शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
4
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
5
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
6
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
7
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
8
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
9
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
10
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
11
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
12
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
13
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
14
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
15
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
16
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
17
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
18
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
19
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
20
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण

स्वस्तातल्या कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 05:00 IST

अख्ख्या महाराष्ट्रभर कांद्याने शेतकऱ्यांना रडवलेले आहे. महागाईच्या कचाट्यातून उत्पन्न शोधत बाजारपेठेत भाव नसल्याने शेतकरी देशोधडीला लागत आहे. कोणतेही उत्पन्न घ्या अपेक्षित उत्पन्नानंतर दर मात्र मिळत नाही. महागाई शिरजोर होत चालली आहे. मजुरी व मजूर टंचाई ही शेतकऱ्यांसमोरची मोठी अडचण वर्तमानात येत आहे.  उत्पन्न घसरत चालले आहे. करावे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभा आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : खरंच कांदा रस्त्यावर आलेला आहे. भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी  तरळते आहे. काढणीचा खर्च सुद्धा निघेनासा झाला आहे. तीनशे रुपयाला चाळीस किलोचा कट्टा असा दर पालांदूर येथील आठवडी बाजारात शनिवारला अनुभवायला आला. अख्ख्या महाराष्ट्रभर कांद्याने शेतकऱ्यांना रडवलेले आहे. महागाईच्या कचाट्यातून उत्पन्न शोधत बाजारपेठेत भाव नसल्याने शेतकरी देशोधडीला लागत आहे. कोणतेही उत्पन्न घ्या अपेक्षित उत्पन्नानंतर दर मात्र मिळत नाही. महागाई शिरजोर होत चालली आहे. मजुरी व मजूर टंचाई ही शेतकऱ्यांसमोरची मोठी अडचण वर्तमानात येत आहे. उत्पन्न घसरत चालले आहे. करावे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभा आहे. पावसाळ्याच्या पूर्वी बऱ्याच घरात किमान पावसाळाभर  पुरेल एवढा कांदा खरेदी करून ठेवला जातो. त्यामुळे हमखास मागणी असते, परंतु संपूर्ण राज्यस्तरीय बाजारपेठेत कांद्याची अवस्था बिकट असल्याने त्याचा थेट परिणाम लहान बाजारपेठेलाही भोगावा लागत आहे. 

भंडारा जिल्ह्यात कांद्याचे सुमार उत्पादन- भंडारा जिल्ह्यातील पवनी, लाखांदूर तालुक्यात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन घेतले जाते. स्थानिकचा कांदा असल्याने स्थानिक बाजारपेठेत मोठी मागणी दरवर्षी असते. ती मागणी लक्षात घेऊन शेतकरी मोठ्या आशेने याहीवर्षी कांदा लागवडीखाली आणला. बुरशीजन्य रोगासह अन्य रोगांचा मुकाबला करीत उत्पादन घेण्यात आले, मात्र जिल्ह्याच्या कोणत्या बाजारपेठेत कांद्याला दहा रुपयाच्यावर दर नसल्याने कांदा उत्पादक रडवेल्या अवस्थेत आहेत.आधारभूत केंद्रांतर्गत खरेदी करा!- खुल्या अर्थव्यवस्थेत शासनाच्या ध्येयधोरणाचा थेट फटका कृषी उत्पन्नाला बसत आहे. शेतकरी व्यक्तिगत विचार करून स्थानिक बाजारपेठेच्या आधाराने उत्पन्न घेतो, मात्र राज्यस्तरीय किंवा जागतिक पातळीवरील अर्थव्यवस्थेचा अभ्यास वेळेवर बदलत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला अपेक्षित दर मिळत नाही. त्यामुळे घाम गाळूनही पदरी निराशाच पडत आहे. अशा कठीण वेळी शासनाने आधारभूत किमतीचा आधार दिल्यास हक्काचा शेतकरी उभा राहायला मदत शक्य आहे.

 

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी