शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
5
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
6
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
7
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
8
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
9
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
10
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
11
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
12
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
13
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
14
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
15
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
16
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
17
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
18
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
19
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

अड्याळमध्ये कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 00:38 IST

गत ३० वर्षापासून प्रलंबित असलेल्या अड्याळ तालुका निर्मितीसाठी परिसरातील नागरिक आता आक्रमक झाले असून शुक्रवारी अड्याळ येथे कडकडीत बंद पाळून नायब तहसीलदार कार्यालयावर शेकडो नागरिकांचा मोर्चा धडकला.

ठळक मुद्देतालुका निर्मितीची मागणी : परिसरातील गावकऱ्यांचा मोर्चा, साखळी उपोषणाला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : गत ३० वर्षापासून प्रलंबित असलेल्या अड्याळ तालुका निर्मितीसाठी परिसरातील नागरिक आता आक्रमक झाले असून शुक्रवारी अड्याळ येथे कडकडीत बंद पाळून नायब तहसीलदार कार्यालयावर शेकडो नागरिकांचा मोर्चा धडकला. तसेच या मागणीसाठी शुक्रवारपासून साखळी उपोषणाला प्रारंभ झाला आहे.अड्याळ तालुका निर्मितीसाठी नागरिकांनी प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टीमेटन दिला होता. मात्र त्यानंतरही कोणतीच घोषणा झाली नाही. त्यामुळे शुक्रवारी अड्याळ तालुका निर्मिती कृती समिती व गावकºयांच्या नेतृत्वात सकाळी ११.३० वाजता मोर्चा काढण्यात आला. अड्याळ येथील मंडईपेठ येथून निघालेला हा मोर्चा गावातील विविध मार्गावरून जात नायब तहसीलदार कार्यालयावर पोहचला. या ठिकाणी विविध घोषणा देण्यात आल्या. या मोर्चात परिसरातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. मोर्चेकºयांनी आपल्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार मयुर चौधरी यांना दिले. तसेच तालुका निर्मितीसाठी अड्याळ येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळपासूनच संपूर्ण बाजारपेठ बंद होती.तालुका निर्मितीसाठी शुक्रवारपासून अड्याळ येथे साखळी उपोषणाला प्रारंभ झाला. या उपोषणात देवराव तलमले, सुधाकर मुलकलवार, हरिश्चंद्र वासनिक, राजू फुलबांधे, बिपिन टेंभुर्णे, गजानन नखाते, अमोल उराडे, प्रशांत शहारे हे ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. मागण्या मान्य झाल्या नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.अड्याळला पुर्वी विधानसभा क्षेत्राचा दर्जा होता. मोठी बाजारपेठ आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. अनेक लहान मोठे गावे अड्याळला जोडलेली आहेत. अशा या गावाला तालुक्याचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी गत ३० वर्षापासून नागरिक आंदोलन करीत आहे. देशाच्या पंतप्रधानापासून ते आमदारापर्यंत सर्वांना निवेदने दिली. परंतु अद्यापपर्यंत तालुका निर्मितीचा प्रश्न कायम आहे. यापुर्वी गावकºयांनी प्रशासनाला अल्टीमेटम दिला होता. तसेच राजकीय पुढाºयांनाही गावबंदी करण्यात आली आहे. आता प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Morchaमोर्चा