शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बालहक्क संरक्षण आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना ‘समन्स’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 06:35 IST

वेळेत कृती अहवाल सादर न केल्याबाबत द्यावे लागणार स्पष्टीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दहा निष्पाप तान्हुल्यांचा बळी घेणाऱ्या भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या अग्निकांड प्रकरणात राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे. आयोगाने कारवाईचा कृती अहवाल दिलेल्या मुदतीत सादर न केल्यामुळे भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांना ‘समन्स’ बजावले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना १८ जानेवारीला आयोगासमक्ष  ‘ऑनलाइन’ उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे लागेल. या प्रकरणी अद्याप एकही गुन्हा दाखल न झाल्याने हलगर्जीबाबत संताप व्यक्त होत आहे, हे विशेष.

रुग्णालयात लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला. त्याचदिवशी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने या प्रकरणात नेमकी काय कारवाई झाली, त्याचा कृती अहवाल सादर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले होते. मात्र, ४८ तास उलटून गेल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांकडून या संदर्भातील कृती अहवाल आयोगाला मिळाला नाही. त्यामुळे आयोगाने भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना ‘समन्स’ बजावले आहे.

माझ्यापर्यंत ‘समन्स’ आले नाही : जिल्हाधिकारीयासंदर्भात जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाकडून मला कुठल्याही प्रकारची नोटीस किंवा ‘समन्स’ आलेले नाही, असे स्पष्ट केले. माझ्या माहितीनुसार अशाप्रकारची नोटीस असेल तर ती अगोदर शासनाला येईल. त्यानंतर ती माझ्यापर्यंत येईल, असेदेखील सांगितले.

दुर्घटनेबाबत समितीचा अहवाल रविवारी येणार

मुंबई : विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती याची चौकशी करीत आहे. ही समिती येत्या रविवारी अहवाल सादर करेल, असे आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी कॅबिनेटच्या बैठकीत सांगितले. तर राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सुरक्षाविषयक ऑडिटच्या सूचना दिल्या आहेत. अग्निशमन यंत्रणा व विद्युत विभागांनाही रुग्णालयांतील वीज व अग्निशमन यंत्रणांच्या तपासणीच्या सूचना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ना फायर ऑडिट, ना फायर हायड्रंटअग्निकांडाच्या पार्श्वभूमीवर फायर ऑडिटचा मुद्दा समोर आला आहे. ना फायर ऑडिट, ना फायर हायड्रंट, अशीच अवस्था दिसत आहे. 

राज्यपालांकडून पालकांना प्रत्येकी २ लाख

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आगीत १० बालकांचा झालेला मृत्यू अत्यंत क्लेशदायक आहे. अशा घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी खबरदारीच्या उपाययोजना तातडीने करा, असे निर्देश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बुधवारी दिले. अग्निकांडात मृत्युमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबीयांना स्वेच्छा निधीतून प्रत्येकी दोन लाखांची मदत त्यांनी जाहीर केली. जिल्हा रुग्णालयात शनिवारी पहाटे घडलेल्या अग्निकांड दुर्घटनेच्या घटनास्थळाची कोश्यारी यांनी बुधवारी सकाळी पाहणी केली व बाल अतिदक्षता कक्षातील शिशूंच्या मातांसोबत संवाद साधला. एसएनसीयूमधील आगीबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आणि यानंतर मृत बालकांच्या कुटुंबीयांना दिलेल्या आर्थिक मदतीची माहिती दिली. तत्पूर्वी विश्रामगृहावर विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी राज्यपालांना भेटून या घटनेसंदर्भात निवेदने दिली.

 

 

टॅग्स :Bhandara Fireभंडारा आगbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी