शहरं
Join us  
Trending Stories
1
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
2
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
3
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
4
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
5
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
6
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
7
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
8
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
9
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
10
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
11
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
12
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
13
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
14
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
15
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
16
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
17
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
18
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
19
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
20
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

काॅंग्रेसच्या पदयात्रेने भंडारा दणाणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 05:00 IST

गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास लाखनी येथून काॅंग्रेसच्या पदयात्रेला सुरुवात झाली. या पदयात्रेत शेकडाे ट्रॅक्टर आणि बैलबंडी काॅंग्रेसचे झेंडे लावून सहभागी झाले हाेते. विविध घाेषणा देत ही पदयात्रा दुपारी ४ वाजताच्या सुमारास भंडारा तालुक्यातील धारगाव येथे पाेहाेचली. तेथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर ही पदयात्रा भंडारा शहरात आली. त्रिमुर्ती चाैक मार्गे मुख्य मार्गावरुन गांधी चाैकात पाेहाेचली.

ठळक मुद्देशेतकरी आंदाेलनाला पाठींबा : ट्रॅक्टर व बैलबंडीने वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दिल्ली येथील शेतकरी आंदाेलनाच्या समर्थनार्थ जिल्हा काॅंग्रेस कमेटीच्यावतीने गुरुवारी लाखनी ते भंडारा पदयात्रेचे आयाेजन करण्यात आले हाेते. शेकडाे ट्रॅक्टर, बैलबंडीसह निघालेल्या या पदयात्रेने भंडारा शहर दणाणून गेले हाेते. रॅलीच्या समाराेपात काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टिका केली.गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास लाखनी येथून काॅंग्रेसच्या पदयात्रेला सुरुवात झाली. या पदयात्रेत शेकडाे ट्रॅक्टर आणि बैलबंडी काॅंग्रेसचे झेंडे लावून सहभागी झाले हाेते. विविध घाेषणा देत ही पदयात्रा दुपारी ४ वाजताच्या सुमारास भंडारा तालुक्यातील धारगाव येथे पाेहाेचली. तेथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर ही पदयात्रा भंडारा शहरात आली. त्रिमुर्ती चाैक मार्गे मुख्य मार्गावरुन गांधी चाैकात पाेहाेचली. दरम्यान धुवाधार पाऊस बरसत असतानाही ही पदयात्रा मार्गक्रमण करीत हाेती. ढाेल ताशांच्या गजरात शेकडाे काॅंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यात सहभागी झाले हाेते. या पदयात्रेचे नेतृत्व काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी केले. या पदयात्रेत आमदार अभिजीत वंजारी, माजी आमदार आनंदराव वंजारी, प्रदेश काॅंग्रेसचे अतुल लाेंढे, मुजीब पठाण, जीया पटेल, काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माेहन पंचभाई, प्रेमसागर गणविर, मधुकर लिचडे, जिल्हा महिला काॅंग्रेसचे अध्यक्ष जयश्री बाेरकर, सीमा भुरे, राजकपूर राऊत, सेवानिवृत्त जिल्हाधिकारी किशाेर गजभिये, गाैरीशंकर माेटघरे, अजय गडकरी, शिशीर वंजारी, अभिजीत वंजारी, शफील लद्धानी, धनंजय साठवणे, मनाेज बागडे, प्रसन्ना चकाेले, ॲड. विनाेद बावनकर यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले हाेते. भंडारा शहरातील महात्मा गांधी चाैकात समाराेप सभा झाली. यावेळी शेकडाे नागरिक उपस्थित हाेते. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही काही काळ खाेळंबली हाेती. प्रदेश काॅंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच नाना पटाेले यांचे भंडारा शहरात आगमन झाले. त्यावेळी त्यांचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले.

केंद्र सरकार धाेकेबाज सरकार - नाना पटाेले शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला दुप्पट हमीभाव देवू, पेट्राेल, डिझेल यासह जीवनावश्यक वस्तुंचे भाव आटाेक्यात आणू, अशी हमी देत केंद्रात माेदी सरकार गत सहा वर्षांपासून सत्तेत आहे. मात्र हम दाे हमारे दाे यांनाच लाभ देण्याच्या दृष्टीकाेणातून केंद्र सरकार काम पाहत आहे. शासकीय निमशासकीय संपत्ती विकूण देश विकायला निघाले. केंद्रातील हे सरकार धाेकेबाज सरकार आहे, असे प्रतिपादन प्रदेश काॅंग्रेसचे अध्यक्ष नाना पटाेले यांनी केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर घनाघात केला.  काॅंग्रेसने ६० वर्षात काय केले असा सवाल विचारला जाताे. काॅंग्रेसने सुईपासून तर राकेटपर्यंत आपल्या कार्यकाळात निर्माण केले. या ६० वर्षात संविधान सांभाळले, असे नाना पटाेले म्हणाले. धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान हाेत आहे. बैठका घेवून त्यावर ताेडगा घेवू असे आश्वासन केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिले हाेते. मात्र बैठकीची प्रतीक्षा करण्यातच वेळ गेला. परिणामी शेतकऱ्यांच्या धानाचे अताेनात नुकसान झाले. हजाराे क्विंटल धानाची माेजणीच झाली नाही, असे ते म्हणाले.

 

टॅग्स :congressकाँग्रेसNana Patoleनाना पटोले