शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

पाण्याअभावी पिकांचे नुकसान

By admin | Updated: November 13, 2014 22:57 IST

तालुक्यातील जांभळी सडक येथील शेतकऱ्यांच्या शेतीला गुढरी जलाशयाचे पाणी मिळाले नाही. परिणामी या शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर

साकोली : तालुक्यातील जांभळी सडक येथील शेतकऱ्यांच्या शेतीला गुढरी जलाशयाचे पाणी मिळाले नाही. परिणामी या शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करुन शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.आधीच निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. मागील वर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत असतांना अधिकाऱ्यांच्या मनमानीचाही सामना या शेतकऱ्यांना करावा लागत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला 'अच्छे दिन आयेंगे'ची स्वप्न दाखविली. त्याचा राजवटीत हेच का अच्छे दिन? अशी म्हणण्याची वेळ जांभळी सडक येथील शेतकऱ्यांवर आली आहे.साकोली तालुक्यातील जांभळी सडक येथील शेतकरी चंद्रशेखर रामटेके, भाऊराव मेश्राम, भाऊराव रामटेके, अशोक नागदेवे, रवि चोपकर, मंगल तिरपुडे, भागवत पात्रीकर, किशोर नंदुरकर यांच्यासह इतर दहा ते बारा शेतकऱ्यांच्या शेतीला पाण्याची गरज होती. गुढरी जलाशयाचे पाणी २९ सप्टेंबरपासून शेतीला सोडण्यात आले.या शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी पोहचलेच नाही. पाण्याअभावी या शेतकऱ्यांचे पीक करपले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी पाणी वाटप करतांना चुकीचे धोरण अवलंबिले. या चुकीच्या धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे या पाणी वाटप प्रक्रियेची संपूर्ण चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. जर दोषी अधिकाऱ्यावर कार्यवाही झाली नाही व नुकसान भरपाई मिळाली नाही तर आंदोलन करु, असा इशाराही शेतकऱ्यांनी निवेदनातून दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)