शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

साकोली, पवनी तालुक्यात दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 22:29 IST

तालुक्यात आतापर्यंत अत्यल्प पावसाची नोंद करण्यात आली. पावसाला सुरुवात होऊनही पुरेशा प्रमाणात पाऊस आलेला नाही. ओलिताखालील क्षेत्रात धानाची रोवणी झाली असली तरी रोवणी वाळत आहे.

ठळक मुद्देपावसाचे तीन नक्षत्र कोरडे : पऱ्हे करपले, पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा केविलवाणा प्रयत्न, दुष्काळसदृश परिस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली/पवनी : तालुक्यात आतापर्यंत अत्यल्प पावसाची नोंद करण्यात आली. पावसाला सुरुवात होऊनही पुरेशा प्रमाणात पाऊस आलेला नाही. ओलिताखालील क्षेत्रात धानाची रोवणी झाली असली तरी रोवणी वाळत आहे. तर कोरडवाहू शेतातील पऱ्हे करपले आहेत. एकंदरीत शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. मात्र पाऊस येईलच व दुबार पेरणी होईलच याचा नेम नाही.गत पाच वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. त्यामुळे शेतकरी आधीच दुष्काळाचा झळा शोषित असून कर्जबाजारी झाले आहेत. आधीचेच कर्ज फेडुन झाले नाही तर आता यावर्षी पुन्हा कर्ज काढले ते कधी फेडून होतील, अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर आली आहे. यावर्षी ओलीताखाली असलेल्या शेतात शेतकऱ्यांनी कशीबशी रोवणी आटोपली. मात्र भारनियमनामुळे केवळ आठ तास वीज पुरवठा होत असल्याने पिकांना पाणी पुरेशा होत नाही. त्यामुळे रोवणीही वाळत आहे, तर दुसरीकडे कोरडवाहू जमीनीतील पऱ्हे करपले आहेत. एकंदरीत शेतकरी अडचणीत सापडला आहे.हवामान खात्याचा अंदाज चुकलायावर्षी वर्तविण्यात आलेले हवामान खात्याचे अंदाज सपशेल खोटे ठरले. रोहिणी नक्षत्रापासून पावसाळा सुरु होत असला तरी मृग, आद्रा व पुनर्वसू हे तिन्ही पाऊस पडणारे नक्षत्र मानुन बळीराजाने खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात केली. आद्रा नक्षत्रात हलका पाऊस झाल्याने भातपिकाचे नियोजन करुन पऱ्हे टाकण्यात आले. आद्रानंतर पुनर्वसू कोरडा गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला. तिन्ही महत्वाचे नक्षत्र कोरडे गेल्याने बळीराजावर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.शेतमालाला भाव नाही, कर्जदारांकडून विमा सक्तिने वसूल करण्यात येते, निसर्ग साथ देत नाही अशा तिहेरी संकटात सापडलेल्या बळीराजाने अशा परिस्थितीचा सामना कसा करावा हा प्रश्न उभा ठाकला आहे.ऋतू पावसाळा मात्र अनुभवायला मिळतो उन्हाळा. धानाचे नाजूक रोपटे प्रचंड तापमानामुळे करपू लागले आहेत. शेतातील विहिरींना, विंधन विहिरींना पाणी नाही. गोसीखुर्द धरणाचे पाणी अपूर्ण लघूकालव्या अभावी शेतापर्यंत पोहचू शकत नाही. अशा परिस्थितीत धानाचे पऱ्हे जगवायचे कसे असा प्रश्न उभा ठाकला आहे. पऱ्हे जगले नाही आणी पाऊस पडला तर दुबार पेरणीसाठी बियाणे कसे मिळणार असाही प्रश्न शेतकरी वर्गाला भेडसावत आहे.भारनियमनात दुजाभावसाकोली तालुक्यात कुठे आठ तास, तर कुठे बारा तास. कुठे २४ तासही विजपुरवठा मिळत आहे. त्यामुळे विज वितरण कंपनी शेतकऱ्यांशी दुजाभाव करीत असून शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहे. हा भेदभाव बंद करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.जलस्रोतांची पातळी खालावलीपावसाळा असुनही पाऊस आला नाही व शेतात सर्वत्र बोरवेलचे पाणी देणे सुरु आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली असून शेतीला पाणी पुरत नाही.