शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

महाराष्ट्र सरकारबाबत भंडारा जिल्ह्यात उमटल्या संमिश्र प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 17:22 IST

भाजपचे सरकार अस्तित्वात आल्यामुळे जनतेच्या आकांक्षा पूर्ण होण्याकडे राज्य वाटचाल करेल, हा विश्वास असल्याचे भंडारा जिल्हा भाजप महामंत्री मुकेश थानथराटे यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सध्या महाराष्ट्रात विकासाच्या अनेक योजना सुरु आहेत. अशा सर्व योजना सुरु राहण्याकरिता महाराष्ट्रात पुन: भाजप सरकार स्थापित होणे आवश्यक होते. तसेच जनतेचा कल देखील भाजप शासन करीतच आहे. भाजपचे सरकार अस्तित्वात आल्यामुळे जनतेच्या आकांक्षा पूर्ण होण्याकडे राज्य वाटचाल करेल, हा विश्वास असल्याचे भंडारा जिल्हा भाजप महामंत्री मुकेश थानथराटे यांनी सांगितले.महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील काळा दिवस - आमदार नाना पटोलेसरकार स्थापनेची आजची प्रक्रिया घटना विरोधी आहे. महाराष्ट्राच्या राजकीय लौकिकाला हा कलंक असून राज्याच्या राजकीय इतिहासातील काळा दिवसच म्हणावा लागेल. केंद्रीय मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक कधी झाली. राष्ट्रपतींकडे केव्हा शिफारस केली आणि राष्ट्रपती राजवट कधी संपली हे अनाकलनीय आहे. आता विश्वासदर्शक ठराव भाजपने बहुमत सिद्ध करुन दाखवावा, असे साकोलीचे काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी सांगितले.लोकांच्या मनातील सरकार - खासदार सुनील मेंढेनिवडणुकीपूर्वी भाजप- शिवसेना युती झाली होती. जनतेने युतीला मतदान केले. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असे वारंवार सांगितले. जनतेने युतीला स्पष्ट बहुमत दिले. मात्र शिवसेना लोकभावनेच्या विरोधात गेली. आता जनतेच्या मनातील सरकार महाराष्ट्रात आले. शेतकरी हिताच्या सरकारमुळे महाराष्ट्राची प्रगती होणार यात शंका नाही, असे भंडारा- गोदियाचे खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले