शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

जिल्ह्यात हजारोच्या संख्येत बालमजूर

By admin | Updated: June 13, 2015 00:44 IST

खेळण्या-बागडण्याच्या वयात मजुरी करण्यासाठी प्रवृत्त होणे, ही एक मोठीच सामाजिक विटंबना आहे.

सामाजिक कलंक : विभागाकडे केवळ १९६ बालमजुरांची नोंदगोंदिया : खेळण्या-बागडण्याच्या वयात मजुरी करण्यासाठी प्रवृत्त होणे, ही एक मोठीच सामाजिक विटंबना आहे. बालमजुरीचा हा अभिशाप शहरांसह आता ग्रामीण भागातही पसरून बालकांचे बालपणच हिरावून घेत आहे. जिल्ह्यात हजारोंच्या संख्येत बालमजूर असून संबंधित विभागाकडे केवळ १९६ बालमजुरांचीच नोंद असणे ही एक शोकांतिका ठरत आहे.बाल मजूर हा त्याच्या कुटुंबाच्या उत्पन्नात एक लहानसा स्त्रोत असतो, तरीसुद्धा गरीब कुटूंब आपल्या बालकांचे भविष्य त्यामुळे अंधारात झोकतात. खेळण्या-बागडण्याचे व शिक्षणाचे दिवस जबाबदारीत परिवर्तीत होतात. कुटुंबाचे दायित्व खांद्यावर येते व तो सामाजिक बंधनात बांधला जातो. तेव्हा ‘बालपण हे सुखाचे दिवस’ या वाक्याचा नेहमी होणाऱ्या उपयोगाची सत्यता दिसून पडते. खरोखरच बालपण हे सुखाचे असते, पण कुणासाठी? गोरगरिबांची मुले तर बाल मजुरीतच आपले कष्टकारक जीवन जगत असतात.या बालकांमध्ये मोठी हिंमत व धाडस असते, पण त्यांना शिक्षणाची नितांत गरज असते. त्यासाठी पैसा हवा असतो. मात्र उदरनिर्वाहासाठीच पैसा नाही तर शिक्षणासाठी तरी कुठून आणणार? ही समस्या गरीब कुटुंबासमोर व बालकांच्या पालकांसमोर आवासून उभी असते. आता गरज आहे बाल कामगारांच्या जीवनात नवीन प्रकाशवाट आणण्याची. त्यासाठी शासकीय, अशासकीय संघटना व समाजाने पुढे येवून कार्य करावे लागणार आहे. (प्रतिनिधी)