शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

साकोली, पवनी तालुक्यात दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 22:29 IST

तालुक्यात आतापर्यंत अत्यल्प पावसाची नोंद करण्यात आली. पावसाला सुरुवात होऊनही पुरेशा प्रमाणात पाऊस आलेला नाही. ओलिताखालील क्षेत्रात धानाची रोवणी झाली असली तरी रोवणी वाळत आहे.

ठळक मुद्देपावसाचे तीन नक्षत्र कोरडे : पऱ्हे करपले, पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा केविलवाणा प्रयत्न, दुष्काळसदृश परिस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली/पवनी : तालुक्यात आतापर्यंत अत्यल्प पावसाची नोंद करण्यात आली. पावसाला सुरुवात होऊनही पुरेशा प्रमाणात पाऊस आलेला नाही. ओलिताखालील क्षेत्रात धानाची रोवणी झाली असली तरी रोवणी वाळत आहे. तर कोरडवाहू शेतातील पऱ्हे करपले आहेत. एकंदरीत शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. मात्र पाऊस येईलच व दुबार पेरणी होईलच याचा नेम नाही.गत पाच वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. त्यामुळे शेतकरी आधीच दुष्काळाचा झळा शोषित असून कर्जबाजारी झाले आहेत. आधीचेच कर्ज फेडुन झाले नाही तर आता यावर्षी पुन्हा कर्ज काढले ते कधी फेडून होतील, अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर आली आहे. यावर्षी ओलीताखाली असलेल्या शेतात शेतकऱ्यांनी कशीबशी रोवणी आटोपली. मात्र भारनियमनामुळे केवळ आठ तास वीज पुरवठा होत असल्याने पिकांना पाणी पुरेशा होत नाही. त्यामुळे रोवणीही वाळत आहे, तर दुसरीकडे कोरडवाहू जमीनीतील पऱ्हे करपले आहेत. एकंदरीत शेतकरी अडचणीत सापडला आहे.हवामान खात्याचा अंदाज चुकलायावर्षी वर्तविण्यात आलेले हवामान खात्याचे अंदाज सपशेल खोटे ठरले. रोहिणी नक्षत्रापासून पावसाळा सुरु होत असला तरी मृग, आद्रा व पुनर्वसू हे तिन्ही पाऊस पडणारे नक्षत्र मानुन बळीराजाने खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात केली. आद्रा नक्षत्रात हलका पाऊस झाल्याने भातपिकाचे नियोजन करुन पऱ्हे टाकण्यात आले. आद्रानंतर पुनर्वसू कोरडा गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला. तिन्ही महत्वाचे नक्षत्र कोरडे गेल्याने बळीराजावर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.शेतमालाला भाव नाही, कर्जदारांकडून विमा सक्तिने वसूल करण्यात येते, निसर्ग साथ देत नाही अशा तिहेरी संकटात सापडलेल्या बळीराजाने अशा परिस्थितीचा सामना कसा करावा हा प्रश्न उभा ठाकला आहे.ऋतू पावसाळा मात्र अनुभवायला मिळतो उन्हाळा. धानाचे नाजूक रोपटे प्रचंड तापमानामुळे करपू लागले आहेत. शेतातील विहिरींना, विंधन विहिरींना पाणी नाही. गोसीखुर्द धरणाचे पाणी अपूर्ण लघूकालव्या अभावी शेतापर्यंत पोहचू शकत नाही. अशा परिस्थितीत धानाचे पऱ्हे जगवायचे कसे असा प्रश्न उभा ठाकला आहे. पऱ्हे जगले नाही आणी पाऊस पडला तर दुबार पेरणीसाठी बियाणे कसे मिळणार असाही प्रश्न शेतकरी वर्गाला भेडसावत आहे.भारनियमनात दुजाभावसाकोली तालुक्यात कुठे आठ तास, तर कुठे बारा तास. कुठे २४ तासही विजपुरवठा मिळत आहे. त्यामुळे विज वितरण कंपनी शेतकऱ्यांशी दुजाभाव करीत असून शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहे. हा भेदभाव बंद करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.जलस्रोतांची पातळी खालावलीपावसाळा असुनही पाऊस आला नाही व शेतात सर्वत्र बोरवेलचे पाणी देणे सुरु आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली असून शेतीला पाणी पुरत नाही.