भूमी अभिलेख कार्यालयातून मिळालेल्या पत्रात शिरस्तेदार गंधे यांच्या बदलीचा प्रस्ताव, सामान्य जनतेला आखीव पत्रिका व नकाशा वेळीच पुरविणे, साधारण, तात्काळ, अतितात्काळ मोजणीची प्रकरणे वेळेत निकाली काढणे, खरेदी-विक्रीचे फेरफार विहित मुदतीत निपटारा करणे, कर्मचाऱ्यांची वागणूक सौम्यतेची असेल, यापुढे तक्रारीला जागा राहणार नाही, असे लेखी आश्वासन दिल्याने भारतीय जनता पक्षाने टाळा ठोको आंदोलन थांबविले.
हे आंदोलन भाजप तालुकाध्यक्ष मोहन सुरकर यांच्या नेतृत्वात झाले. आंदोलनामध्ये अनिल मेंढे, ॲड. एकनाथ बावनकर, राजेंद्र फुलबांधे, माधुरी नखाते, अनुराधा बुराडे, संदीप नंदरधने, अमोल उराडे, मच्छिंद्र हटवार, किसनाबाई भानारकर, दत्तू मुनरतीवार, सीमा मोहिते, निर्मला तलमले, वीणा चोपकर, लता तपाडकर, हिरालाल वैद्य, प्रकाश कुर्जेकर, शरद देवाळे, विनायक फुंडे, देवानंद खोपे, विलास डहारे, दिनेश कोरे, यादव धनजुळे, राहुल माथुरकर, ॲड. खेमराज जीभकाटे, धनंजय मुंडले, शंकुल शहारे, महेश कुंभलकर, मोहन कुर्जेकर, श्रीराम गाडेकर, पुरुषोत्तम गाडेकर, निकेश बनकर मोहन घोगरे दीपक कोरे, अशोक नागरीकर, श्रावण भोयर, चिंतामण शहारे, किशोर ब्राह्मणकर, सोनू भाजीपाले, रामलाल काटेखाये, श्रीकृष्ण भिवगडे, संजय रत्नपारखी, पांडुरंग गभने, सचिन शहारे, दिवाकर वैद्य, सचिन वैद्य, विनोद वैद्य, परशुराम समरीत, सारंग वाघमारे, कामराज नान्हे, जोमराज ढेंगरे, नथ्थुलाल भोंबले, शंकर खडसंग, माधव चित्रीव, दीपक रघुते , प्रमोद मेश्राम, चेतन तुळसकर, विकास सरोदे, हरिचंद्र भेंडारकर, गिरीश उरकुडकर , लोकेश दळवे व अन्य मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.