शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

विजेच्या धक्याने गाय, म्हैश ठार; तीन घरांचे अंशत: नुकसान

By युवराज गोमास | Updated: April 11, 2024 17:05 IST

जिल्ह्यात आठवडाभरापासून अवकाळी वादळी पावसाचा तडाखा बसतो आहे. ४३ अंशावर पोहचलेली पारा एकदम ३१ अंशावर उतरला आहे.

भंडारा : जिल्ह्यात ११ एप्रिल रोजी वादळी पावसासह वीज कोसळल्याने दोन पशुंची हानी झाली. मोहाडी तालुक्यातील मौजा रोहणा येथील भाष्कर दामू पोटफोटे यांची म्हैश तर लाखनी तालुक्यातील मेंगापूर येथील सत्यपाल विठोंबा खंडाईत यांची गाय बुधवारला रात्रीच्या सुमारास विजेच्या धक्याने मरण पावली. मोहाडी व तुमसर तालुक्यात ३ घरांचे अंशत: नुकसान झाले. पारा ३१ अंशावर उतरला. निवडणूक प्रचाराला अडथळा आला असून पिकांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात आठवडाभरापासून अवकाळी वादळी पावसाचा तडाखा बसतो आहे. ४३ अंशावर पोहचलेली पारा एकदम ३१ अंशावर उतरला आहे. थंडी वाजायला सुरूवात झाली आहे. बुधवारला मध्यरात्रीपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. ग्रामीण, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय महामर्गावर ठिकठिकाणी पाणी साचून चिखलाचे साम्राज्य पहावयास मिळाले. लग्न सोहळे व लोकसभा निवडणुकांच्या प्रचारावर परिणाम जाणवला. उन्हाळी पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे.जिल्ह्यात सध्या भंडारा-गाेंदिया लोकसभा मतदार संघासाठी प्रचाराला वेग आला आहे. उमेदवारांची प्रत्येक गावात पोहचण्याची धडपड सुरू आहे. परंतु, निवडणुकांच्या रणधुमाळीत वातावरणाचा अडथळा येत आहे. प्रचारसभा सुरू असताना वादळी वारा व पाऊस होत असल्याने मतदार घराकडे पळ घेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. बुधवारला सकाळच्या सुमारास पाऊस बरसत राहिल्याने उमेदवारांना प्रचार सभा घेता आल्या नाहीत.

रस्त्यांवर पडलेल्या खोल खड्ड्यांत पाणी साचल्याने चिखलातून वाहने घसरून अनेकजण किरकोळ जखमी झाले. लोंबीवर असलेला धान पीक जमिनीवर लोळला. फुलांवर असलेल्या उन्हाळी मूंगाचे मोठे नुकसान झाले.आठवडी बाजारांना फटका

ग्रामीण भागात अनेक ठिकाणी आठवडी बाजार भरतात. परंतु, ऐन बाजाराच्यावेळी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसत असल्याने व्यावसायिकांची तारांबळ उडत आहे. शिवाय ग्राहकांची संख्या रोडावत असल्याने व्यावसायिक नुकसानही होत आहे.बॉक्स

वीटभट्टी व्यावसायिकांचे मोडले कंबरडे

जिल्ह्यात वीटभट्टी व्यवसायातून ग्रामीणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो. परंतु, आठवड्यापासून होत असलेल्या अवकाळीने कच्च्या विटांचे नुकसान होत आहे. नुकसान वाढण्याच्या भीतीने व्यावसायिकांनी विटभट्टीचा व्यवसाय थांबविल्याने ग्रामिणांचा रोजगार बुडाला आहे.जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह वादळी अवकाळी पाऊस बरसत असल्याने नागरिकांनी सावध असावे. वीज लखलखत असताना घराबाहेर जाण्याचे टाळावे. वादळी वाऱ्यात झाडांखाली थांबू नये. हवामान खात्याचा अंदाज घेत शेतीच्या कामांचे नियोजन करावे. - अभिषेक नामदास, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, भंडारा.

टॅग्स :Rainपाऊस