शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

हिरव्यागार उद्यानांची अधोगती

By admin | Updated: August 3, 2016 00:23 IST

एखाद्या उद्यानात प्रवेश केल्यावर प्रथम आपले लक्ष आपसुकच लहानग्यांसाठी असलेल्या खेळण्याच्या साहित्यांकडे जाते.

वर्षाकाठी फक्त १६.५ लाखांची तरतूद : राजकीय इच्छाशक्तीचा अभावइंद्रपाल कटकवार भंडाराएखाद्या उद्यानात प्रवेश केल्यावर प्रथम आपले लक्ष आपसुकच लहानग्यांसाठी असलेल्या खेळण्याच्या साहित्यांकडे जाते. परंतु भंडारा नगर पालिकेच्या अखत्यारीतील उद्याने तेवढी नशीबवान नाहित. एकेकाळी हिरव्यागार असलेल्या उद्यानांची अधोगती झाली आहे. एक किंवा दोन उद्यानांची स्थिती बरी असली तरी अन्य बगिच्यांची स्थिती चिंताजनक आहे. निधीचा वाणवा, राजकिय इच्छाशक्तीचा अभाव व नागरिकांची उदासिनता ही प्रमुख कारणे यासाठी कारणीभूत आहेत.उद्याने कशी असावीत? असा प्रश्न उपस्थित झाल्यास त्याचे उत्तर, ‘मन प्रसन्नचित्त करणारी असावीत’ असे येईल. परंतु भंडारा शहरातील उद्यानांची स्थिती विकासाऐवजी भकास झालेली आहे. राजीव गांधी चौक परिसराला लागुन असलेल्या नटवरलाल पटेल उद्यानाची (मिस्कीन टॅक) स्थिती बऱ्यापैकी आहे. शहीद स्मारकातील बगिच्याची स्थिती चांगली असली तरी त्यानंतर शहरातील बगिचे शेवटची घटका मोजत आहेत. मोठा बाजार परिसरातील शर्मा बालोद्यान, मेंढा परिसरातील चाचा नेहरू बालोद्यान, म्हाडा कॉलनीतील बालोद्यान, शिवाजी बालोद्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्डातील उद्यान, डॉ.तुरस्कर हॉस्पीटल समोरील उद्यान (आताचे नावापुरते क्रीडांगण), मुस्लिम लायब्ररी चौकातील उद्यान, भगतसिंग वॉर्डातील उद्यान यासह शहरातील अन्य उद्यानांची स्थिती विदारक आहे. एक घसरगुंडी सोडली तर येथे आपल्याला हिरवळ सुद्धा पाहायला मिळणार नाही. अतिक्रमणाची समस्या ही वेगळीच आहे. कर्मचाऱ्यांचा वाणवा ही एक मोठी समस्या बगिच्यांच्या देखभालीत आडकाठी ठरत आहे. वॉर्डात नीटनेटके उद्यान व्हावे असे कदाचित नागरीकांना वाटत नसावे. बगिच्यांमध्ये सौंदर्याचा लवलेशही नाही. पदाधिकाऱ्यांचा दुर्लक्षितपणा म्हणावा की निधीचा ठणठणाट त्याचा परिणाम उद्यानांची स्थिती पाहुन लक्षात येतो. काही वर्षांपूर्वी नगर पालिकेच्या खर्चातून बगिच्यांची देखभाल करण्यात आली होती. आता मात्र हौशी लोकांचे पत्ते खेळण्याचे एकमात्र साधन उद्यान बनले आहे. भग्नावस्थेत असलेले प्रवेशद्वार, मुतारीची दुर्गंधी, वाळलेले गवत या देणग्या या बगिच्यांच्या भाग्यात लाभल्या आहेत. न.प.चे पदाधिकारी या बगिच्याच्या उद्धाराकडे नजर घालणार काय? अल्प निधीत विकास अशक्यशहरातील नगर पालिका प्रशासनाच्या अखत्यारीत येत असलेल्या उद्यानांच्या विकासासाठी व सौंदर्यीकरणासाठी पालिका प्रशासनाने वर्ष २०१६-१७ च्या अर्थसंकल्पामध्ये फक्त १६ लक्ष ५० हजारांची तरतूद केली आहे, निधी कसा खर्च होतो, कुठल्या कामावर खर्च होतो, हे बगिच्यांच्या अवस्थेवरून काही नव्याने सांगण्याची गरज उरलेली नाही. तुटपुंज्या रकमेत जवळपास दहा उद्यानांचा विकास होणार तरी कसा, हा मुख्य प्रश्न आहे.मुख्याधिकारी म्हणून शहराच्या सर्वांगिण विकासावर लक्ष केंद्रीत करण्याचे कार्य सुरू आहे. त्याअंतर्गत भविष्यकालीन नियोजनात सुनियोजित पद्धतीने उद्यानांचा विकासावर काम करण्याचा मानस आहे. त्या दिशेने लवकरच पाऊले उचलण्यात येईल. -अनिल अढागळे,मुख्याधिकारी, न.प. भंडारा.