शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
Online Shopping Tips : ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
3
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
4
बॅंक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
5
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
6
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
7
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
8
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
9
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
10
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
11
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
12
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
13
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
14
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
15
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
16
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
17
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
18
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
19
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
20
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव

दूषित पाण्याने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 22:21 IST

पाणी हे जीवन आहे. याचा समृद्ध साठा जिथे असतो तिथे वैभवसंपन्नता असते असे म्हटले जाते. मात्र भंडारा या बाबतीत अपवाद ठरत आहे. दात आहेत पण चणे नाही, अशी स्थिती पाणीपुरवठ्याच्या बाबतीत झाली आहे.

ठळक मुद्देभंडारेकरांच्या समस्या सुटेना : नवीन योजना कार्यान्वित होण्याला वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडार : पाणी हे जीवन आहे. याचा समृद्ध साठा जिथे असतो तिथे वैभवसंपन्नता असते असे म्हटले जाते. मात्र भंडारा या बाबतीत अपवाद ठरत आहे. दात आहेत पण चणे नाही, अशी स्थिती पाणीपुरवठ्याच्या बाबतीत झाली आहे. विशेष म्हणजे नदीत पाण्याचा मुबलक साठा असतानाही भंडारेकरांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याची सर्वच जबाबदारी पालिका प्रशासनावर आहे. शहरात १० हजारापेक्षा जास्त नळधारक असून ३०० च्या वर सार्वजनिक नळ आहेत. मात्र मागील अनेक महिन्यांपासून पिण्याचे पाणी दूषित येत असल्यामुळे भंडारेकर त्रस्त झाले आहेत. अनेक नागरिकांनी नळाद्वारे येणारे पाणी पिणे सोडून दिले आहे. आरोच्या भरवशावर नागरिक आपली तहान भागविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परिणामी स्वस्तपेक्षा महागडे पाणी विकत घेऊन प्रपंच सुरु आहे.धरणात पाणीसाठा केल्यामुळे वैनगंगा नदीच्या जलस्तरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परंतु नाग नदीचे पाणी वैनगंगा नदीत मिसळत असल्याने पाणी दूषित झाले आहे. नाग नदीवर शुद्धीकरण संयंत्र निर्मितीचा प्रकल्पही अधांतरी असल्याने ही समस्या कायम आहे. त्यातच मध्यंतरीच्या काळात इकॉर्निया या जलपर्णी वनस्पतीने नदीपात्रात विळखा घातला होता. दूषित व रासायनिकयुक्त पाण्यामुळे जलचरांनाही मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. पूर्वी वैनगंगा नदी शुद्ध व तेवढीच पारदर्शक म्हणून समजल्या जायची. मात्र धरण पूर्णत्वास गेल्यानंतर व नाग नदीच्या शिरकावामुळे सद्यस्थितीत या नदीत आंघोळ करणेही आरोग्याला निमंत्रण देण्यासारखे ठरत आहे.दुसरीकडे भंडारा शहरात वैनगंगा नदीपात्रातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. जलशुद्धीकरण केंद्र असले तरी लोकसंख्येच्या मानाने ते पुरेसे नाही. वाढीव लोकसंख्येनुसार पालिका प्रशासनाने नवीन योजनेचा डिपीआर तयार करून तो मंजुरही करून घेतला आहे. लवकरच नवीन वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात होणार आहे. मात्र या नवीन योजनेसाठी किमान दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत भंडारेकरांनी दूषित पाणी प्यावे काय असा सवालही भंडारेकर विचारत आहेत.मध्यंतरी पालिका प्रशासानाने कमी पैशात २० लिटर पाणी ही योजना कार्यान्वित केली होती. मात्र ते नियोजनही कमी असल्याचे दिसून येते. शहरातील बहुतांश वॉर्डातील जलवाहिन्या जीर्ण झाल्या असून कालबाह्य आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनातील पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना लिकेजेस शोधणे जिकरीचे ठरत आहे. लिकेज असल्यावरही त्याची दुरुस्ती करायला बराच कालावधी व निधीही खर्च होत असतो. यावर वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणे नितांत गरजेचे झाले आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण