदनात नमूद आहे.चिखली हमेशा हे गाव राजेगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत आहे किंवा नाही याचा पुरावा सादर करा, असे म्हटले चिखली हमेशा हे गाव ६ आॅगस्ट १९५५ ला राजेगावमध्ये विलिन झाले आहे. याची नोंद भुमिअभिलेख कार्यालयात आहे.ही जागा गावकऱ्यांची आहे. राजेगाववासीयांची ही फसवणुक असून कंपनीचे व्यवस्थापक अरविंद बोराडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच ग्रामस्थांना न्याय देत नसल्यामुळे उपविभागीय अधिकारी यांनाही निलंबित करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. निवेदनात नरेश शेंडे, वसंता वासनिक, कुंजन शेंडे, देवराम वासनीक, प्रकाश झंझाड, सचिन शेंडे, अनिता शेंडे, अंताराम गंथाडे, विशाल रामटेके, अशोक शेंडे, परसराम बोंद्रे, मुकेश गणविर, तुकाराम झलके आदींच्या स्वाक्षºया आहेत.