शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

अड्याळमध्ये कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 00:38 IST

गत ३० वर्षापासून प्रलंबित असलेल्या अड्याळ तालुका निर्मितीसाठी परिसरातील नागरिक आता आक्रमक झाले असून शुक्रवारी अड्याळ येथे कडकडीत बंद पाळून नायब तहसीलदार कार्यालयावर शेकडो नागरिकांचा मोर्चा धडकला.

ठळक मुद्देतालुका निर्मितीची मागणी : परिसरातील गावकऱ्यांचा मोर्चा, साखळी उपोषणाला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : गत ३० वर्षापासून प्रलंबित असलेल्या अड्याळ तालुका निर्मितीसाठी परिसरातील नागरिक आता आक्रमक झाले असून शुक्रवारी अड्याळ येथे कडकडीत बंद पाळून नायब तहसीलदार कार्यालयावर शेकडो नागरिकांचा मोर्चा धडकला. तसेच या मागणीसाठी शुक्रवारपासून साखळी उपोषणाला प्रारंभ झाला आहे.अड्याळ तालुका निर्मितीसाठी नागरिकांनी प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टीमेटन दिला होता. मात्र त्यानंतरही कोणतीच घोषणा झाली नाही. त्यामुळे शुक्रवारी अड्याळ तालुका निर्मिती कृती समिती व गावकºयांच्या नेतृत्वात सकाळी ११.३० वाजता मोर्चा काढण्यात आला. अड्याळ येथील मंडईपेठ येथून निघालेला हा मोर्चा गावातील विविध मार्गावरून जात नायब तहसीलदार कार्यालयावर पोहचला. या ठिकाणी विविध घोषणा देण्यात आल्या. या मोर्चात परिसरातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. मोर्चेकºयांनी आपल्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार मयुर चौधरी यांना दिले. तसेच तालुका निर्मितीसाठी अड्याळ येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळपासूनच संपूर्ण बाजारपेठ बंद होती.तालुका निर्मितीसाठी शुक्रवारपासून अड्याळ येथे साखळी उपोषणाला प्रारंभ झाला. या उपोषणात देवराव तलमले, सुधाकर मुलकलवार, हरिश्चंद्र वासनिक, राजू फुलबांधे, बिपिन टेंभुर्णे, गजानन नखाते, अमोल उराडे, प्रशांत शहारे हे ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. मागण्या मान्य झाल्या नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.अड्याळला पुर्वी विधानसभा क्षेत्राचा दर्जा होता. मोठी बाजारपेठ आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. अनेक लहान मोठे गावे अड्याळला जोडलेली आहेत. अशा या गावाला तालुक्याचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी गत ३० वर्षापासून नागरिक आंदोलन करीत आहे. देशाच्या पंतप्रधानापासून ते आमदारापर्यंत सर्वांना निवेदने दिली. परंतु अद्यापपर्यंत तालुका निर्मितीचा प्रश्न कायम आहे. यापुर्वी गावकºयांनी प्रशासनाला अल्टीमेटम दिला होता. तसेच राजकीय पुढाºयांनाही गावबंदी करण्यात आली आहे. आता प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Morchaमोर्चा