शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
4
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
5
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
6
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
7
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
8
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
9
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
11
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
12
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
13
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
14
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
15
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
16
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
17
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
18
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
19
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
20
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका

विहिरी, तलाव व बोड्यांमध्ये ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:53 IST

करडी परिसर लहान मोठ्या २८ तलावांनी समृध्द आहे. मात्र, यातील मध्यम प्रकल्पांना अखेरची घरघर लागली आहे. घोटभर पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. लहान तलाव व बोड्यांत पाण्याचा ठणठणाट आहे.

ठळक मुद्दे भूगर्भातील पाणी आटले : कोरडा दुष्काळ, जलसंधारणाच्या कामांना अपुरा निधी, अतिक्रमण जैसे थे

युवराज गोमासे ।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : करडी परिसर लहान मोठ्या २८ तलावांनी समृध्द आहे. मात्र, यातील मध्यम प्रकल्पांना अखेरची घरघर लागली आहे. घोटभर पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. लहान तलाव व बोड्यांत पाण्याचा ठणठणाट आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी २० फुटाने खाली गेल्याचा परिणाम सर्वांना भोगावा लागत आहे.गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. यावर्षी जलयुक्त शिवार योजनेत सात गावांचा समावेश आहे. मात्र, तलाव खोलीकरणासाठी मिळणारा निधी तीन ते सहा लाख रुपयांचा असल्याने खोलीकरणाचे नावावर दिशाभूल केली जात असल्याची ओरड आहे.करडी परिसर कोका वन्यजीव अभयारण्य व वैनगंगा नदीच्या मध्यभागी वसलेला आहे. वनांनी समृध्द परिसरात तलावांची संख्याही मोठी आहे. मात्र, तलावांच्या अस्तित्वात प्रश्न निर्माण झाल्याने पाण्याचा भीषण प्रश्न उद्भवला आहे. निव्वळ पाण्याचीच नव्हे तर वापराच्या पाण्यासाठी सुध्दा समस्या आहे. करडी परिसरात मोजून लहान मोठे तलाव व बोड्यांची संख्या २८ आहे. परिसरातील देव्हाडा, नरसिंगटोला, देव्हाडा बुज, निलज खुर्द, निलज बुज, मोहगाव, नवेगाव, दवडीपार, करडी, जांभोरा, किसनपूर, लेंडेझरी, केसलवाडा, खडकी पालोरा, बोंडे, मुंढरी बुज, मुंढरी खुर्द, कान्हाळगाव, बोरगाव, ढिवरवाडा आदी गावात ही तलाव आहेत.कधी न आटणारे ढिवरवाडा, केसलवाडा, जांभोरा, किसनपूर येथील तलाव अखेरच्या घटका मोजत आहेत. लहान तलाव व बोड्या पाण्याविणा कोरडे पडले आहेत. या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. अतिक्रमण शेतकऱ्यांनीच केल्याने तलवांचे रुपांतर बोड्यात झाले आहेत. बोड्या नामशेष होण्याच्या मार्गात आहेत.खोलीकरणासाठी मिळणारा निधी अपुराजलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून सन २०१५-१६ मध्ये परिसरातील चार गावे जलयुक्त शिवार योजनेत करडी, मोहगाव, देव्हाडा, बोरी-पांजरा गावांचा समावेश करण्यात आला. करडी गावातील गणपती तलावाला दोन टप्प्यात सुमारे ४० लाखांचा निधी दिला गेला. त्यामुळे तलावाचे योग्य खोलीकरण होवून एक ‘मॉडेल’ तलाव तयार झाले. फक्त गणपती तलाव वगळता सर्वत्र पाण्याचा दुष्काळ आहे. सन २०१७-१८ मध्ये परिसरातील पालोरा, खडकी बोंडे, डोंगरदेव, नवेगाव, जांभळपाणी आदी गावांचा समावेश आहे. मात्र, या गावांना खोलीकरणासाठी मिळालेला निधी ३ ते ६ लाखांचा असल्याने कामे पूर्णत: होत नसल्याची ओरड आहे.अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकाराची गरजजिल्हा परिषदेच्या अधिनस्थ असलेल्या मामा तलावात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेली आहेत. अतिक्रमणामुळे तलावांची सिंचन क्षमता बेताची आहे. तलावात शेती तयार करण्यात आल्याने गोंधळाचे वातावरण आहे. तलावांची मोजणी करण्याची व अतिक्रमण काढण्याची वारंवार मागणी होत असतांना जिल्हा परिषदेचे याकडे दुर्लक्ष आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई