शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

कर्ज वाढले, कुंकू हरपले; ४०५ शेतकरी विधवांची फरफट सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 16:10 IST

विधवांचे कुंकू हरपले तरीही शासनाकडून बळीराजाची फरफट सुरू आहे.

- देवानंद नंदेश्वर

भंडारा : धानाचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांना घडाईपेक्षा मडाईच जास्त करावी लागत आहे. परिणामी धानाची शेती बेभरवशाची झाली आहे. सततच्या नापिकीमुळे व वाढत्या कर्जामुळे जिल्ह्यात ६९१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. यापैकी ४०५ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर जिल्हा प्रशासनाने अपात्रतेचा ठपका ठेऊन त्यांना शासकीय मदतीपासून वंचित ठेवले. विधवांचे कुंकू हरपले तरीही शासनाकडून बळीराजाची फरफट सुरू आहे.

शेती हा प्रमुख व्यवसाय असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था दयनीय असून, आतापर्यंत जिल्ह्यात ६९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, त्यापैकी एकूण २७६ जणांच्या कुटुंबीयांना मदतीचे वाटप करण्यात आले आहे. २८६ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. भंडारा जिल्हा धान उत्पादकांचा म्हणून ओळखला जातो. धान उत्पादक शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी इतर कोणत्याही पिकाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना बहुतेक येत नाहीत. 

कधी पाऊस न आल्याने, तर कधी अधिकचा आल्याने हा शेतकरी संकटात सापडतो. घेतलेले कर्ज फेडण्यासाठी उत्पन्न चांगले होणे गरजेचे आहे. नापिकी होऊन उत्पन्नात घट झाल्यास नुकसान होते व कर्ज फेडताना तारेवरची कसरत करावी लागते. अशा वेळी कर्जबाजारी शेतकऱ्यांपुढे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नसतो. अशाच कर्जामुळे खचून गेलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी जिल्ह्यात आत्महत्या केल्या आहेत.

२००३ पासून २०२३च्या ऑक्टोबरपर्यंत ६९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. २००६, २००७, २००८, २०१५ व १६ मध्ये ५० च्या आसपास शेतकऱ्यांनी स्वत:ची जीवनयात्रा संपविली. २०११ मध्ये ४४ शेतकरी आत्महत्येच्या मार्गाने गेले, तर २०१२ मध्ये १८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आतापर्यंत २ कोटी ७६ लाख रुपयांची मदत शेतकरी कुटुंबीयांना देण्यात आली.

टॅग्स :Farmerशेतकरी