शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

गोसावी मठ व मंदिरांचे संवर्धन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 06:00 IST

कालांतराने या मंदिरात पुजारी व रक्षक म्हणून गिरीपंथातील गोसावी राहू लागले. येथे मठाची स्थापना झाली. महंत, साधू, सन्याशी असलेले दिवंगत झाले. बाबा चतुर्नाथगिरी महाराज, छत्तरगिरी महाराज, अलोनीबाबा, सूरजगिरी महाराज, गोविंद गिरीमहाराज, शंकरगिरीमहाराज यांचे येथे स्मारक बांधण्यात आले.

ठळक मुद्दे८०० वर्ष जूनी वास्तू । हेमाडपंथी वास्तूकलेतील चार मंदिरांचा समूह

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न भंडारा शहरातील मेंढा परिसरात प्राचीन गिरी गोसावी यांचे अत्यंत कलात्मक व सुंदर मठ आणि मंदिर समूह आहेत. विष्णू भगवान, भगवान गणेश आणि विठ्ठल रखुमाईसह अनेक संतांच्या मूर्ती आहेत. भंडारा शहराच्या वैभवात भर पाडणारे हे वास्तूशिल्प ८०० वर्ष प्राचीन असून हेमाडपंती वास्तूशैलीने बांधलेले आहे. या मंदिर समूहाचे संवर्धक होण्याची आता गरज आहे.आद्य शंकराचार्यांनी गोसावी समाजाची स्थापना केली आणि समाजाचा विस्तार केला असे सांगितले जाते. शंकराचार्यांनी चारही दिशांना दहा शिष्य बनविले. त्यांनी मठ, मठी स्थापन केल्या. त्यापैकी भंडारा येथील मेंढा परिसरातील गिरी गोसावी समाजाचा मठ व मंदिर समूह होय. येथील वास्तू ८०० वर्ष जूनी असून हेमाडपंती वास्तूशैलीनुसार चार मंदिरांचा समूह तयार केलेला आहे.कालांतराने या मंदिरात पुजारी व रक्षक म्हणून गिरीपंथातील गोसावी राहू लागले. येथे मठाची स्थापना झाली. महंत, साधू, सन्याशी असलेले दिवंगत झाले. बाबा चतुर्नाथगिरी महाराज, छत्तरगिरी महाराज, अलोनीबाबा, सूरजगिरी महाराज, गोविंद गिरीमहाराज, शंकरगिरीमहाराज यांचे येथे स्मारक बांधण्यात आले.अलोनीबाबा विषयी राजे रघुजी भोसले यांची विशेष श्रद्धा होती. ते दर्शनासाठी भंडारा येथे यायचे. सहाव्या पिढीपर्यंत येथे कुणीच महिला नव्हती. सातव्या पिढीपासून मठात स्त्रीयांचा समावेश झाला. नवव्या पिढीतील गजानन गिरी व नंतर दहाव्या पिढीतील किशोर गिरी हे सध्या मंदिराची देखभाल करीत आहेत.मंदिराच्या देखभालीसाठी २००७ साली ट्रस्ट स्थापन करण्यात आले. मंदिरात अनेक ठिकाणी अतीप्राचीन गणेशाची विविध रुपे मूर्तीच्या स्वरुपात आहेत. तसेच पशूपक्षी, राक्षसे, पुष्प व सुंदर नक्षीकाम केलेले स्मारके विलोभनीय आहेत. आता प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.विकास कामे रखडलीट्रस्टच्या वतीने या स्थळाचा विकास करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. अखेर शासनाकडून राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाला. संरक्षक भिंत व इतर कामासाठी शासनाकडून ७३ लाख रुपये मंजूर होऊन सुरक्षा भिंतीचे काम करण्यात आले. परंतु पुढे सौंदर्यीकरणासाठी निधी प्राप्त न झाल्याने विकास कामे रखडली आहेत.भंडारा शहराचा संपन्न वारसा सांगणाऱ्या या वास्तूची जतन होण्याची गरज आहे. ट्रस्टतर्फे प्रयत्न सुरु आहेत. परंतु हवा तसा निधी अद्यापही मिळाला नाही. या परिसराचा विकास झाल्यास हे स्थळ नावारुपाला येईल यात शंका नाही.मो.सईद शेख, अध्यक्ष ग्रीन हेरिटेज, भंडारा.

टॅग्स :Templeमंदिर