शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

धानपिकांसाठी रसायनयुक्त पाणी!

By admin | Updated: August 30, 2016 00:21 IST

वाहत्या नाल्यात एका कारखान्यातील विषारी रसायनयुक्त पाणी सोडण्यात आले. सध्या धानपिकाला पाण्याची गरज आहे.

तुमसर : वाहत्या नाल्यात एका कारखान्यातील विषारी रसायनयुक्त पाणी सोडण्यात आले. सध्या धानपिकाला पाण्याची गरज आहे. विषारी पाणी पिकांना कसे द्यावे असा प्रश्न देव्हाडी शिवारातील शेतकऱ्यांना पडला आहे. वारंवार रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्या कारखान्यावर कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.देव्हाडी शिवारात तुमसर - गोंदिया राज्य महामार्गावर एक औषध निर्माण करणारा कारखाना आहे. कारखान्याशेजारी एक नाला वाहतो. या नाल्यात कारखान्यातील रसायनयुक्त पाणी सोडण्यात येते. या पाण्याची दुर्गंधी येते. शेतकरी सध्या धान पिकाकरिता पाण्याची नितांत आवश्यकता आहे. नाल्यात रसायनयुक्त पाणी असल्याने धानपिकाला पाणी कसे द्यावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दोन वर्षापूर्वी रसायनयुक्त पाणी धान पिकाला दिले होते. तेव्हा धान मळणी केल्यावर त्या तांदळाची दुर्गंधी येत होती. शेतकऱ्यांनी सर्व तांदूळ फेकून दिले होते हे विषेश. येथील शेतकऱ्यांत असंतोष आहे. कारखाना प्रशासन सतत रसायनयुक्त पाणी सोडत असून प्रशासनाकडून कोणतीच दखल आजपर्यंत घेण्यात आली नाही. शेकडो शेतकऱ्यांचे पिक पाण्याअभावी धोक्यात आले आहे.पर्यावरणाची येथे मोठी हानी होत आहे. गुरांना पिण्याकरिता पाणी नाही. नियमानुसार कारखाना प्रशासनाने रसायनयुक्त पाणी निष्प्रभ करण्याची गरज आहे. प्रदूषण व पर्यावरण विभागाचे जबाबदार अधिकारी भेट देतात. परंतु क्लिन चीट देण्याचेच येथे सुरु आहे. रसायनयुक्त पाणी नाल्यात सोडताच येत नाही. शासनाचे अतिशय कडक नियम आहेत. परंतु येथे या नियमांचा काहीच उपयोग होताना दिसत नाही. (तालुका प्रतिनिधी)शेतकऱ्यांची तक्रार आल्यावर तिची दखल घेऊन चौकशी करण्यात येईल. नियमानुसार संबंधित कारखान्याला जाब विचारून नियमानुसार निश्चित कारवाई करण्यात येईल.- डी.टी. सोनवानेतहसीलदार, तुमसर.