शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

रसायनयुक्त पिकविलेली फळे आरोग्यासाठी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:01 IST

उन्हाळ्याच्या दिवसात आंब्यासह थंड फळांना ग्राहकांकडून चांगली मागणी असते. यावर्षी सातत्याने वातावरण बदलाच्या परिणामाने जिल्ह्यातील आंब्याच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे फळांना केमीकलयुक्त पद्धतीने पिकवून फळ विक्रेते फळांची विक्री करीत आहेत.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा परिणाम : फळे खरेदी करताना दक्षता घेण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने फळांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र लॉकडाऊनचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसल्याने जिल्हाबाहेरुन येणाऱ्या फळांची आवक मंदावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रसायनांचा वापर करून पिकविलेली फळे विक्रीसाठी बाजारात येत असल्याने रसायनयुक्त पिकविलेली फळे आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे.उन्हाळ्याच्या दिवसात आंब्यासह थंड फळांना ग्राहकांकडून चांगली मागणी असते. यावर्षी सातत्याने वातावरण बदलाच्या परिणामाने जिल्ह्यातील आंब्याच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे फळांना केमीकलयुक्त पद्धतीने पिकवून फळ विक्रेते फळांची विक्री करीत आहेत.अनैसर्गिक पद्धतीने फळांवर रसायनांचा वापर वाढत असल्याने अशा फळांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने ठिकठिकाणच्या फळविक्रेत्यांकडून तपासणी करण्याची गरज आहे.गत काही दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात एक टरबूज फुटून स्फोट झाल्याची घटना घडली होती. यावरून फळांमध्ये केमीकलचा तसेच विविध रसायने वापरून त्वरीत बाजारपेठेत विकण्याची स्पर्धाच सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे.नागरिकांनी फळे विक्री करताना विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव वाढत असताना महामार्गावरुन परतणारे मजूर, वाहनधारक अनेकदा फळे खरेदी करताना दिसत आहेत. त्यामुळे या ठिकाणी फळ विक्रेत्यांनी फिजीकल डिस्टन्सिंगसह सॅनिटायझरचा वापर करण्याची गरज आहे.मात्र अनेक ठिकाणी फळविक्रेते याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन नैसर्गिकरित्या शेतकऱ्यांनी पिकविलेल्या फळांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला व फळ पिकाखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे कलींगड, खरबूज, आंबा, चिकू यासारखी फळे जिल्ह्यातील अनेक शेतकºयांकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शेतकºयांच्या फळांना थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. फळ उत्पादक शेतकºयांना मोठा दिलासा मिळू शकतो. लॉकडाऊन काळात अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी स्टॉलवर विक्रीसाठी असणारी फळे अनैसर्गिकरित्या पिकविलेली आहेत. हे माहिती असतानाही अनेकदा याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.फळांच्या मागणीत लक्षणीय वाढउन्हाळ्याच्या दिवसांमुळे ग्राहकांकडून फळांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र अनेक ठिकाणी सुरु असलेल्या अनैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या फळांची विक्री रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Healthआरोग्य