शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ अनधिकृत बांधकाम हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:39 IST

गडेगाव स्थित अशोक लेलँड कंपनीने ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चिखली (हमेशा) या रिठी गावातील गट क्रमांकावरील जागेत अनधिकृतपणे पक्के बांधकाम केले आहे. या जागेवरील अतिक्रमण तात्काळ काढून जमीन मोकळी करुन द्यावी, अन्यथा २ आॅक्टोंबर रोजी आंदोलन छेडण्यात येईल.

ठळक मुद्देराजेगाववासीयांची मागणी : प्रकरण अशोक लेलँड कंपनीचे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गडेगाव स्थित अशोक लेलँड कंपनीने ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चिखली (हमेशा) या रिठी गावातील गट क्रमांकावरील जागेत अनधिकृतपणे पक्के बांधकाम केले आहे. या जागेवरील अतिक्रमण तात्काळ काढून जमीन मोकळी करुन द्यावी, अन्यथा २ आॅक्टोंबर रोजी आंदोलन छेडण्यात येईल. अशा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.माहितीनुसार अशोक लेलँड कंपनीने चिखली हमेश या रिठी गावातील गट क्रमांक १, ४७, ५७ व ५५ या एकुण २६ एकर जागेवर पक्के बांधकाम केले आहे. बळजबरीने व चुकीच्या पध्दतीने हे अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. सदर बांधकाम हटविण्यासाठी महसुल मंत्री व अप्पर सचिव मुंबई तथा नागपूरच्या आयुक्तांना २१ जुलै २०१८रोजी पत्र देण्यात आले होते. यासंदर्भात चार आॅगस्ट २०१८ला भंडाराचे उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे यांनी प्रत्यक्ष मौका चौकशी करुन अतिक्रमण बाबतची माहिती व पुरावे ग्रामस्थांकडून घेतले आहे. यासंदर्भात ३० आॅगस्टला भंडारा येथे सभा बोलाविली होती. यात अशोक लेलँड कंपनीचे व्यवस्थापक अनुपस्थित असल्याने सभा बरखास्त करण्यात आली. ७ सप्टेंबरलाही झालेल्या बैठकीत कंपनीचे व्यवस्थापक आले नाहीत. एसडीओ महिरे यांनी सभा घेतली. यात अतिक्रमण पाडण्यासाठी आपण ‘‘आग्रह धरु नका, कुणाकडे तक्रार करु नका, कुणालाही याबाबत सांगु नका मी आणि जिल्हाधिकारी व अशोक लेलँड कंपनीचे व्यवस्थापक यांना भेटून गावातील लोकांना नोकरी लावुन देतो’’, अशी हमी दिली. २०० लोक बेरोजगार आहेत.१८ सप्टेंबर व त्यानंतर २५ सप्टेंबरला तहसील कार्यालयात सभेसाठी ग्रामस्थांनी पुराव्यासह हजेरी लावली होती. मात्र या सभेतही अधिकाऱ्यांनी कंपनीचीच बाजू घेतली. अशा आरोप या ग्रामस्थांनी केला आहे. कंपनीचे व्यवस्थापक कुठलीही बाजू मांडत नव्हते. याउलट ‘‘परत सातबारा द्या’’ अशी उत्तरे देत होते. १६ नोव्हेंबर २०१६ च्या पत्रानुसार चिखली हमेशा येथील ही जमीन औद्योगिक प्रकल्प म्हणून चुकीची नोंद घेतली आहे.याबाबत पुरावा देवूनही उपविभागीय अधिकाऱ्यांनी राजेगाव वासीयांचे म्हणने लक्षात घेतले नाही. असेही निवेदनात नमूद आहे.चिखली हमेशा हे गाव राजेगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत आहे किंवा नाही याचा पुरावा सादर करा, असे म्हटले चिखली हमेशा हे गाव ६ आॅगस्ट १९५५ ला राजेगावमध्ये विलिन झाले आहे. याची नोंद भुमिअभिलेख कार्यालयात आहे.ही जागा गावकऱ्यांची आहे. राजेगाववासीयांची ही फसवणुक असून कंपनीचे व्यवस्थापक अरविंद बोराडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच ग्रामस्थांना न्याय देत नसल्यामुळे उपविभागीय अधिकारी यांनाही निलंबित करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. निवेदनात नरेश शेंडे, वसंता वासनिक, कुंजन शेंडे, देवराम वासनीक, प्रकाश झंझाड, सचिन शेंडे, अनिता शेंडे, अंताराम गंथाडे, विशाल रामटेके, अशोक शेंडे, परसराम बोंद्रे, मुकेश गणविर, तुकाराम झलके आदींच्या स्वाक्षºया आहेत.