शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

अत्यल्प मानधनावर राबतात स्वयंपाकी महिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 06:00 IST

राज्यातील जिल्हा परिषद व खाजगी प्राथमिक, माध्यमिक शाळेत गेल्या २२ वर्षांपासून राबविली जात आहे. ग्रामीण भागात सहा ते १४ वयोगटातील इयत्ता पहिली ते आठवी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत दुपारी भोजन दिले जाते. आहार शिजविण्यासाठी विद्यार्थी संख्येनुसार महिला स्वयंपाकीची निवड शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातुन केली जाते.

ठळक मुद्देशालेय पोषण आहार योजना : केवळ दीड हजार रुपये मिळते मानधन

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : शालेय पोषण आहार योजनेसाठी राबराब राबणाऱ्या स्वंयपाकी महिलांना अत्याल्प मानधनावर काम करावे लागत असून महागाईच्या काळात त्यांना केवळ दीड हजार रुपये मानधन दिले जाते. त्यामुळे जिल्ह्यातील पोषण आहर शिजविणाºया महिलांमध्ये असंतोष पसरला आहे.राज्यातील जिल्हा परिषद व खाजगी प्राथमिक, माध्यमिक शाळेत गेल्या २२ वर्षांपासून राबविली जात आहे. ग्रामीण भागात सहा ते १४ वयोगटातील इयत्ता पहिली ते आठवी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत दुपारी भोजन दिले जाते. आहार शिजविण्यासाठी विद्यार्थी संख्येनुसार महिला स्वयंपाकीची निवड शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातुन केली जाते. भंडारा जिल्ह्यात दोन हजारांच्या वर स्वयंपाकी शाळातून कार्यरत आहेत. स्वयंपाकींना दरमहा हजार रुपये मानधन दिले जात होते. एप्रिल २०१९ पासून शिक्षण विभागाने निर्णय घेऊन त्यांचे मानधन दीड हजार रुपये केले.स्वयंपाकी महिलांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. शाळासुरु झाल्यापासून म्हणजे सकाळी ११ वाजेपासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कामे करावी लागतात. शासनाने किमान वेतन कायदा तयार केला. परंतु आहार शिजविणाºया स्वयंपाकींना अल्प मानधनावर राबवून शासन त्यांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याचे दिसून येते. आहार शिजविणाºया महिला स्वयंपाकी या एक कर्मचारी आहेत. शाळेत आल्यापासून त्या अन्न शिजविण्याचे काम, तांदुळ व धान्याची साफसफाई करणे, विद्यार्थ्यांना आहाराचे वाटप, जेवणाच्या जागेवर करणे, आहार वाटपानंतर जागेची साफसफाई करणे, उरलेल्या अन्नाची विल्हेवाट लावणे, भांड्याची साफसफाई करणे, ताटांची स्वच्छता करणे, पिण्याचे पाणी भरणे, विद्यार्थ्यांना पाणी देणे, अन्न शिजविणाºया यंत्रणेच्या आहारविषयक नोंदी ठेवण्याचे कामे स्वयंपाकींना करावे लागते. सदर कामे दिवसभर चालतात.स्वयंपाकींना दरमहा पाच हजार रुपये मानधनाऐवजी किमान वेतन, सामाजिक सुरक्षतेच्या योजना स्वयंपाकीसाठी राबविणे, त्यांना गणवेश व परिचय पत्र देण्याच्या मागण्या स्वयंपाकीच्या आयटक प्रणित पोषण आहार कर्मचारी युनियनद्वारे करण्यात आलेले आहेत.महिला मागणार शासनाकडे दादआहार शिजविणाºया कर्मचाऱ्यांना वर्षभरातून दहा महिन्याचे मानधन दिले जाते. त्यांच्या निवडीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला आहेत. शालेय प्रशासनाकडून शाळेची कामे स्वयंपाकी महिलाकडून केली जातात. काही ठिकाणी अभद्र वागणुकही दिली जाते. अन्य मानधनावर काम केल्यामुळे त्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करु शकत नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सदर महिलांना न्याय मिळावा याकरिता शासनाकडे महिला स्वयंपाकी दाद मागत आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र