शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

कर्ज वाढले, कुंकू हरपले; ४०५ शेतकरी विधवांची फरफट सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 16:10 IST

विधवांचे कुंकू हरपले तरीही शासनाकडून बळीराजाची फरफट सुरू आहे.

- देवानंद नंदेश्वर

भंडारा : धानाचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांना घडाईपेक्षा मडाईच जास्त करावी लागत आहे. परिणामी धानाची शेती बेभरवशाची झाली आहे. सततच्या नापिकीमुळे व वाढत्या कर्जामुळे जिल्ह्यात ६९१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. यापैकी ४०५ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर जिल्हा प्रशासनाने अपात्रतेचा ठपका ठेऊन त्यांना शासकीय मदतीपासून वंचित ठेवले. विधवांचे कुंकू हरपले तरीही शासनाकडून बळीराजाची फरफट सुरू आहे.

शेती हा प्रमुख व्यवसाय असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था दयनीय असून, आतापर्यंत जिल्ह्यात ६९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, त्यापैकी एकूण २७६ जणांच्या कुटुंबीयांना मदतीचे वाटप करण्यात आले आहे. २८६ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. भंडारा जिल्हा धान उत्पादकांचा म्हणून ओळखला जातो. धान उत्पादक शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी इतर कोणत्याही पिकाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना बहुतेक येत नाहीत. 

कधी पाऊस न आल्याने, तर कधी अधिकचा आल्याने हा शेतकरी संकटात सापडतो. घेतलेले कर्ज फेडण्यासाठी उत्पन्न चांगले होणे गरजेचे आहे. नापिकी होऊन उत्पन्नात घट झाल्यास नुकसान होते व कर्ज फेडताना तारेवरची कसरत करावी लागते. अशा वेळी कर्जबाजारी शेतकऱ्यांपुढे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नसतो. अशाच कर्जामुळे खचून गेलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी जिल्ह्यात आत्महत्या केल्या आहेत.

२००३ पासून २०२३च्या ऑक्टोबरपर्यंत ६९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. २००६, २००७, २००८, २०१५ व १६ मध्ये ५० च्या आसपास शेतकऱ्यांनी स्वत:ची जीवनयात्रा संपविली. २०११ मध्ये ४४ शेतकरी आत्महत्येच्या मार्गाने गेले, तर २०१२ मध्ये १८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आतापर्यंत २ कोटी ७६ लाख रुपयांची मदत शेतकरी कुटुंबीयांना देण्यात आली.

टॅग्स :Farmerशेतकरी