शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

हिरव्यागार उद्यानांची अधोगती

By admin | Updated: August 3, 2016 00:23 IST

एखाद्या उद्यानात प्रवेश केल्यावर प्रथम आपले लक्ष आपसुकच लहानग्यांसाठी असलेल्या खेळण्याच्या साहित्यांकडे जाते.

वर्षाकाठी फक्त १६.५ लाखांची तरतूद : राजकीय इच्छाशक्तीचा अभावइंद्रपाल कटकवार भंडाराएखाद्या उद्यानात प्रवेश केल्यावर प्रथम आपले लक्ष आपसुकच लहानग्यांसाठी असलेल्या खेळण्याच्या साहित्यांकडे जाते. परंतु भंडारा नगर पालिकेच्या अखत्यारीतील उद्याने तेवढी नशीबवान नाहित. एकेकाळी हिरव्यागार असलेल्या उद्यानांची अधोगती झाली आहे. एक किंवा दोन उद्यानांची स्थिती बरी असली तरी अन्य बगिच्यांची स्थिती चिंताजनक आहे. निधीचा वाणवा, राजकिय इच्छाशक्तीचा अभाव व नागरिकांची उदासिनता ही प्रमुख कारणे यासाठी कारणीभूत आहेत.उद्याने कशी असावीत? असा प्रश्न उपस्थित झाल्यास त्याचे उत्तर, ‘मन प्रसन्नचित्त करणारी असावीत’ असे येईल. परंतु भंडारा शहरातील उद्यानांची स्थिती विकासाऐवजी भकास झालेली आहे. राजीव गांधी चौक परिसराला लागुन असलेल्या नटवरलाल पटेल उद्यानाची (मिस्कीन टॅक) स्थिती बऱ्यापैकी आहे. शहीद स्मारकातील बगिच्याची स्थिती चांगली असली तरी त्यानंतर शहरातील बगिचे शेवटची घटका मोजत आहेत. मोठा बाजार परिसरातील शर्मा बालोद्यान, मेंढा परिसरातील चाचा नेहरू बालोद्यान, म्हाडा कॉलनीतील बालोद्यान, शिवाजी बालोद्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्डातील उद्यान, डॉ.तुरस्कर हॉस्पीटल समोरील उद्यान (आताचे नावापुरते क्रीडांगण), मुस्लिम लायब्ररी चौकातील उद्यान, भगतसिंग वॉर्डातील उद्यान यासह शहरातील अन्य उद्यानांची स्थिती विदारक आहे. एक घसरगुंडी सोडली तर येथे आपल्याला हिरवळ सुद्धा पाहायला मिळणार नाही. अतिक्रमणाची समस्या ही वेगळीच आहे. कर्मचाऱ्यांचा वाणवा ही एक मोठी समस्या बगिच्यांच्या देखभालीत आडकाठी ठरत आहे. वॉर्डात नीटनेटके उद्यान व्हावे असे कदाचित नागरीकांना वाटत नसावे. बगिच्यांमध्ये सौंदर्याचा लवलेशही नाही. पदाधिकाऱ्यांचा दुर्लक्षितपणा म्हणावा की निधीचा ठणठणाट त्याचा परिणाम उद्यानांची स्थिती पाहुन लक्षात येतो. काही वर्षांपूर्वी नगर पालिकेच्या खर्चातून बगिच्यांची देखभाल करण्यात आली होती. आता मात्र हौशी लोकांचे पत्ते खेळण्याचे एकमात्र साधन उद्यान बनले आहे. भग्नावस्थेत असलेले प्रवेशद्वार, मुतारीची दुर्गंधी, वाळलेले गवत या देणग्या या बगिच्यांच्या भाग्यात लाभल्या आहेत. न.प.चे पदाधिकारी या बगिच्याच्या उद्धाराकडे नजर घालणार काय? अल्प निधीत विकास अशक्यशहरातील नगर पालिका प्रशासनाच्या अखत्यारीत येत असलेल्या उद्यानांच्या विकासासाठी व सौंदर्यीकरणासाठी पालिका प्रशासनाने वर्ष २०१६-१७ च्या अर्थसंकल्पामध्ये फक्त १६ लक्ष ५० हजारांची तरतूद केली आहे, निधी कसा खर्च होतो, कुठल्या कामावर खर्च होतो, हे बगिच्यांच्या अवस्थेवरून काही नव्याने सांगण्याची गरज उरलेली नाही. तुटपुंज्या रकमेत जवळपास दहा उद्यानांचा विकास होणार तरी कसा, हा मुख्य प्रश्न आहे.मुख्याधिकारी म्हणून शहराच्या सर्वांगिण विकासावर लक्ष केंद्रीत करण्याचे कार्य सुरू आहे. त्याअंतर्गत भविष्यकालीन नियोजनात सुनियोजित पद्धतीने उद्यानांचा विकासावर काम करण्याचा मानस आहे. त्या दिशेने लवकरच पाऊले उचलण्यात येईल. -अनिल अढागळे,मुख्याधिकारी, न.प. भंडारा.