शहरं
Join us  
Trending Stories
1
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून थक्क व्हाल
2
मुंबई: ठाकरे गटाच्या पेडणेकर, दुधवडकरांसह आठ जणांची उमेदवारी धोक्यात; प्रभाग आरक्षणाचा फटका
3
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
4
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
5
VIRAL : गर्लफ्रेंडच्या हातात हात घालून हॉटेल बाहेर आला; पत्नीने बघताच भर रस्त्यात धुतला! व्हिडीओ व्हायरल
6
India Vs China: भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख विकास इंजिन, चीनची वाढ संथ; पाहा काय म्हणाल्या IMF प्रमुख
7
वर्षाला २० लाखाचं पॅकेज, ५ महिन्यापूर्वी केले लव्ह मॅरेज; २८ वर्षीय युवकानं स्वत:ला का संपवलं?
8
स्वतःवर गोळी झाडणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याची IAS पत्नी आली समोर; एफआयआर दाखल, कुणावर केले आरोप?
9
चातुर्मासाची शेवटची संकष्ट चतुर्थी: गणेश कल्याण करेल, शुभ घडेल; पाहा, व्रत विधी-चंद्रोदय वेळ
10
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टी २५ हजारांच्या वर; Cipla, Zomato, Dr Reddy's मध्ये खरेदी
11
५ राजयोगात संकष्ट चतुर्थी: १० राशींची इच्छा पूर्ण, मान-सन्मान; यश-कीर्ती-लाभ, शुभ-वरदान काळ!
12
IND W vs SA W ICC Women's ODI World Cup Live Streaming : टीम इंडियाला हॅटट्रिकसह टेबल टॉपर होण्याची संधी, पण..
13
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
14
"भाई, ती मुलगी नाही...एक पंजा अन्...!"; थेट वाघोसोबतच 'लिप लॉक' करताना दिसला तरुण, Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल
15
घरबसल्या महिन्याला ₹९२५० ची कमाई करुन देणारी पोस्टाची स्कीम! पण एक चूक पडेल भारी, बसू शकतो ३० हजारांचा फटका
16
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
17
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
18
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
19
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
20
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!

७ हजार ५३९ हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका

By admin | Updated: March 4, 2015 01:03 IST

रविवारी मध्यरात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील ७ हजार ५३९ हेक्टर क्षेत्रातील

कृषी विभागाचा नजरअंदाज अहवालभंडारा, साकोली, लाखांदूर तालुक्यात सर्वाधिक नुकसानभंडारा : रविवारी मध्यरात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील ७ हजार ५३९ हेक्टर क्षेत्रातील पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसानीचा फटका बसला आहे. यात भंडारा, साकोली व लाखांदूर तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने गहू, हरभरा व लाखोळी पिकांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याच्या दृष्टीने जिल्हा कृषीविभागाने शासनाकडे या संबंधात नजरअंदाज अहवाल बनविला आहे. जिल्ह्यात रब्बी पिकांची पेरणी आटोपत असतानाच शेतातील पिके कापणीयोग्य झाली होती. जिल्ह्यात गहू पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली आहे. सध्या गव्हाची ओंबी आल्याने ती कापणीयोग्य झाली असतानाच रविवारी मुसळधार पावसाचे आगमन झाले. गहू, हरभरा व लाखोळीचे रब्बी हंगामात मोठ्या हंगामात उत्पादन घेतल्या जाते. यासोबतच काही ठिकाणी बागायती शेती करण्यात येते. मात्र अवकाळी पावसामुळे या पिकांना मोठ्या पिकांना फटका बसला आहे. रविवारी मध्यरात्री भंडारा, साकोली व लाखांदूर तालुक्यात अतिवृष्टी झाली. यामुळे येथील शेतीत कापणीयोग्य असलेल्या गहू पिकाचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी यादृष्टीने जिल्हा परिषद कृषी विभागाच्या माध्यमातून पंचायत समिती स्तरावर असलेल्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून प्राथमिक नजरअंदाज अहवाल मागितला आहे. या अहवालात ७ हजार ५३९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचे नमूद आहे. यात ५० टक्केच्या आत ६ हजार १७९ हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान झाले असून ५० टक्केच्या वरील १ हजार ३६० हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसानीचा फटका साकोली तालुक्याला बसला असून त्या खालोखाल भंडारा व लाखांदूर तालुक्यात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देता यावी यासाठी कृषी विभागाने अधिनस्थ कर्मचाऱ्यांना निर्देश दिले आहेत. अवकाळी पावसात बहरलेला आंब्याचा मोहोर गळून पडला आहे. यासोबतच काही भागात बागायती शेतीत संत्राचेही उत्पादन घेण्यात येते. तुमसर तालुक्यात संत्रा शेतीलाही याचा फटका बसला आहे. भाजीपाला पिकाचीही पावसामुळे नासाडी झाली आहे. (शहर प्रतिनिधी)अवकाळी पावसामुळे शेतीपिकाचे नुकसान झाले आहे. बळीराजाला नुकसान भरपाई तातडीने मिळावी यासाठी ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यकांच्या संयुक्त मदतीने सर्व्हेक्षण करण्यात येईल. आठवडाभरात याचा अहवाल प्राप्त होईल. शासनाकडून शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी कृषी विभाग प्रयत्नरत राहील. - एस.एस. किरवे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा.तालुकानिहाय नुकसान भंडारा तालुक्यात १ हजार ३२७ हेक्टर क्षेत्रातील पिकांना नुकसानीचा फटका बसला आहे. यासोबतच मोहाडी ५०० हेक्टर, तुमसर ६०० हेक्टर, साकोली ३८५२ हेक्टर, लाखांदूर १२६० हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून पवनी व लाखनी तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.