शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विहिरी, तलाव व बोड्यांमध्ये ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:53 IST

करडी परिसर लहान मोठ्या २८ तलावांनी समृध्द आहे. मात्र, यातील मध्यम प्रकल्पांना अखेरची घरघर लागली आहे. घोटभर पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. लहान तलाव व बोड्यांत पाण्याचा ठणठणाट आहे.

ठळक मुद्दे भूगर्भातील पाणी आटले : कोरडा दुष्काळ, जलसंधारणाच्या कामांना अपुरा निधी, अतिक्रमण जैसे थे

युवराज गोमासे ।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : करडी परिसर लहान मोठ्या २८ तलावांनी समृध्द आहे. मात्र, यातील मध्यम प्रकल्पांना अखेरची घरघर लागली आहे. घोटभर पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. लहान तलाव व बोड्यांत पाण्याचा ठणठणाट आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी २० फुटाने खाली गेल्याचा परिणाम सर्वांना भोगावा लागत आहे.गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. यावर्षी जलयुक्त शिवार योजनेत सात गावांचा समावेश आहे. मात्र, तलाव खोलीकरणासाठी मिळणारा निधी तीन ते सहा लाख रुपयांचा असल्याने खोलीकरणाचे नावावर दिशाभूल केली जात असल्याची ओरड आहे.करडी परिसर कोका वन्यजीव अभयारण्य व वैनगंगा नदीच्या मध्यभागी वसलेला आहे. वनांनी समृध्द परिसरात तलावांची संख्याही मोठी आहे. मात्र, तलावांच्या अस्तित्वात प्रश्न निर्माण झाल्याने पाण्याचा भीषण प्रश्न उद्भवला आहे. निव्वळ पाण्याचीच नव्हे तर वापराच्या पाण्यासाठी सुध्दा समस्या आहे. करडी परिसरात मोजून लहान मोठे तलाव व बोड्यांची संख्या २८ आहे. परिसरातील देव्हाडा, नरसिंगटोला, देव्हाडा बुज, निलज खुर्द, निलज बुज, मोहगाव, नवेगाव, दवडीपार, करडी, जांभोरा, किसनपूर, लेंडेझरी, केसलवाडा, खडकी पालोरा, बोंडे, मुंढरी बुज, मुंढरी खुर्द, कान्हाळगाव, बोरगाव, ढिवरवाडा आदी गावात ही तलाव आहेत.कधी न आटणारे ढिवरवाडा, केसलवाडा, जांभोरा, किसनपूर येथील तलाव अखेरच्या घटका मोजत आहेत. लहान तलाव व बोड्या पाण्याविणा कोरडे पडले आहेत. या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. अतिक्रमण शेतकऱ्यांनीच केल्याने तलवांचे रुपांतर बोड्यात झाले आहेत. बोड्या नामशेष होण्याच्या मार्गात आहेत.खोलीकरणासाठी मिळणारा निधी अपुराजलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून सन २०१५-१६ मध्ये परिसरातील चार गावे जलयुक्त शिवार योजनेत करडी, मोहगाव, देव्हाडा, बोरी-पांजरा गावांचा समावेश करण्यात आला. करडी गावातील गणपती तलावाला दोन टप्प्यात सुमारे ४० लाखांचा निधी दिला गेला. त्यामुळे तलावाचे योग्य खोलीकरण होवून एक ‘मॉडेल’ तलाव तयार झाले. फक्त गणपती तलाव वगळता सर्वत्र पाण्याचा दुष्काळ आहे. सन २०१७-१८ मध्ये परिसरातील पालोरा, खडकी बोंडे, डोंगरदेव, नवेगाव, जांभळपाणी आदी गावांचा समावेश आहे. मात्र, या गावांना खोलीकरणासाठी मिळालेला निधी ३ ते ६ लाखांचा असल्याने कामे पूर्णत: होत नसल्याची ओरड आहे.अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकाराची गरजजिल्हा परिषदेच्या अधिनस्थ असलेल्या मामा तलावात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेली आहेत. अतिक्रमणामुळे तलावांची सिंचन क्षमता बेताची आहे. तलावात शेती तयार करण्यात आल्याने गोंधळाचे वातावरण आहे. तलावांची मोजणी करण्याची व अतिक्रमण काढण्याची वारंवार मागणी होत असतांना जिल्हा परिषदेचे याकडे दुर्लक्ष आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई