शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

गंगा शुद्धीकरणावर कोट्यवधींचा खर्च, वैनगंगा मात्र दुर्लक्षितच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 16:09 IST

Bhandara : काठ चालले खचत, पात्रात दगड व मातीचा थर; सांगा, कधी देणार लक्ष ?

मोहन भोयर तुमसर : तालुक्याची जीवनदायिनी व भंडारा जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील प्रमुख नदी म्हणून ओळखली जाणाऱ्या वैनगंगा नदी सध्या गंभीर संकटातून जात आहे. तुमसर तालुक्यात अनेक ठिकाणी नदीच्या काठांचे मोठ्या प्रमाणात भूस्खलन होत असल्याने शेकडो हेक्टर सुपीक जमीन नदीपात्रात समाविष्ट होत आहे. बेसुमार रेती उत्खननामुळे नदीपात्रात दगड व माती दिसत आहे. यामुळे अनेक ठिकाणी नदीचे पात्रच आता उथल बनले आहे. 

काही ठिकाणी जलप्रवाहात अडथळे निर्माण झाले आहेत. एकीकडे गंगा शुद्धीकरणावर कोट्यवधींचा खर्च होताना दिसत असला तरी, आमची वैनगंगा मात्र दुर्लक्षितच असल्याची खंत आहे. एकीकडे केंद्र सरकार गंगा नदीच्या शुद्धीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करत असताना वैनगंगेसारख्या इतर महत्त्वाच्या नद्यांकडे मात्र सातत्याने दुर्लक्ष असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून होत आहे. यासाठी आता 'वैनगंगा बचाव' मोहीम हाती घेऊन पुढे येण्याची गरज आहे. बेसुमार रेती उत्खननामुळे दरवर्षी नदीकाठाचे भूस्खलन होत आहे. परिणामतः अनेक गावांना दरवर्षी पुराचा धोका वाढला आहे. शेकडो हेक्टर शेती नदीपात्रात समाविष्ट होत आहे असतानाही लोकप्रतिनिधींचे कायम दुर्लक्ष आहे.

शासनाचे दुहेरी मापदंड का?केंद्र सरकारने नमामि गंगे प्रकल्पांतर्गत गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले आहेत. वैनगंगेसारख्या मोठ्या व जनजीवनाशी संबंधित नदीकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. वैनगंगा नदी विदर्भातील लाखो लोकांसाठी पेयजल आणि आणि सिंचनाचे महत्त्वाची स्त्रोत आहे. तरीही वैनगंगेच्या संवर्धनासाठी कुमणी पुढे येऊ नये, ही मोठी शोकांतिका आहे.

तातडीच्या उपायोजना कराल, तरच फायदावैनगंगा नदीला या गंभीर संकटातून वाचविण्यासाठी तातडीच्या उपाययोजनेची गरज आहे. यात भूस्खलन झालेल्या परिसरात सुरक्षा भिंती बांधणे, काठावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे, नदीपात्रातील गाळ काढणे, नदीचे खोलीकरण खर्चीक बाब असल्याने यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा, 'वैनगंगा बचाव अभियान'सारखा प्रकल्प हाती घेतला जावा. अपरिमित वाळूचा उपसा मर्यादित केला जावा. अनेक दुर्मिळ वनस्पती आणि वन्यजीव यांचा अधिवास धोक्यात आला आहे.

भूस्खलनाची भीषणतातुमसर तालुक्यातील बपेरा, मांडवी, रेंगेपार, उमरवाडा, बोरी, कोष्टी, बाम्हणी, माडगी, चारगाव, ढोरवाडा, सुकळी, रोहा यांसारख्या अनेक गावाजवळ वैनगंगा नदीच्या काठांवर मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले आहे. विशेषतः पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर काठांची धूप मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे भूस्खलनाची समस्या अधिक गंभीर बनते. काठावरील झाडे, माती आणि दगड नदीपात्रात कोसळल्याने नदीची परिणामतः उथळ पाणी इतरत्र पसरून थेट गावांपर्यंत पोहचत आहे. भूस्खलनामुळे नदीचे संतुलन बिघडले आहे. नदीकाठावरची जैव विविधता धोक्यात आली आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा