शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

नाल्यात सोडले रासायनिक पाणी

By admin | Updated: July 19, 2016 00:39 IST

देव्हाडी शिवारताील एका औषध निर्मिती करणाऱ्या कारखान्यातून रासायनिक विषारी पाणी नाल्यात पुन्हा सोडले.

व्यवस्थापनाची मुजोरी : शेतकऱ्यांवर नापिकीचे संकटतुमसर : देव्हाडी शिवारताील एका औषध निर्मिती करणाऱ्या कारखान्यातून रासायनिक विषारी पाणी नाल्यात पुन्हा सोडले. या प्रकारामुळे शेतकऱ्यांत तीव्र असंतोष असून नाल्यातील पाणी रोवणीकरिता कसे वापर करावे असा प्रश्न त्यांना पडला आहे.प्रदुषण निंयत्रण मंडळाच्या कार्यप्रणालीवर येथे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तुमसर - गोंदिया राज्य महामार्गाशेजारी देव्हाडी शिवारात औषधांची भूकटी तयार करणारा कारखाना मागील २८ वर्षापासून आहे. या कारखान्याशेजारी एक मोठा नाला आहे. नाल्याच्यावर कारखान्याचे दोन कृत्रिम हौद लहान तलाव आहे. येथे रासायनिक पाणी निरप्रभ निर्जंतूक करणारी यंत्रणा उभारली आहे. या यंत्रणेमुळे रासायनिक पाणी नष्ट करण्यात येते, परंतु दररोज मोठ्या प्रमाणात या कारखान्यात औषध तयार करण्याकरिता पाण्याचा वापर करण्यात येतो हे पाणी जवळील नाल्यात सोडले जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.सध्या शेतीचा हंगाम सुरु आहे. भातपिकांना पाणी देणे शेतकऱ्यांनी सुरु केले आहे. देव्हाडी शिवारात रोवणीची कामे जोमात सुरु आहेत. शेतात पाणी कमी असल्याने जवळील नाल्यातून पंपाद्वारे पाणी घेणे सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी या कारखान्यातून पुन्हा रासायनिक पाणी सोडण्यात आले. पाण्याला दुर्गंधी येत असून पाणी तेलकट झाले आहे. तेलाचा थर पाण्यावर तरंगतांनी येथे नाल्यात दिसत आहे.१० दिवसांपूर्वी येथे कारखान्यातून रासायनिक पाणी सोडले होते. दोन दिवसानंतर चौकशी भेट म्हणून प्रदुषण नियंत्रण मंडळाचे पथक आले होते. अशी माहिती शेतकऱ्यांनी लोकमतला दिली. मागील २८ वर्षापासून रासायनिक पाणी नाल्यात सोडणे सुरु आहे. परंतु अद्यापपावेतो कोणतीच कारवाई प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली नाही. रासायनिक पाण्याचा सर्वात जास्त फटका पावसाळ्यात शेतकऱ्यांना बसतो. ऐरवी हिवाळा व उन्हाळ्यात पाण्याची गरज येथे नसते. त्यामुळे कारखान्याचे येथे फावते. दोन वर्षापूर्वी रासायनिक विषारी पाणी धान पिकांना येथील शेतकऱ्यांनी दिले होते. धान विक्री केल्यावर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याने शेतकऱ्याला बोलावून धान परत केले होते. धान भरडाई नंतर तांदळाची मोठी दुर्गंधी तांदळातून येत होती. अशी माहिती शेतकरी महेश बिरणवारे यांनी दिली. देव्हाडी शिवारातील फेकून दिले होते. या समस्येकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष दिसून येत आहे. प्रशासनही येथे दखल घेत नाही. दोन दिवसात अन्यायग्रस्त शेतकरी तुमसर येथे तहसिलदारांची भेट घेऊन निवेदन देणार आहे. शेतकऱ्यांचा येथे उद्रेक होऊ शकतो. (तालुका प्रतिनिधी)