शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

उपकेंद्र सुरु केल्यास मलेरियावर नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 05:00 IST

प्रतिबंध लावण्यात जिल्हा आरोग्य विभाग पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र आहे. या भागातील परिस्थितीचा विचार केला तर ग्राम दंडारी येथे मंजूर झालेले आरोग्य उपकेंद्र सुरु केल्यास मलेरियाला बऱ्याच प्रमाणात प्रतिबंध लावणे शक्य होवू शकते. पण त्यासाठी आरोग्य विभागाच्या प्रबळ इच्छा शक्तीची गरज आहे.

ठळक मुद्देतपासणी मोहीम राबवा : आरोग्य विषयक जनजागृतीवर भर देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : गोंदिया जिल्ह्यात मलेरियाच्या एकूण रुग्णांपैकी ४० टक्के रुग्ण केवळ प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा येथे आढळतात. ही समस्या दरवर्षीच निर्माण होते. मात्र याला प्रतिबंध लावण्यात जिल्हा आरोग्य विभाग पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र आहे. या भागातील परिस्थितीचा विचार केला तर ग्राम दंडारी येथे मंजूर झालेले आरोग्य उपकेंद्र सुरु केल्यास मलेरियाला बऱ्याच प्रमाणात प्रतिबंध लावणे शक्य होवू शकते. पण त्यासाठी आरोग्य विभागाच्या प्रबळ इच्छा शक्तीची गरज आहे.तालुक्यात एकूण ४ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २२ उपकेंद्रांचा समावेश आहे. २२ उपकेंद्र मिळून आतापर्यंत ६१ मलेरिया रूग्ण तालुक्यात आढळले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, यापैकी निम्मे रूग्ण केवळ दरेकसा उपकेंद्रातील आहे. इतर २१ उपकेंद्रात अर्ध्या रुग्णांचा समावेश आहे. जुलै महिन्यात दरेकसा उपकेंद्रात सर्वाधिक मलेरिया रूग्ण सापडले आहेत ही चिंतेची बाब आहे. मलेरिया रुग्ण मोठ्या प्रमाणावर मुरकुटडोह दंडारी गावाकडून येत असतात आणि येता-येता इतर अनेक लोकांना मलेरियाचा संसर्ग करीत असतात. दरेकसा आरोग्य उपकेंद्रातून मुरकुटडोह दंडारीच्या ५ गावांना वेगळे करुन दंडारी येथे मंजूर असलेले नवीन आरोग्य उपकेंद्र सुरु केल्यास दंडारी, टेकाटोला, मुरकुटडोह १, २, ३ अशा एकूण ५ गावांना याचा लाभ मिळेल. उपकेंद्रात २ आरोग्य सेविका व १ आरोग्य सेवक लाभेल तसेच नुकतेच शासनाने प्रत्येक उपकेंद्रात एका डॉक्टरची सोय करुन देण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी सुद्धा डॉक्टरची स्थायी सोय झाल्यास लोकांना वेळीच औषध उपचार मिळण्यास मदत होईल. दरेकसा येथे जाण्यासाठी खडतर मार्गावर पायपीट करावी लागणार नाही. गावातच रक्त नमूने घेतल्यास मलेरियाचे संक्रमण रोखण्यास मदत होईल. यावर विचार करण्याची गरज आहे.स्वच्छताविषयक जनजागृतीची गरजएनाक्युलीस मादी डासांच्या चावल्याने एका व्यक्तीपासून दुसºया व्यक्तीला मलेरियाचा संसर्ग होतो. अशा डासांचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी स्वच्छता व डासनाशक फवारणी करणे आवश्यक आहे. यासाठी मोहीम राबविण्याची गरज आहे. प्रकृती बिघडली की इथले लोक औषधोपचारपेक्षा झाडफूक करणाºयावर जास्त विश्वास ठेवतात. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळाल्यास त्यांना यासर्व गोष्टींपासून दूर ठेवण्यास मदत होईल.रक्त तपासणी मोहीम राबवावीजवळपास एक हजार लोकसंख्या असलेल्या ५ गावांमध्ये आशा, आरोग्य सेविका व अंगणवाडी सेविका इत्यादी घटकांच्या माध्यमातून प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीचे रक्त नमूने घेवून मलेरियाची तपासणी व औषधोपचार केल्यास मलेरियाचा संसर्ग थांबविण्यास मदत होईल. तसेच इतर गावातून येणारे किंवा सीमे पलिकडील मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील गावातून येणाºया लोकांवर नजर ठेवून त्यांना आरोग्य तपासणीसाठी बाध्य करण्याचे काम सुद्धा जबाबदारीने करावे लागेल. सुविधायुक्त आरोग्य उपकेंद्र स्थापन झाल्यास या परिसरातील गर्भवती महिलांना त्वरीत वैद्यकीय उपचार मिळण्यास मदत होईल. तसेच प्रसूती दरम्यान होणारा धोका टाळण्यास मदत होईल. हा परिसर जंगल व्याप्त दुर्गम भागात असून सर्प दंश झाल्यास वेळेवर औषधोपचार न मिळाल्याने प्राण गमवण्याची वेळ आल्याचे प्रकार सुद्धा येथे घडले आहे.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास