शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात हजारोच्या संख्येत बालमजूर

By admin | Updated: June 13, 2015 00:44 IST

खेळण्या-बागडण्याच्या वयात मजुरी करण्यासाठी प्रवृत्त होणे, ही एक मोठीच सामाजिक विटंबना आहे.

सामाजिक कलंक : विभागाकडे केवळ १९६ बालमजुरांची नोंदगोंदिया : खेळण्या-बागडण्याच्या वयात मजुरी करण्यासाठी प्रवृत्त होणे, ही एक मोठीच सामाजिक विटंबना आहे. बालमजुरीचा हा अभिशाप शहरांसह आता ग्रामीण भागातही पसरून बालकांचे बालपणच हिरावून घेत आहे. जिल्ह्यात हजारोंच्या संख्येत बालमजूर असून संबंधित विभागाकडे केवळ १९६ बालमजुरांचीच नोंद असणे ही एक शोकांतिका ठरत आहे.बाल मजूर हा त्याच्या कुटुंबाच्या उत्पन्नात एक लहानसा स्त्रोत असतो, तरीसुद्धा गरीब कुटूंब आपल्या बालकांचे भविष्य त्यामुळे अंधारात झोकतात. खेळण्या-बागडण्याचे व शिक्षणाचे दिवस जबाबदारीत परिवर्तीत होतात. कुटुंबाचे दायित्व खांद्यावर येते व तो सामाजिक बंधनात बांधला जातो. तेव्हा ‘बालपण हे सुखाचे दिवस’ या वाक्याचा नेहमी होणाऱ्या उपयोगाची सत्यता दिसून पडते. खरोखरच बालपण हे सुखाचे असते, पण कुणासाठी? गोरगरिबांची मुले तर बाल मजुरीतच आपले कष्टकारक जीवन जगत असतात.या बालकांमध्ये मोठी हिंमत व धाडस असते, पण त्यांना शिक्षणाची नितांत गरज असते. त्यासाठी पैसा हवा असतो. मात्र उदरनिर्वाहासाठीच पैसा नाही तर शिक्षणासाठी तरी कुठून आणणार? ही समस्या गरीब कुटुंबासमोर व बालकांच्या पालकांसमोर आवासून उभी असते. आता गरज आहे बाल कामगारांच्या जीवनात नवीन प्रकाशवाट आणण्याची. त्यासाठी शासकीय, अशासकीय संघटना व समाजाने पुढे येवून कार्य करावे लागणार आहे. (प्रतिनिधी)