शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
3
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
4
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
5
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
6
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
7
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
8
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
9
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
10
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
11
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
12
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
13
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
14
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
15
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
16
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
17
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
18
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
19
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
20
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!

नळ योजनेच्या गावातच नागरिकांना प्यावे लागते बोअरवेलचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:40 IST

चुल्हाड (सिहोरा) : नदीच्या काठावर गाव असतानाही बोअरवेलचे पाणी पिण्याची वेळ बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील गावकऱ्यांवर आली आहे. ...

चुल्हाड (सिहोरा) : नदीच्या काठावर गाव असतानाही बोअरवेलचे पाणी पिण्याची वेळ बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील गावकऱ्यांवर आली आहे. गावातील नागरिकांना नळ योजनेतून दूषित व गढूळ पाणीपुरवठा होत असून, यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. नळ योजनेसाठी जलशुद्धीकरण केंद्र मंजूर करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

सिहोरा परिसरातून वैनगंगा बारमाही वाहणारी नदी आहे. या नदीच्या काठावर नळ योजनेचे पंपगृह तयार करण्यात आले आहे. नदीपात्रातून थेट उपसा करण्यात आलेले पाणी नागरिकांना पुरवठा केले जात आहे. नदीपात्रातून उपसा करण्यात आलेल्या पाण्याला शुद्धीकरणाची सोय नाही. गावात जलसंकट निवारण्यासाठी नळ योजना असली तरी नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यास असमर्थ ठरत आहे. गढूळ व दूषित पाणी नदीपात्रातून उपसा होत आहे. चिखलमिश्रित पाण्यावर तहान भागविण्याची वेळ ऐन पावसाळ्यात नागरिकांवर आली आहे. गावात नळ योजनेचे जलशुद्धीकरण नाही. यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. नदीकाठावर गाव असतानाही पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे. गावात नळ योजना असतानासुद्धा नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेलवर अवलंबून आहेत. बोअरवेलचे पाणी शुद्ध व लोहखनिजमिश्रित असल्याचे नागरिक सांगत आहेत. विहिरीचे पाणी आरोग्यासाठी लाभदायक होते; परंतु गावात नळ योजना आल्याने विहिरी बंद करण्यात आल्या आहेत. हीच नळ योजना आता नागरिकांसाठी कामाची नाही. बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील गावांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी सुकली, नकुल प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बपेरा गावाच्या हद्दीत सुरू करण्यात आली. योजनेला जलशुद्धीकरण केंद्र आहे; परंतु नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होत नाही. योजनेची उच्चस्तरीय चौकशी लावण्यात आली नाही. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रेरणा तुरकर यांनी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा विषय वारंवार सभागृहात मांडला; परंतु पाणी पुरवठा योजनेला पुनर्जीवित करण्याच्या मुद्यावर नाक तोंड दाबण्यात आले आहे. योजना भंगारात निघाल्यानंतर कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला असताना जबाबदारी कुणीच स्वीकारली नाही. योजना असताना गढूळ पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे. नळ योजनेच्या गावात नागरिकांना बोअरवेलचे पाणी उपयोगात आणावे लागत आहे. देवरी देव, सुकली नकुल, गोंडीटोला, बपेरा, वरपिंडकेपार, ब्राह्मणटोला, महालगाव, सोंड्या गावांत पाणीपुरवठा चिंतेचा विषय झाला आहे. गावातील नळ योजनांना जलशुद्धीकरण मंजूर करण्याची ओरड होत आहे.

बॉक्स

या गावांना आरो प्लांट मंजूर करा

सुकली-नकुल प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद असून, गावाला दूषित व गढूळ पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिक अनेक आजारांना बळी पडत आहेत. दूषित पाणीपुरवठा होणाऱ्या गावांना आरो प्लांट शासन स्तरावर मंजूर करण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेंतर्गत स्वतंत्र पॅकेज मंजूर करण्याची मागणी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवेंद्र मेश्राम, गोंडीटोला ग्रामपंचायतच्या सदस्य शीतल चिंचखेडे, सरपंच ममता राऊत यांनी केली आहे.