शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
8
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
9
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
10
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
11
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
12
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
13
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
14
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
15
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
16
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
17
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
18
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
19
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
20
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

देव्हाडा गावाला हागणदारी मुक्तीचा ध्यास

By admin | Updated: January 14, 2015 23:02 IST

देव्हाडा (खुर्द) गावात अनेक घरी शौचालयाचे बांधकाम झाले नव्हते. ३९६ कुटुंबापैकी ११३ घरी शौचालय होते. तर २८३ कुटुंब उघड्यावर शौचास बसायचे. सरपंच पुष्पलता ढेंगे, माजी सभापती

युवराज गोमासे - करडी (पालोरा)देव्हाडा (खुर्द) गावात अनेक घरी शौचालयाचे बांधकाम झाले नव्हते. ३९६ कुटुंबापैकी ११३ घरी शौचालय होते. तर २८३ कुटुंब उघड्यावर शौचास बसायचे. सरपंच पुष्पलता ढेंगे, माजी सभापती झगडू बुद्धे यांनी पुढाकार घेऊन गावकऱ्यांची सभा बोलाविली. समुदाय संचालित हागणदारी निर्मूलन कृती आराखडा तयार करवून त्यास मंजुरी दिली गेली. गावात २८३ कुटुंबांनी शौचालयाच्या बांधकामाला सुरुवात केली. मोहाडी तालुक्यातील देव्हाडा गावाची शौचालयाच्या बाबतीत अवस्था अवघड होती. उन्हाळ्यात उघड्यावर शौचास जायचे. पावसाळ्यात तारांबळ उडायची. महिला व लहान मुलांना त्रास सहन करावा लागायचा. रात्री अंधारात जावे लागत होते. या दयनीय परिस्थितीचा सामना महिलांना करावा लागायचा. बिडीओंनी सरपंचाची कैफीयत ऐकून विस्तार अधिकाऱ्याला गावाला भेट देण्याचे निर्देश दिले. ३० डिसेंबर २०१४ रोजी खंडविकास अधिकारी डी.व्ही. आगलावे यांचे अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीला पंचायत विस्तार अधिकारी लक्ष्मीकांत बोहटे, सरपंच पुष्पलता ढेंगे, उपसरपंच वंदना सोयाम, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र शेंडे, झगडू बुद्धे, ग्रामसेवक आर.बी. बोरकर, ग्रामपंचायत सदस्य रामानंद कांबळे, सुरेश कांबळे, छगनलाल उईके, दर्शनकुमार डोंगरे, पार्वता कांबळे, अनुरथा बुद्धे, आशा शहारे, महिला मंडळाच्या अध्यक्षा सुलोचना चौधरी, लता आरामे, गट संसाधन केंद्राचे समूह समन्वयक, निर्मूल दूत, अंगणवाडी व आरोग्य सेविका, शाळांचे मुख्याध्यापक प्रामुख्याने हजर होते. ३१ डिसेंबर २०१४ ते ७ जानेवारी २०१५ पर्यंत गावाचे सर्व्हेक्षण करून ८ जानेवारी रोजी पाणी व स्वच्छता बाबत जनजागृती रॅली काढून ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. हागणदारी निर्मूलन आराखड्याला सर्वानुमते मंजुरी दिली गेली. गट संसाधन केंद्राचे समूह समन्यवक जी.एस. अंबुले, पी.व्ही. गणवीर यांचे मार्फत संपूर्ण गावाची परिसराची पाहणी करण्यात आली. मानवी मलमूत्र व्यवस्थापनाबद्दल नागरिकांनी माहिती जाणून घेतली. संस्था स्तरावरील इमारती, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन यासाठी प्रत्यक्ष गृहभेटी घेऊन माहिती संकलीत केली. सामूहिक प्रयत्नांचा परिचय या गावाने दिला असून स्वयंप्रेरणेने झटणारे मोहाडी तालुक्यातील ते एकमेव गाव ठरले आहे.