शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

धरणाच्या साठवणूक पाण्यात वाढ; मदतीसाठी बपेऱ्यातील बळीराजाचा टाहो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 14:35 IST

बपेऱ्याचे शेतकरी नव्या संकटात : सर्वेक्षणानंतरही स्थिती 'जैसे थे'

लोकमत न्यूज नेटवर्क चुल्हाड (सिहोरा) : वैनगंगा नदीवरील कवलेवाडा धरणात पाण्याच्या साठवणूक क्षमतेत वाढ करण्यात आल्याने बपेरा गावातील शेतकऱ्यावर नवे संकट ओढवले आहेत. बागायती शेत बुडाले आहेत. धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा २ अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले असले, तरी बुडीत शेतीची आर्थिक मदत मिळाली नसल्याची माहिती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिली आहे.

धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प आणि अदानी वीज प्रकल्पाला पाणीपुरवठा करण्यासाठी सिहोरा परिसरातून गेलेल्या वैनगंगा नदीवरील कवलेवाडा गावाचे शेजारी धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प १ आणि २ ला पाणीपुरवठा करण्यासाठी धरणात पाणी अडविण्यात येत आहे. धरणात पाणी अडविण्यात येणार असल्याने सिंचन प्रकल्पाने शेतकऱ्यांचे नद्यांचे काठालगत शेतशिवार करारबद्ध केले आहे.

मात्र सूचना दिली नाही गावातील १२ शेतकऱ्यांनी मालकीच्या शेतात भाजीपाला उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, कवलेवाडा धरणात पाण्याचे साठवणूक क्षमतेत वाढ करण्यास सुरुवात करण्यात आली पण सूचना देण्यात आली नाही.

शेतशिवारात पाणी वैनगंगा नदीचे पात्र तुडुंब भरले आहे. धरणाचे संपूर्ण दरवाजे बंद करण्यात आले आहेत. नदीचे पात्र तुडुंब भरल्याने बपेरा गावाच्या शेतशिवारात शिरल्याने भाजीपाला उत्पादनाचे पीक अक्षरशः बुडाले आहे.

१२ भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसानशेतकऱ्यांचे बागायत शेत बुडाले आहेत. गतवर्षीही अशीच अवस्था या शेतकऱ्यांची झाली होती. मात्र मदतीच्या अपेक्षेत असतानाही त्यांना न्याय मिळालेला नाही.

हे आहेत बुडीत शेतीचे शेतकरी फटका बसलेल्या शेतकऱ्यांमध्ये हिरालाल उपरीकार, वासुदेव उपरीकार, महादेव उपरीकार, तिलकचंद राऊत, शोभाराम राऊत, गुहू आंबेकर, सुरेश जताळे, पुरुषोत्तम उपरीकार, दिलीप मुळे, अजय खंगार, विक्रम बोरघरे, नंदलाल बोरघरे यांचा समावेश आहे. पिकांची नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प २ ची असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.

"धरणात पाण्याच्या साठवणूक क्षमतेत वाढ करण्यात आल्याने बपेरा गावाच्या शेतशिवारात घेण्यात येणारे भाजीपाला उत्पादनाचे पीक बुडाले असून सडले आहेत. शेतशिवार धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प २ सोबत करारबद्ध नाही. यामुळे नुकसाभरपाईची मागणी करण्यात आली आहे."- हिरालाल उपरीकार, शेतकरी, बपेरा.

टॅग्स :bhandara-acभंडाराFarmerशेतकरी