शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

काँग्रेसचा मोर्चा ; वाघायेंची पदयात्रा

By admin | Updated: May 8, 2015 00:38 IST

शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांसह अन्य मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेस कमेटीच्यावतीने ...

भंडारा : शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांसह अन्य मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेस कमेटीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा तर माजी आमदार सेवक वाघाये यांच्या नेतृत्वात मुंडीपार ते भंडारा अशी पदयात्रा काढण्यात आली. जिल्हा काँग्रेस कमेटीच्यावतीने गुरूवारला दुपारी १२ च्या सुमारास शास्त्री चौकातून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, उपनेते आमदार विजय वडेट्टीवार, माजी राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे, राजेंद्र मुळक, माजी आमदार आनंदराव वंजारी, अनिल बावनकर, जिल्हाध्यक्ष जिया पटेल, माजी जिल्हाध्यक्ष मधुकर लिचडे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, प्रदेश कार्यकारीणी सदस्य प्रमिला कुटे, जिल्हा महासचिव बशिर पटेल, रहिम पटेल, अ‍ॅड.दिलीप भोयर उपस्थित होते.शास्त्रीनगरातून निघालेला हा मोर्चा मुख्य मार्गाने त्रिमूर्ती चौकात पोहोचला. मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. विखे पाटील म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाविरुद्ध टीका केली. शेतकरी देशोधडीला लागला असताना पंतप्रधान विदेशवारी करण्यात मग्न आहेत. धानासाठी लढणारे, ‘अच्छे दिन’ येणार असे स्वप्न दाखविणारे नेते आता कुठे गेले असा प्रश्न करुन हे शासन शेतकऱ्यांचे नसून उद्योगपतींचे असल्याचा आरोप केला. यावेळी माणिकराव ठाकरे, राजेंद्र मुळक, विजय वडेट्टीवार यांनीही धानाला हमीभाव नाही, केरोसीनचा कोटा कमी करण्यात आला, ओबीसी विद्यार्थ्यांसह अन्य शिष्यवृती थकीत आहे. भारनियमनामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. या ज्वलंत मुद्यावर त्यांनी लक्ष वेधले. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांना मागण्यांचे निवेदन दिले. अशा होत्या मागण्याभूसंपादन कायदा रद्द करण्यात यावा, एपीएलधारकांना सवलतीच्या दरात धान्य पुरवठा करण्यात यावा, धानाला प्रति क्विंटल ३,५०० रूपये भाव देण्यात यावा, केरीसीनचा कोटा पूर्ववत करण्यात यावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, भारनियमन बंद करण्यात यावे, दुधाला योगञय भाव देण्यात यावा, साखर कारखान्याकडून प्रलंबित शिष्यवृत्ती देण्यात यावी, खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्यात यावे, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती देण्यात यावी, कोरडवाहू शेतकऱ्यांना तात्काळ प्रति हेक्टरी २५ हजार रूपये तर ओलिताखालील शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रूपये देण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.मुंडीपार ते भंडारा पदयात्रामाजी आमदार सेवक वाघाये यांनी मुंडीपार ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढली. सकाळी ६ वाजतापासून सुरु झालेली ही पदयात्रा तब्बल ३० किलोमीटर अंतर पार करुन दुपारी अडीच वाजता भंडाऱ्यात पोहचली. पदयात्रा भंडाऱ्यात पोहोचल्यानंतर सेवक वाघाये यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला माल्यार्पण केले. त्यानंतर झालेल्या सभेत ते म्हणाले, जिल्ह्यातील शेतकरी नापिकी आणि सावकाराच्या कर्जामुळे त्रस्त झाला आहे. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणविणारे आता गेले कुठे? सत्तेत येताच त्यांची वाचा बंद झाली का? असे सांगून शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचे दिवस यावेत, त्यांना न्याय मिळावा यासाठी पदयात्रा काढल्याचे सांगून त्यांनी केंद्र व राज्य सरकारविरुद्ध हल्लाबोल केला. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी सरोज वाघाये, रुपलता जांभूळकर, विनायक बुरडे, धनंजय तिरपुडे, प्राचार्य होमराज कापगते, नंदू समरीत, केवळराम लांजेवार, मार्तंड भेंडारकर, पप्पु गिऱ्हेपुंजे, सुनिल गिऱ्हेपुंजे, विनायक बुरडे, बाळा शिवणकर, मनोहर महावाडे, विकास वासनिक, राजू निर्वाण, रुपेश खवास आदींसह साकोली, लाखनी, लाखांदूर तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)