शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

गंगा शुद्धीकरणावर कोट्यवधींचा खर्च, वैनगंगा मात्र दुर्लक्षितच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 16:09 IST

Bhandara : काठ चालले खचत, पात्रात दगड व मातीचा थर; सांगा, कधी देणार लक्ष ?

मोहन भोयर तुमसर : तालुक्याची जीवनदायिनी व भंडारा जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील प्रमुख नदी म्हणून ओळखली जाणाऱ्या वैनगंगा नदी सध्या गंभीर संकटातून जात आहे. तुमसर तालुक्यात अनेक ठिकाणी नदीच्या काठांचे मोठ्या प्रमाणात भूस्खलन होत असल्याने शेकडो हेक्टर सुपीक जमीन नदीपात्रात समाविष्ट होत आहे. बेसुमार रेती उत्खननामुळे नदीपात्रात दगड व माती दिसत आहे. यामुळे अनेक ठिकाणी नदीचे पात्रच आता उथल बनले आहे. 

काही ठिकाणी जलप्रवाहात अडथळे निर्माण झाले आहेत. एकीकडे गंगा शुद्धीकरणावर कोट्यवधींचा खर्च होताना दिसत असला तरी, आमची वैनगंगा मात्र दुर्लक्षितच असल्याची खंत आहे. एकीकडे केंद्र सरकार गंगा नदीच्या शुद्धीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करत असताना वैनगंगेसारख्या इतर महत्त्वाच्या नद्यांकडे मात्र सातत्याने दुर्लक्ष असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून होत आहे. यासाठी आता 'वैनगंगा बचाव' मोहीम हाती घेऊन पुढे येण्याची गरज आहे. बेसुमार रेती उत्खननामुळे दरवर्षी नदीकाठाचे भूस्खलन होत आहे. परिणामतः अनेक गावांना दरवर्षी पुराचा धोका वाढला आहे. शेकडो हेक्टर शेती नदीपात्रात समाविष्ट होत आहे असतानाही लोकप्रतिनिधींचे कायम दुर्लक्ष आहे.

शासनाचे दुहेरी मापदंड का?केंद्र सरकारने नमामि गंगे प्रकल्पांतर्गत गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले आहेत. वैनगंगेसारख्या मोठ्या व जनजीवनाशी संबंधित नदीकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. वैनगंगा नदी विदर्भातील लाखो लोकांसाठी पेयजल आणि आणि सिंचनाचे महत्त्वाची स्त्रोत आहे. तरीही वैनगंगेच्या संवर्धनासाठी कुमणी पुढे येऊ नये, ही मोठी शोकांतिका आहे.

तातडीच्या उपायोजना कराल, तरच फायदावैनगंगा नदीला या गंभीर संकटातून वाचविण्यासाठी तातडीच्या उपाययोजनेची गरज आहे. यात भूस्खलन झालेल्या परिसरात सुरक्षा भिंती बांधणे, काठावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे, नदीपात्रातील गाळ काढणे, नदीचे खोलीकरण खर्चीक बाब असल्याने यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा, 'वैनगंगा बचाव अभियान'सारखा प्रकल्प हाती घेतला जावा. अपरिमित वाळूचा उपसा मर्यादित केला जावा. अनेक दुर्मिळ वनस्पती आणि वन्यजीव यांचा अधिवास धोक्यात आला आहे.

भूस्खलनाची भीषणतातुमसर तालुक्यातील बपेरा, मांडवी, रेंगेपार, उमरवाडा, बोरी, कोष्टी, बाम्हणी, माडगी, चारगाव, ढोरवाडा, सुकळी, रोहा यांसारख्या अनेक गावाजवळ वैनगंगा नदीच्या काठांवर मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले आहे. विशेषतः पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर काठांची धूप मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे भूस्खलनाची समस्या अधिक गंभीर बनते. काठावरील झाडे, माती आणि दगड नदीपात्रात कोसळल्याने नदीची परिणामतः उथळ पाणी इतरत्र पसरून थेट गावांपर्यंत पोहचत आहे. भूस्खलनामुळे नदीचे संतुलन बिघडले आहे. नदीकाठावरची जैव विविधता धोक्यात आली आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा