शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

‘ते’ अनधिकृत बांधकाम हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:39 IST

गडेगाव स्थित अशोक लेलँड कंपनीने ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चिखली (हमेशा) या रिठी गावातील गट क्रमांकावरील जागेत अनधिकृतपणे पक्के बांधकाम केले आहे. या जागेवरील अतिक्रमण तात्काळ काढून जमीन मोकळी करुन द्यावी, अन्यथा २ आॅक्टोंबर रोजी आंदोलन छेडण्यात येईल.

ठळक मुद्देराजेगाववासीयांची मागणी : प्रकरण अशोक लेलँड कंपनीचे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गडेगाव स्थित अशोक लेलँड कंपनीने ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चिखली (हमेशा) या रिठी गावातील गट क्रमांकावरील जागेत अनधिकृतपणे पक्के बांधकाम केले आहे. या जागेवरील अतिक्रमण तात्काळ काढून जमीन मोकळी करुन द्यावी, अन्यथा २ आॅक्टोंबर रोजी आंदोलन छेडण्यात येईल. अशा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.माहितीनुसार अशोक लेलँड कंपनीने चिखली हमेश या रिठी गावातील गट क्रमांक १, ४७, ५७ व ५५ या एकुण २६ एकर जागेवर पक्के बांधकाम केले आहे. बळजबरीने व चुकीच्या पध्दतीने हे अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. सदर बांधकाम हटविण्यासाठी महसुल मंत्री व अप्पर सचिव मुंबई तथा नागपूरच्या आयुक्तांना २१ जुलै २०१८रोजी पत्र देण्यात आले होते. यासंदर्भात चार आॅगस्ट २०१८ला भंडाराचे उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे यांनी प्रत्यक्ष मौका चौकशी करुन अतिक्रमण बाबतची माहिती व पुरावे ग्रामस्थांकडून घेतले आहे. यासंदर्भात ३० आॅगस्टला भंडारा येथे सभा बोलाविली होती. यात अशोक लेलँड कंपनीचे व्यवस्थापक अनुपस्थित असल्याने सभा बरखास्त करण्यात आली. ७ सप्टेंबरलाही झालेल्या बैठकीत कंपनीचे व्यवस्थापक आले नाहीत. एसडीओ महिरे यांनी सभा घेतली. यात अतिक्रमण पाडण्यासाठी आपण ‘‘आग्रह धरु नका, कुणाकडे तक्रार करु नका, कुणालाही याबाबत सांगु नका मी आणि जिल्हाधिकारी व अशोक लेलँड कंपनीचे व्यवस्थापक यांना भेटून गावातील लोकांना नोकरी लावुन देतो’’, अशी हमी दिली. २०० लोक बेरोजगार आहेत.१८ सप्टेंबर व त्यानंतर २५ सप्टेंबरला तहसील कार्यालयात सभेसाठी ग्रामस्थांनी पुराव्यासह हजेरी लावली होती. मात्र या सभेतही अधिकाऱ्यांनी कंपनीचीच बाजू घेतली. अशा आरोप या ग्रामस्थांनी केला आहे. कंपनीचे व्यवस्थापक कुठलीही बाजू मांडत नव्हते. याउलट ‘‘परत सातबारा द्या’’ अशी उत्तरे देत होते. १६ नोव्हेंबर २०१६ च्या पत्रानुसार चिखली हमेशा येथील ही जमीन औद्योगिक प्रकल्प म्हणून चुकीची नोंद घेतली आहे.याबाबत पुरावा देवूनही उपविभागीय अधिकाऱ्यांनी राजेगाव वासीयांचे म्हणने लक्षात घेतले नाही. असेही निवेदनात नमूद आहे.चिखली हमेशा हे गाव राजेगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत आहे किंवा नाही याचा पुरावा सादर करा, असे म्हटले चिखली हमेशा हे गाव ६ आॅगस्ट १९५५ ला राजेगावमध्ये विलिन झाले आहे. याची नोंद भुमिअभिलेख कार्यालयात आहे.ही जागा गावकऱ्यांची आहे. राजेगाववासीयांची ही फसवणुक असून कंपनीचे व्यवस्थापक अरविंद बोराडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच ग्रामस्थांना न्याय देत नसल्यामुळे उपविभागीय अधिकारी यांनाही निलंबित करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. निवेदनात नरेश शेंडे, वसंता वासनिक, कुंजन शेंडे, देवराम वासनीक, प्रकाश झंझाड, सचिन शेंडे, अनिता शेंडे, अंताराम गंथाडे, विशाल रामटेके, अशोक शेंडे, परसराम बोंद्रे, मुकेश गणविर, तुकाराम झलके आदींच्या स्वाक्षºया आहेत.