शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

काँग्रेस, राष्ट्रवादीत दुरावा, सत्तेची चावी भाजपच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2022 05:00 IST

महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले तर सहज सत्ता स्थापन होऊ शकते; परंतु पंचायत समिती सभापती निवडीनंतर आता एकत्र येणे शक्य दिसत नाही. काँग्रेसकडे २१ सदस्य असून, त्यांना बहुमतासाठी सहा सदस्यांची गरज आहे. भाजपचा एक गट सोबत आल्यास काँग्रेस सत्ता सहज स्थापन करू शकतो. मात्र,  दुसरीकडे भाजपनेही आपले सदस्य मध्यप्रदेशातील थंड हवेच्या ठिकाणी रवाना केले असून, सत्ता स्थापनेसाठी त्यांच्याही हालचाली सुरू आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पंचायत समिती सभापती निवडीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत दुरावा निर्माण झाला असून, याचा परिणाम जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवर होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्तेची चावी भाजपच्या हाती गेली आहे. भाजप कुणाला मदत करणार यावर अध्यक्षपदाचे गणित अवलंबून आहे. मात्र, भाजपमध्येही दोन गट पडल्याचे दिसत आहे. आता जिल्हा परिषदेत कुणाची सत्ता येणार याची चर्चा जिल्ह्यात  रंगत असून, नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड येत्या १० मे रोजी होत आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच शुक्रवारी झालेल्या सभापती निवडीने जिल्हा परिषदेचे सत्ता समीकरण बदलायला सुरुवात झाली आहे. सभापती निवडीवरून महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र दिसून आले. पवनी पंचायत समितीत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवत राष्ट्रवादीने शिवसेना, भाजप आणि बसपासोबत हातमिळवणी केली. तुमसरमध्ये राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवण्याची खेळी भाजपने केली. भंडारा पंचायत समितीतही राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आले. मोहाडीतही अशीच स्थिती राहिली. परिणामी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीत दुरावा निर्माण झाला. अशा स्थितीत आता भाजपच्या हाती सत्तेची चावी गेली आहे. मात्र, भाजपमध्येही दोन गट पडले असून, भाजपचे पाच आणि एक अपक्ष, असे सहा सदस्य थंड हवेच्या ठिकाणी रवाना झाले.

कुणाची सत्ता येणार

- महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले तर सहज सत्ता स्थापन होऊ शकते; परंतु पंचायत समिती सभापती निवडीनंतर आता एकत्र येणे शक्य दिसत नाही. काँग्रेसकडे २१ सदस्य असून, त्यांना बहुमतासाठी सहा सदस्यांची गरज आहे. भाजपचा एक गट सोबत आल्यास काँग्रेस सत्ता सहज स्थापन करू शकतो. मात्र,  दुसरीकडे भाजपनेही आपले सदस्य मध्यप्रदेशातील थंड हवेच्या ठिकाणी रवाना केले असून, सत्ता स्थापनेसाठी त्यांच्याही हालचाली सुरू आहेत. अशा स्थितीत नेत्यांचे मात्र मौन असून, नेते कोणती भूमिका घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भंडारा हा गृह जिल्हा आहे. काँग्रेसला सर्वाधिक जागाही मिळाल्या आहे. अशा स्थितीत नाना पटोले कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काय वेळेवर खेळी खेळणार याकडेही जाणकारांचे लक्ष लागून आहे. नेत्यांची भूमिका काय राहणार आणि कोण सत्तेत येणार याची उत्सुकता लागली आहे.

 

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस