शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

सत्यापेक्षा विवेक श्रेष्ठ ठरतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 06:00 IST

शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करायला शिका, संकटे तुडविण्यासाठी बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा आदर करून ते कृतीत उतरवा. या समग्र विचारांच्यासाठी विवेकाची गरज आहे आणि हे विवेक तथागत बुद्धाने व आपल्या संविधानाने शिकवला. अर्थात सत्यापेक्षा विवेक श्रेष्ठ ठरतो, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देसंजय देशमुख : ठाणा येथे भारतीय संविधान दिन समारोह

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : गावातील तसेच देशातील विचारात विसंगती असल्यास काहीही पारायण करतो. त्यात जर संविधानाचे पारायण केले, तर शांती, समृद्धी नांदेल. आजची तरूण पिढी काही अंशी जातीभेद मिटविण्याचा प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करायला शिका, संकटे तुडविण्यासाठी बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा आदर करून ते कृतीत उतरवा. या समग्र विचारांच्यासाठी विवेकाची गरज आहे आणि हे विवेक तथागत बुद्धाने व आपल्या संविधानाने शिकवला. अर्थात सत्यापेक्षा विवेक श्रेष्ठ ठरतो, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.ठाणा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक महासभा व भीमगिरी बुद्धीष्ट वेलफेअर सोसायटीद्वारा आयोजित भारतीय संविधान दिन समारोहाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्सचे अध्यक्ष पी.एस. खोब्रागडे हे होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव मनीष कोठारी, बार्टी प्रकल्प अधिकारी गोडबोले, सरपंच सुषमा पवार, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळाचे मुख्याध्यापक नरेंद्र मेंढे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष मधुकर मेश्राम, माजी सैनिक सुभेदार रामचंद्र कारेमोरे, उपसरपंच विनोद तिरपुडे, ग्रामविकास अधिकारी एच.डी. सतदेवे, स्मारक समितीचे अध्यक्ष अनिल भोंगाडे उपस्थित होते.मुख्याध्यापक नरेंद्र मेंढे म्हणाले, जन्माला येणारा बाळ सुदृढ असावा, असे मातेला वाटते. त्याच प्रकारे बाळाला एकसुत्रतेत बांधण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचप्रमाणे समग्र विकासासाठी संविधानाच्या रूपाने लोकशाहीला मिळालेली संजीवनी आहे. परंतू यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे.सरपंच सुषमा पवार म्हणाल्या, भौतीक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव व मोलाचे कार्य हे संविधानामुळे होते. ती दैनिक जीवनशैली आहे. जसे आपण गुरूचे आदर करतो तसेच संविधानाचे आदर राखणे काळाची गरज आहे. अध्यक्षीय भाषणात पी.एस. खोब्रागडे म्हणाले की, माणसाला माणुसकीने जगण्याचे शिकविले ते डॉ. बाबासाहेबांच्या संविधानाने. क्षेत्रिय वतनदारीचे राजे हे सिमित क्षेत्राचे असतात. डॉ. बाबासाहेब हे भारताचे किंबहुना जगाचे राजे आहेत. सामाजिक व आर्थिक दरी वाढत आहे. यासाठी उच्च शिक्षित बना. दुसऱ्याला वाईट लेखू नका. प्रेमाची, समतेची भाषा हाच धम्माचा मार्ग खरी दिशा आहे. मुलं प्रज्ञावंत झाली तर आर्थिकदृष्ट्या समृद्ध होतील. ज्या घरात धम्म व संविधान आहे. त्या घरात सुख समृद्धी लाभेल. यावेळी संविधान उद्देशीकेचे वाचन करण्यात आले.आतंकवादी हल्ल्यात शहीद पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली दिली.भिमगिरी बुद्धीष्ट वेल्फेअरचे मदनपाल गोस्वामी व ग्रामपंचायत ठाणाचे सरपंच सुषमा पवार यांना हृदय गोडबोलेद्वारे भारताचे इंग्रजीत संविधान वितरित केले.प्रास्ताविक मदनपाल गोस्वामी यांनी केले. संचालन प्रिती रामटेके यांनी केले. आभत्तर अनमोल मेश्राम यांनी केले.

टॅग्स :Constitution Dayसंविधान दिन