शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
4
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
5
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
6
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
7
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
8
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
9
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
10
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
11
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
12
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
13
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
14
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
15
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
16
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
17
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
18
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
19
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
20
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसमोर कर्ज फेडण्याचे संकट

By admin | Updated: February 10, 2016 00:40 IST

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची हाक : दीड दशकांपासूनचे कर्ज थकीतमाणिक खर्डेकर सासरामहाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. शासनाचे शेतकऱ्याविषयीचे चुकीचे धोरण, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, पूरपरिस्थिती, पिकावरील रोगराई इत्यादी कारणाने नापिकी येत असल्याने त्यांचा कर्जबाजारीपणा वाढला. सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतले त्यांची परतफेड करणे कठीण झाले. त्यांचे कर्ज थकीत झाले. परिणामी त्यांचे कर्ज घेण्याचे, उत्पन्न घेण्याचे सर्व दरवाजे बंद झाले. दिवसेंदिवस कर्जाचा बोझा वाढल्याने त्यांच्या आत्महत्यांच्या प्रामणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.मागील वर्षी शासनाने शेतकऱ्याची सावकारी पाशातून मुक्तता करण्यासाठी त्यांच्या गहाण असलेल्या सोन्यासंबंधी जे पाऊल उचलले त्याने शेतकऱ्यांचे हित न साधता सावकाराचे घरे भरली. मागणी न करताच त्यांच्या सोन्यावरील कर्ज व व्याज वसुल झाले. सोन्यावर सावकारांकडून कर्ज घेणाऱ्यांची संख्या केवळ १० टक्के होती. उर्वरित ९० टक्के शेतकऱ्यांजवळ सोने नसल्याने ते सावकारी कर्ज न घेता, बँकांकडून पिक कर्ज घेतात. भंडारा जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी १० ते १५ वर्षापासून थकीत कर्जदार आहेत.सततची नापिकी, नैसर्गिक आपत्ती अशा विविध समस्यांमुळे त्यांनी कर्जची परतफेड केली नाही. ते थकीत कर्जदार झाल्याने त्यांना बँकाकडून नवीन कर्ज मिळत नाही व पिकविमा लागू होत नाही. परिणामी अठरा विश्व दारिद्र्य त्यांचा साथ सोडत नाही. त्यांच्या कौटुंबिक समस्या सतत त्यांना डिवचत असल्याने त्यांचा मनोबल खचत असल्याचे दिसत आहे. शासनाला दुष्काळात जो पॅकेज येतो तो पॅकेज देऊनही किंवा कर्जवसुली स्थगित करूनही थकीत कर्जदाराला याचा काहीही फायदा होत नाही. उलट त्यांचेवर कर्जाचा बोझा वाढत असल्याने ते हतबल होतात. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील अशा काही थकीत कर्जदार शेतकऱ्यांनी थकीत कर्जमाफी संबंधात जिल्हा उपनिबंधक, सहाय्यक उपनिबंधक, तहसीलदार, जिल्हाधिकारी तसेच आमदार व खासदार यांचेकडे कर्ज निवेदन दिले. त्याचबरोबर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही निवेदन दिले. कर्जमाफी करणे ही बाब धोरणात्मक स्वरुपाची असून सदर बाब शासनस्तरावरील आहे. अशा अधिकारी व लोकप्रतिनिधींनी यांचेकडून प्रतिक्रिया उमटल्याने आमचा वाली कोण? यासाठी शेतकरी हवालदिल झाला आहे.शासन स्मार्ट सिटी योजनेसाठी अब्जावधी खर्च करण्याचा विचार करतो. स्मार्ट सिटीमुळे शेतकऱ्यांना काहीही फायदा होणार नाही. शेतीचे उत्पन्न काढण्यासाठी खेड्यापाड्यातील जगाच्या पोशिंद्याला स्मार्ट करण्याच्या विचारांची गरज आहे. लोकप्रतिनिधींनी १० ते १५ वर्षापासून थकीत असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा गांभीर्याने विचार करणे महत्वाचे आहे. जर असे झाले नाही तर आत्महत्या वाढत वाहतील. हे शक्यता नाकारता येत नाही.