शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
2
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
3
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
4
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
5
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
6
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
8
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
9
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
10
'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजींच्या भूमिकेत कोण दिसणार? सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, "आम्हाला..."
11
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
12
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
13
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
14
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
15
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
16
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
17
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
18
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
19
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
20
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा

जिल्हा हागणदारीमुक्तीसाठी सहकार्य करा

By admin | Updated: October 18, 2015 00:21 IST

सन २०१९ पर्यंत संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी लोकचळवळीच्या माध्यमातून कार्य करायाचे आहे.

सहभाग वाढविण्यासाठी सभा : मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आवाहनभंडारा : सन २०१९ पर्यंत संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी लोकचळवळीच्या माध्यमातून कार्य करायाचे आहे. याकरिता जिल्ह्यातील संपूर्ण जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी व ग्रामपंचायत स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी केले.येथील जिल्हा परिषद सभागृहात जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी, अधिकारी यांचा सहभाग वाढविण्याकरिता घेण्यात आलेल्या सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, उपाध्यक्ष राजेश डोंगरे, आरोग्य व बांधकाम समिती सभापती विनायक बुरडे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती नरेश डहारे, समाज कल्याण समिती सभापती निळकंठ टेकाम, बालकल्याण समिती सभापती शुभांगी रहांगडाले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) सुधीर वाळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) सुधाकर आडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) रामदास धांडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) राठोड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी केदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डोईफोडे, कार्यकारी अभियंता (बांधकाम) सेलोकर, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा) मैदमवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी शेंडे व विभाग प्रमुख आदींची मंचकावर उपस्थित होती. मुख्य कार्यपालन अधिकारी निंबाळकर म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रचंड महत्वकांक्षेनी स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाची आॅक्टोबर २०१४ पासून सुरुवात केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे १५० व्या जयंतीचे औचित्य साधून २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत संपूर्ण हागणदारीमुक्त करावयाचा आहे. जिल्हा परिषद भंडारा यामध्ये देखील मागील वर्षापासून कार्यक्रम सुरु झालेला आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. यावेळी त्यांनी सदर कार्यक्रमाचा उद्देश, महत्व तसेच त्या संदर्भातील भंडारा जिल्ह्याची सद्यस्थिती व सन २०१९ जिल्हा हागणदारीमुक्त करणे संदर्भात करावयाची उपाययोजना या संदर्भात सर्व उपस्थित पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, विभाग प्रमुख, गविअ व अन्य अधिकारी यांचे समोर सादरीकरण करून सर्वांना या मोहिमेमध्ये सक्रीय सहभाग घेऊन अभियान यशस्वी करण्याबाबत आवाहन केले. (नगर प्रतिनिधी)