शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सत्यापेक्षा विवेक श्रेष्ठ ठरतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 06:00 IST

शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करायला शिका, संकटे तुडविण्यासाठी बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा आदर करून ते कृतीत उतरवा. या समग्र विचारांच्यासाठी विवेकाची गरज आहे आणि हे विवेक तथागत बुद्धाने व आपल्या संविधानाने शिकवला. अर्थात सत्यापेक्षा विवेक श्रेष्ठ ठरतो, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देसंजय देशमुख : ठाणा येथे भारतीय संविधान दिन समारोह

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : गावातील तसेच देशातील विचारात विसंगती असल्यास काहीही पारायण करतो. त्यात जर संविधानाचे पारायण केले, तर शांती, समृद्धी नांदेल. आजची तरूण पिढी काही अंशी जातीभेद मिटविण्याचा प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करायला शिका, संकटे तुडविण्यासाठी बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा आदर करून ते कृतीत उतरवा. या समग्र विचारांच्यासाठी विवेकाची गरज आहे आणि हे विवेक तथागत बुद्धाने व आपल्या संविधानाने शिकवला. अर्थात सत्यापेक्षा विवेक श्रेष्ठ ठरतो, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.ठाणा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक महासभा व भीमगिरी बुद्धीष्ट वेलफेअर सोसायटीद्वारा आयोजित भारतीय संविधान दिन समारोहाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्सचे अध्यक्ष पी.एस. खोब्रागडे हे होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव मनीष कोठारी, बार्टी प्रकल्प अधिकारी गोडबोले, सरपंच सुषमा पवार, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळाचे मुख्याध्यापक नरेंद्र मेंढे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष मधुकर मेश्राम, माजी सैनिक सुभेदार रामचंद्र कारेमोरे, उपसरपंच विनोद तिरपुडे, ग्रामविकास अधिकारी एच.डी. सतदेवे, स्मारक समितीचे अध्यक्ष अनिल भोंगाडे उपस्थित होते.मुख्याध्यापक नरेंद्र मेंढे म्हणाले, जन्माला येणारा बाळ सुदृढ असावा, असे मातेला वाटते. त्याच प्रकारे बाळाला एकसुत्रतेत बांधण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचप्रमाणे समग्र विकासासाठी संविधानाच्या रूपाने लोकशाहीला मिळालेली संजीवनी आहे. परंतू यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे.सरपंच सुषमा पवार म्हणाल्या, भौतीक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव व मोलाचे कार्य हे संविधानामुळे होते. ती दैनिक जीवनशैली आहे. जसे आपण गुरूचे आदर करतो तसेच संविधानाचे आदर राखणे काळाची गरज आहे. अध्यक्षीय भाषणात पी.एस. खोब्रागडे म्हणाले की, माणसाला माणुसकीने जगण्याचे शिकविले ते डॉ. बाबासाहेबांच्या संविधानाने. क्षेत्रिय वतनदारीचे राजे हे सिमित क्षेत्राचे असतात. डॉ. बाबासाहेब हे भारताचे किंबहुना जगाचे राजे आहेत. सामाजिक व आर्थिक दरी वाढत आहे. यासाठी उच्च शिक्षित बना. दुसऱ्याला वाईट लेखू नका. प्रेमाची, समतेची भाषा हाच धम्माचा मार्ग खरी दिशा आहे. मुलं प्रज्ञावंत झाली तर आर्थिकदृष्ट्या समृद्ध होतील. ज्या घरात धम्म व संविधान आहे. त्या घरात सुख समृद्धी लाभेल. यावेळी संविधान उद्देशीकेचे वाचन करण्यात आले.आतंकवादी हल्ल्यात शहीद पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली दिली.भिमगिरी बुद्धीष्ट वेल्फेअरचे मदनपाल गोस्वामी व ग्रामपंचायत ठाणाचे सरपंच सुषमा पवार यांना हृदय गोडबोलेद्वारे भारताचे इंग्रजीत संविधान वितरित केले.प्रास्ताविक मदनपाल गोस्वामी यांनी केले. संचालन प्रिती रामटेके यांनी केले. आभत्तर अनमोल मेश्राम यांनी केले.

टॅग्स :Constitution Dayसंविधान दिन