शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बत्ती गुल प्रकाराने नागरिक बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:38 IST

वरठी व परिसरात विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार नित्याचे आहेत. दिवसभरात अनेक वेळा अकारण विद्युत पुरवठा खंडित होतो. ...

वरठी व परिसरात विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार नित्याचे आहेत. दिवसभरात अनेक वेळा अकारण विद्युत पुरवठा खंडित होतो. देखभाल दुरुस्तीचा अभाव असल्याने अशा घटना वाढल्या असून, यामुळे विद्युत ग्राहक बेजार झाले आहेत. अचानक वीज चालू-बंद होत असल्याने नकळत याचा फटका ग्राहकांना बसतो. वीज ये-जा मुळे घरातील विद्युत यंत्रात बिघाड निर्माण होत आहे. अनेक व्यवसाय व लघुउद्योग विद्युतवर अवलंबून असल्याने त्यांना फटका बसत आहे. विद्युत खंडित होण्याचे प्रकरण दोन वर्षांपासून सुरू आहे. याबाबत नागरिकांनी अनेकदा समस्या मांडल्या असून, वितरण विभागाला मात्र फरक पडलेला दिसत नाही. वितरण विभागाच्या हलगर्जी व्यवस्थापनाचा फटका नागरिकांना बसत आहे. अनेक दिवसांपासून जुन्या झालेल्या विद्युत तारांचा मेंटेनन्स करण्यात आलेला नाही. येथील कर्मचारी नियमित कामावर लक्ष देत नसल्याने प्रकरण वाढले आहेत. विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना रात्रीची झोपही महाग झाली असून, घरातील विद्युत उपकरणे बिघाड होण्याचे प्रकार वाढले आहेत.

बॉक्स

ग्रामीण भागातही कहर

वरठी केंद्रातून परिसरातील अनेक गावांना विद्युत पुरवठा करण्यात येतो. नियमित देखभाल दुरुस्ती नसल्याने ग्रामीण भागातील विद्युत रात्रभर गुल राहते. अनेक भागात एकदा विद्युत पुरवठा खंडित झाला तर पुन्हा सुरू होत नाही. कर्मचाऱ्यांचा अनागोंदी कारभाराने विद्युत ग्राहक त्रस्त झाले आहेत.

बॉक्स

देखभाल दुरुस्तीचा अभाव

महावितरण विभाग अनेक समस्यांनी ग्रासला आहे. देखभाल दुरुस्तीच्या अभावाने समस्या वाढल्या आहेत. वरठी येथील अनेक भागातील विद्युत खांब रस्त्यावर आहेत. आठवडी बाजारातील मुख्य मार्गावर विद्युत खांब उभे आहेत. वरठी - भंडारा रस्त्यावर विद्युत खांब वाकलेले असून अनेक भागातील खांब जीर्ण झाले आहेत. येथे नियुक्त कर्मचारी दिवसभर खुर्च्या मोडतात; पण देखभाल दुरुस्ती करीत नसल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. गावातील अनेक खांबांवरील तारा लोंबकळत आहेत. गत अनेक वर्षांपासून देखभाल दुरुस्ती होत नसल्याने विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत.