शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
2
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
3
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
7
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
8
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
9
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
10
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
11
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
12
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
13
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
14
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
15
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
16
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
17
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

By admin | Updated: July 4, 2015 01:25 IST

एकही मूल शिक्षणापासून वंचीत राहू नये यासाठी शासनाची धडपड सुरू आहे.

खातिया : एकही मूल शिक्षणापासून वंचीत राहू नये यासाठी शासनाची धडपड सुरू आहे. मात्र येथील जिल्हा परिषद शाळेतील चित्र बघितल्यास शासनाची ही उठाठेव फोल वाटते. कारण, जिर्ण अवस्थेत असलेल्या इमारतीत येथील विद्यार्थी जीव मुठीत धरून क,ख,ग चे धडे गिरवीत आहेत. जीवावरचा हा खेळ असूनही शिक्षण विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याने पालकांत मात्र रोष व्याप्त आहे. मागील कित्येक वर्षांपासून येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेची जिर्ण अवस्था आहे. कौलारू इमारतींत येथील विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून शिक्षण घेत असल्याचे चित्र आहे. शिक्षण हक्काच्या नावावर शासन एकही मुल शिक्षणापासून वंचीत राहू नये म्हणत आहे. तर दुसरीकडे मात्र आहे त्या विद्यार्थ्यांना सुविधा पुरविण्यात शासन अपयशी ठरत असल्याचे हे मुर्त उदाहरण आहे. कोट्यवधी रूपये खर्च करून शासन विविध योजना राबवित आहेत. मात्र येथील विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागत असल्याचे चित्र मात्र त्यांच्या नजरेत येत नाही. एकीकडे शाळेत बसण्यासाठी जागेचा अभाव आहे. त्यातही शाळेची इमारत कधी अंगावर पडेल याचा नेम नसल्याने विद्यार्थीच काय पालकही आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यानंतर धास्तीत राहतात असे चित्र आहे. त्यात पावसाळ््यात तर अधिकच स्थिती गंभीर असते. पावसाचे पाणी वर्गांत गळत असल्याने विद्यार्थ्यांना बसणे कठिण होते. शाळेच्या या अवस्थेबद्दल शिक्षण विभागाला कित्येकदा कळविण्यात आले आहे. मात्र शिक्षण विभाग डोळ्यावर हात धरून बसल्याने त्यांना येथील शाळेची दुरवस्था दिसत नाही. परिणामी आहे त्या स्थितीत जीव मुठीत धरून विद्यार्थी व शिक्षक शाळेत येत आहेत. शिक्षण विभागाच्या या पंगू कारभारामुळे पालकांत मात्र रोष व्याप्त आहे. सध्या पावसाळा सुरू असून पावसामुळे इमारत अधिक जिर्ण होऊन कधीही पडण्याची शक्यता टाळता येत नाही. अशात एखाद्याच्या जीवावर बेतण्याची वाट शिक्षण विभाग बघत आहे काय असा सवाल विद्यार्थ्यांच्या पालकांकडून उपस्थित केला जात आहे. शाळेच्या इमारतीची ही अवस्था बघता शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)