शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
6
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
7
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
8
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
9
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
10
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
11
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
12
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
13
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
14
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
15
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
16
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
17
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
18
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
19
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
20
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी

विजेच्या धक्याने गाय, म्हैश ठार; तीन घरांचे अंशत: नुकसान

By युवराज गोमास | Updated: April 11, 2024 17:05 IST

जिल्ह्यात आठवडाभरापासून अवकाळी वादळी पावसाचा तडाखा बसतो आहे. ४३ अंशावर पोहचलेली पारा एकदम ३१ अंशावर उतरला आहे.

भंडारा : जिल्ह्यात ११ एप्रिल रोजी वादळी पावसासह वीज कोसळल्याने दोन पशुंची हानी झाली. मोहाडी तालुक्यातील मौजा रोहणा येथील भाष्कर दामू पोटफोटे यांची म्हैश तर लाखनी तालुक्यातील मेंगापूर येथील सत्यपाल विठोंबा खंडाईत यांची गाय बुधवारला रात्रीच्या सुमारास विजेच्या धक्याने मरण पावली. मोहाडी व तुमसर तालुक्यात ३ घरांचे अंशत: नुकसान झाले. पारा ३१ अंशावर उतरला. निवडणूक प्रचाराला अडथळा आला असून पिकांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात आठवडाभरापासून अवकाळी वादळी पावसाचा तडाखा बसतो आहे. ४३ अंशावर पोहचलेली पारा एकदम ३१ अंशावर उतरला आहे. थंडी वाजायला सुरूवात झाली आहे. बुधवारला मध्यरात्रीपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. ग्रामीण, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय महामर्गावर ठिकठिकाणी पाणी साचून चिखलाचे साम्राज्य पहावयास मिळाले. लग्न सोहळे व लोकसभा निवडणुकांच्या प्रचारावर परिणाम जाणवला. उन्हाळी पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे.जिल्ह्यात सध्या भंडारा-गाेंदिया लोकसभा मतदार संघासाठी प्रचाराला वेग आला आहे. उमेदवारांची प्रत्येक गावात पोहचण्याची धडपड सुरू आहे. परंतु, निवडणुकांच्या रणधुमाळीत वातावरणाचा अडथळा येत आहे. प्रचारसभा सुरू असताना वादळी वारा व पाऊस होत असल्याने मतदार घराकडे पळ घेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. बुधवारला सकाळच्या सुमारास पाऊस बरसत राहिल्याने उमेदवारांना प्रचार सभा घेता आल्या नाहीत.

रस्त्यांवर पडलेल्या खोल खड्ड्यांत पाणी साचल्याने चिखलातून वाहने घसरून अनेकजण किरकोळ जखमी झाले. लोंबीवर असलेला धान पीक जमिनीवर लोळला. फुलांवर असलेल्या उन्हाळी मूंगाचे मोठे नुकसान झाले.आठवडी बाजारांना फटका

ग्रामीण भागात अनेक ठिकाणी आठवडी बाजार भरतात. परंतु, ऐन बाजाराच्यावेळी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसत असल्याने व्यावसायिकांची तारांबळ उडत आहे. शिवाय ग्राहकांची संख्या रोडावत असल्याने व्यावसायिक नुकसानही होत आहे.बॉक्स

वीटभट्टी व्यावसायिकांचे मोडले कंबरडे

जिल्ह्यात वीटभट्टी व्यवसायातून ग्रामीणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो. परंतु, आठवड्यापासून होत असलेल्या अवकाळीने कच्च्या विटांचे नुकसान होत आहे. नुकसान वाढण्याच्या भीतीने व्यावसायिकांनी विटभट्टीचा व्यवसाय थांबविल्याने ग्रामिणांचा रोजगार बुडाला आहे.जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह वादळी अवकाळी पाऊस बरसत असल्याने नागरिकांनी सावध असावे. वीज लखलखत असताना घराबाहेर जाण्याचे टाळावे. वादळी वाऱ्यात झाडांखाली थांबू नये. हवामान खात्याचा अंदाज घेत शेतीच्या कामांचे नियोजन करावे. - अभिषेक नामदास, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, भंडारा.

टॅग्स :Rainपाऊस