शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

रसायनयुक्त पिकविलेली फळे आरोग्यासाठी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:01 IST

उन्हाळ्याच्या दिवसात आंब्यासह थंड फळांना ग्राहकांकडून चांगली मागणी असते. यावर्षी सातत्याने वातावरण बदलाच्या परिणामाने जिल्ह्यातील आंब्याच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे फळांना केमीकलयुक्त पद्धतीने पिकवून फळ विक्रेते फळांची विक्री करीत आहेत.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा परिणाम : फळे खरेदी करताना दक्षता घेण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने फळांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र लॉकडाऊनचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसल्याने जिल्हाबाहेरुन येणाऱ्या फळांची आवक मंदावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रसायनांचा वापर करून पिकविलेली फळे विक्रीसाठी बाजारात येत असल्याने रसायनयुक्त पिकविलेली फळे आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे.उन्हाळ्याच्या दिवसात आंब्यासह थंड फळांना ग्राहकांकडून चांगली मागणी असते. यावर्षी सातत्याने वातावरण बदलाच्या परिणामाने जिल्ह्यातील आंब्याच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे फळांना केमीकलयुक्त पद्धतीने पिकवून फळ विक्रेते फळांची विक्री करीत आहेत.अनैसर्गिक पद्धतीने फळांवर रसायनांचा वापर वाढत असल्याने अशा फळांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने ठिकठिकाणच्या फळविक्रेत्यांकडून तपासणी करण्याची गरज आहे.गत काही दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात एक टरबूज फुटून स्फोट झाल्याची घटना घडली होती. यावरून फळांमध्ये केमीकलचा तसेच विविध रसायने वापरून त्वरीत बाजारपेठेत विकण्याची स्पर्धाच सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे.नागरिकांनी फळे विक्री करताना विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव वाढत असताना महामार्गावरुन परतणारे मजूर, वाहनधारक अनेकदा फळे खरेदी करताना दिसत आहेत. त्यामुळे या ठिकाणी फळ विक्रेत्यांनी फिजीकल डिस्टन्सिंगसह सॅनिटायझरचा वापर करण्याची गरज आहे.मात्र अनेक ठिकाणी फळविक्रेते याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन नैसर्गिकरित्या शेतकऱ्यांनी पिकविलेल्या फळांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला व फळ पिकाखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे कलींगड, खरबूज, आंबा, चिकू यासारखी फळे जिल्ह्यातील अनेक शेतकºयांकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शेतकºयांच्या फळांना थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. फळ उत्पादक शेतकºयांना मोठा दिलासा मिळू शकतो. लॉकडाऊन काळात अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी स्टॉलवर विक्रीसाठी असणारी फळे अनैसर्गिकरित्या पिकविलेली आहेत. हे माहिती असतानाही अनेकदा याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.फळांच्या मागणीत लक्षणीय वाढउन्हाळ्याच्या दिवसांमुळे ग्राहकांकडून फळांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र अनेक ठिकाणी सुरु असलेल्या अनैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या फळांची विक्री रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Healthआरोग्य