शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
3
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
4
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
5
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
6
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
7
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
8
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
9
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
10
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
11
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
12
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
13
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
14
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
15
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
16
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
17
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
18
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
19
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
20
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   

गोदामाअभावी उन्हाळी धान खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:00 IST

नीक खरेदी विक्री सहकारी संस्थेद्वारे उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. गोदामाअभावी उन्हाळी धान खरेदी रखडल्याने तप्त उन्हात शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. लाखनी खरेदी केंद्रावर १७ मे पासुन दोन हजार ४३ क्विंटल उन्हाळी धान खरेदी झाली असून अजुनही पाच हजार क्विंटल धान लाखनी गोदामांच्या बाहेर उघड्यावर पडून आहे. धान खरेदी बंद असल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

ठळक मुद्देपाच हजार क्विंटल धान केंद्रावर पडून : खरीप धानाचीही उचल नाही, लाखनी येथील प्रकार

चंदन मोटघरे।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : स्थानीक खरेदी विक्री सहकारी संस्थेद्वारे उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. गोदामाअभावी उन्हाळी धान खरेदी रखडल्याने तप्त उन्हात शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. लाखनी खरेदी केंद्रावर १७ मे पासुन दोन हजार ४३ क्विंटल उन्हाळी धान खरेदी झाली असून अजुनही पाच हजार क्विंटल धान लाखनी गोदामांच्या बाहेर उघड्यावर पडून आहे. धान खरेदी बंद असल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे.खरेदी-विक्री संस्थेद्वारे सहा धान खरेदी केंद्र सुरु केले आहे. लाखनी केंद्रावर २०४३ क्विंटल, सालेभाटा केंद्रावर १८१२ क्विंटल, कनेरी, गोंडेगाव, गुरढा ह्या गावासाठी असलेले जवेनाळा खरेदी केंद्रावर २६७ क्विंटल, एकोडी धान खरेदी केंद्रावर २६८५ क्विंटल, परसोडी सौदंड धान खरेदी केंद्रावर २६८५ क्विंटल, सातलवाडा खरेदी केंद्रावर ४७.२० क्विंटल धान खरेदी करण्यात आले आहे. गोदामाअभावी धान खरेदी थांबली आहे.धान उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शासनाने आधारभुत धान खरेदी केंद्र सुरु केले आहे. पावसाळी धानाची उचल अद्यापही झालेली नसल्यामुळे गोदाम भरलेले आहेत. नवीन माल ठेवण्यासाठी गोदाम नाही. जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांना याबाबत माहिती दिली आहे. खरेदी विक्री संस्थेद्वारे सेवा सहकारी संस्था, बाजार समिती व काही खासगी गोदामाचा वापर धान ठेवण्यासाठी केला जातो.खरेदी विक्री संस्थाद्वारे खरीप हंगामात १ लाख १२ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आला. यापैकी ४० टक्के धानाची उचल झाली आहे. तर ६० टक्के धान गोदामात पडून आहे. खरीप धानाची उचल झालेली नसल्यामुळे उन्हाळी धान गोदामासमोर पडून आहे.उन्हाळी धानाला १७५० रुपयांचा भाव शासकीय आधारभुत धान खरेदी केंद्रावर दिला जातो. गरजवंत शेतकरी आपला धान कवडीमोल भावात खासगी व्यापाऱ्यांना विकतांना दिसून येत आहे.शासन शेतकºयांच्या हिताच्या योजना तयार करीत असते. त्यात परिपुर्णतेचा अभाव आहे. अनेक शेतकरी उन्हाळी धानाकडे वळले आहे. ठोकळ धानाचे उत्पादन वाढले आहे. शेतकऱ्याच्या उन्हाळी धान उत्पादनाकडे कल वाढल्याने शासनाने धान खरेदी करण्याच्या यंत्रणेत वाढ करणे आवश्यक आहे. गोदामाची कमतरता जाणवत आहे.निकृष्ट दर्जाचे गोदामअनेक गोदाम निकृष्ठ प्रतीचे आहे. पावसाळ्यात पाणी गळत असते. गोदामात उंदीर, घुशीचा त्रास असतो. मालाची उचल लवकर होत नसल्याने मालात तुट निर्माण होते व त्याचा फटका खरेदी-विक्री संस्थेला बसतो. मागील वर्षी सहा महिन्यापर्यंत मालाची उचल केलेली नसल्याने खरेदी विक्री संस्थेला १२ लाख रुपयाची तुट सहन करावी लागली होती.गोदाम उपलब्ध करण्याबाबत आमदारांशी चर्चा केलेली आहे. खरीप धानाची उचल झालेली नाही. त्यामुळे गोदामाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हजारो क्विंटल धान खरेदी विक्रीच्या केंद्रावर पडुन आहे. अनेक शेतकरी ओला धान खरेदी केंद्रावर आणतात व खरेदी करण्याबाबत बळजबरी करतात. धान खरेदी केल्यानंतर ते धानाची उचल करण्यापर्यंत धानाच्या मोजमापात तुट दिसून येते. यामुळे खरेदी विक्रीला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे.- घनश्याम खेडीकर,सभापती खरेदी-विक्री सहकारी संस्था