शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

नाल्यात सोडले रासायनिक पाणी

By admin | Updated: July 19, 2016 00:39 IST

देव्हाडी शिवारताील एका औषध निर्मिती करणाऱ्या कारखान्यातून रासायनिक विषारी पाणी नाल्यात पुन्हा सोडले.

व्यवस्थापनाची मुजोरी : शेतकऱ्यांवर नापिकीचे संकटतुमसर : देव्हाडी शिवारताील एका औषध निर्मिती करणाऱ्या कारखान्यातून रासायनिक विषारी पाणी नाल्यात पुन्हा सोडले. या प्रकारामुळे शेतकऱ्यांत तीव्र असंतोष असून नाल्यातील पाणी रोवणीकरिता कसे वापर करावे असा प्रश्न त्यांना पडला आहे.प्रदुषण निंयत्रण मंडळाच्या कार्यप्रणालीवर येथे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तुमसर - गोंदिया राज्य महामार्गाशेजारी देव्हाडी शिवारात औषधांची भूकटी तयार करणारा कारखाना मागील २८ वर्षापासून आहे. या कारखान्याशेजारी एक मोठा नाला आहे. नाल्याच्यावर कारखान्याचे दोन कृत्रिम हौद लहान तलाव आहे. येथे रासायनिक पाणी निरप्रभ निर्जंतूक करणारी यंत्रणा उभारली आहे. या यंत्रणेमुळे रासायनिक पाणी नष्ट करण्यात येते, परंतु दररोज मोठ्या प्रमाणात या कारखान्यात औषध तयार करण्याकरिता पाण्याचा वापर करण्यात येतो हे पाणी जवळील नाल्यात सोडले जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.सध्या शेतीचा हंगाम सुरु आहे. भातपिकांना पाणी देणे शेतकऱ्यांनी सुरु केले आहे. देव्हाडी शिवारात रोवणीची कामे जोमात सुरु आहेत. शेतात पाणी कमी असल्याने जवळील नाल्यातून पंपाद्वारे पाणी घेणे सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी या कारखान्यातून पुन्हा रासायनिक पाणी सोडण्यात आले. पाण्याला दुर्गंधी येत असून पाणी तेलकट झाले आहे. तेलाचा थर पाण्यावर तरंगतांनी येथे नाल्यात दिसत आहे.१० दिवसांपूर्वी येथे कारखान्यातून रासायनिक पाणी सोडले होते. दोन दिवसानंतर चौकशी भेट म्हणून प्रदुषण नियंत्रण मंडळाचे पथक आले होते. अशी माहिती शेतकऱ्यांनी लोकमतला दिली. मागील २८ वर्षापासून रासायनिक पाणी नाल्यात सोडणे सुरु आहे. परंतु अद्यापपावेतो कोणतीच कारवाई प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली नाही. रासायनिक पाण्याचा सर्वात जास्त फटका पावसाळ्यात शेतकऱ्यांना बसतो. ऐरवी हिवाळा व उन्हाळ्यात पाण्याची गरज येथे नसते. त्यामुळे कारखान्याचे येथे फावते. दोन वर्षापूर्वी रासायनिक विषारी पाणी धान पिकांना येथील शेतकऱ्यांनी दिले होते. धान विक्री केल्यावर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याने शेतकऱ्याला बोलावून धान परत केले होते. धान भरडाई नंतर तांदळाची मोठी दुर्गंधी तांदळातून येत होती. अशी माहिती शेतकरी महेश बिरणवारे यांनी दिली. देव्हाडी शिवारातील फेकून दिले होते. या समस्येकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष दिसून येत आहे. प्रशासनही येथे दखल घेत नाही. दोन दिवसात अन्यायग्रस्त शेतकरी तुमसर येथे तहसिलदारांची भेट घेऊन निवेदन देणार आहे. शेतकऱ्यांचा येथे उद्रेक होऊ शकतो. (तालुका प्रतिनिधी)