शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

दूषित पाण्याने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 22:21 IST

पाणी हे जीवन आहे. याचा समृद्ध साठा जिथे असतो तिथे वैभवसंपन्नता असते असे म्हटले जाते. मात्र भंडारा या बाबतीत अपवाद ठरत आहे. दात आहेत पण चणे नाही, अशी स्थिती पाणीपुरवठ्याच्या बाबतीत झाली आहे.

ठळक मुद्देभंडारेकरांच्या समस्या सुटेना : नवीन योजना कार्यान्वित होण्याला वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडार : पाणी हे जीवन आहे. याचा समृद्ध साठा जिथे असतो तिथे वैभवसंपन्नता असते असे म्हटले जाते. मात्र भंडारा या बाबतीत अपवाद ठरत आहे. दात आहेत पण चणे नाही, अशी स्थिती पाणीपुरवठ्याच्या बाबतीत झाली आहे. विशेष म्हणजे नदीत पाण्याचा मुबलक साठा असतानाही भंडारेकरांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याची सर्वच जबाबदारी पालिका प्रशासनावर आहे. शहरात १० हजारापेक्षा जास्त नळधारक असून ३०० च्या वर सार्वजनिक नळ आहेत. मात्र मागील अनेक महिन्यांपासून पिण्याचे पाणी दूषित येत असल्यामुळे भंडारेकर त्रस्त झाले आहेत. अनेक नागरिकांनी नळाद्वारे येणारे पाणी पिणे सोडून दिले आहे. आरोच्या भरवशावर नागरिक आपली तहान भागविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परिणामी स्वस्तपेक्षा महागडे पाणी विकत घेऊन प्रपंच सुरु आहे.धरणात पाणीसाठा केल्यामुळे वैनगंगा नदीच्या जलस्तरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परंतु नाग नदीचे पाणी वैनगंगा नदीत मिसळत असल्याने पाणी दूषित झाले आहे. नाग नदीवर शुद्धीकरण संयंत्र निर्मितीचा प्रकल्पही अधांतरी असल्याने ही समस्या कायम आहे. त्यातच मध्यंतरीच्या काळात इकॉर्निया या जलपर्णी वनस्पतीने नदीपात्रात विळखा घातला होता. दूषित व रासायनिकयुक्त पाण्यामुळे जलचरांनाही मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. पूर्वी वैनगंगा नदी शुद्ध व तेवढीच पारदर्शक म्हणून समजल्या जायची. मात्र धरण पूर्णत्वास गेल्यानंतर व नाग नदीच्या शिरकावामुळे सद्यस्थितीत या नदीत आंघोळ करणेही आरोग्याला निमंत्रण देण्यासारखे ठरत आहे.दुसरीकडे भंडारा शहरात वैनगंगा नदीपात्रातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. जलशुद्धीकरण केंद्र असले तरी लोकसंख्येच्या मानाने ते पुरेसे नाही. वाढीव लोकसंख्येनुसार पालिका प्रशासनाने नवीन योजनेचा डिपीआर तयार करून तो मंजुरही करून घेतला आहे. लवकरच नवीन वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात होणार आहे. मात्र या नवीन योजनेसाठी किमान दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत भंडारेकरांनी दूषित पाणी प्यावे काय असा सवालही भंडारेकर विचारत आहेत.मध्यंतरी पालिका प्रशासानाने कमी पैशात २० लिटर पाणी ही योजना कार्यान्वित केली होती. मात्र ते नियोजनही कमी असल्याचे दिसून येते. शहरातील बहुतांश वॉर्डातील जलवाहिन्या जीर्ण झाल्या असून कालबाह्य आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनातील पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना लिकेजेस शोधणे जिकरीचे ठरत आहे. लिकेज असल्यावरही त्याची दुरुस्ती करायला बराच कालावधी व निधीही खर्च होत असतो. यावर वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणे नितांत गरजेचे झाले आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण