शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीच्या लग्नाचा डाव लग्नमंडपातच उधळला; बालसंरक्षण समितीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2022 15:15 IST

भंडारा येथील एका मंगल कार्यालयात हा लग्नसोहळा आयोजित केला होता. मात्र जिल्हा बाल संरक्षण कक्ष व महिला बालविकास विभागाला नवरी अल्पवयीन असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून अधिकाऱ्यांची तीन पथके तयार करण्यात आली.

भंडारा : वाजतगाजत नवरदेव लग्नमंडपात पोहोचला. लग्नाची घटिकाही अगदी जवळ आली. सर्व तयारी झाली असताना अचानक जिल्हा बाल संरक्षण समितीचे पथक पोलिसांसह लग्नमंडपात पोहोचले. नवरी अल्पवयीन असल्याचा पुरावा सादर करीत लग्नाचा डाव मोडला.

ही कारवाई भंडारा येथील साई मंगल कार्यालयात बुधवारी सकाळी १०.४० वाजताच्या सुमारास करण्यात आली. मुलीला १८ वर्षे पूर्ण झाल्यावरच लग्न करणार असल्याचे दोन्ही पक्षाच्या मंडळींनी लेखी दिले. मात्र लग्नात सहभागी होण्यासाठी आलेल्या वऱ्हाडींना आल्यापावली परत जावे लागले.

भंडारा येथील साई मंगल कार्यालयात बुधवारी सकाळी १०.४० वाजता लग्नसोहळा आयोजित केला होता. मात्र जिल्हा बाल संरक्षण कक्ष व महिला बालविकास विभागाला नवरी अल्पवयीन असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून बालसंरक्षण कक्षातील अधिकाऱ्यांची तीन पथके तयार करण्यात आली. एक पथक साई मंगल कार्यालयात पोहोचले. तेथील हालचालींवर लक्ष ठेवून होते. दुसरे पथक मुलीने शिक्षण घेतलेल्या शाळेत जन्मतारखेची खातरजमा करण्यासाठी पाठविण्यात आले. तर तिसरे पथक भंडारा पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांचे पथक घेऊन आले.

सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास वाजतगाजत नवरदेव वधूमंडपी पोहोचला. लग्न लागण्याची तयारी सुरू झाली. परंतु जन्मतारखेचा दाखला मिळण्यास विलंब होत होता. शेवटी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नवरीचे आई-वडील व नातेवाइकांची भेट घेतली. त्यांना संपूर्ण प्रकार सांगितला. परंतु त्यांनी मुलीची जन्मतारीख १५ एप्रिल २००४ असल्याचे सांगत मुलगी १८ वर्षांची आहे, असे ठणकावून सांगितले.

शाळेचा दाखला देण्यास विलंब होत असल्याने पथकाने भंडारा नगर परिषद गाठून मुलीच्या जन्माचा दाखला प्राप्त केला. त्यावर १५ एप्रिल २००५ असे नमूद होते. नवरी मुलगी १७ वर्षे १९ दिवसांची असल्याची आढळून आली आणि लग्नाचा डाव मोडला.

नवरी-नवरदेव बालकल्याण समितीपुढे हजर

नवरी अल्पवयीन असल्याने लग्न थांबविण्यात आले. अल्पवयीन नवरी आणि नवरदेवाला भंडारा येथील बाल कल्याण समितीपुढे हजर करण्यात आले. त्या समितीसमक्ष वधू-वर तसेच दोन्ही पक्षांतील नातेवाइकांनी कायद्याचे पालन करीत १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही, असे समितीला सांगितले. तसेच वर आणि वधू राहत असलेल्या क्षेत्रातील विवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देऊन मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी विवाह झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्न