शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
5
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
6
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
7
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
8
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
9
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
10
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
11
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
12
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
13
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
14
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
15
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
16
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
17
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
18
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
19
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
20
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे

चक्रवर्ती राजाभोज आदर्श जाणता राजा

By admin | Updated: February 27, 2017 00:30 IST

अकराव्या शतकात मध्यभारतात अनुशासनप्रिय चक्रवर्ती सम्राट राजाभोज यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन ...

खासदार नाना पटोले यांचे प्रतिपादन : सिंदपार येथे पार पडला जयंती समारोह, शेकडो समाजबांधवांची उपस्थितीभंडारा : अकराव्या शतकात मध्यभारतात अनुशासनप्रिय चक्रवर्ती सम्राट राजाभोज यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन ५५ वर्षे ७ महिने ३ दिवस राज्य केले. त्यांना अखंड भारताचे प्रणेता संबोधले जाते. जोपर्यंत राजाभोज जिवंत होते तोपर्यंत त्यांनी विदेशी राज्यकर्त्यांना भारतातील हद्दीत पाय ठेवू दिला नाही. राजाभोज पोवार समाजाचे गौरव तर होतेच त्याचबरोबर सर्व समाजाकरिता देखील आदर्श जाणता राजा होते, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केले.सिंदीपार येथे आयोजित राजाभोज जयंती समारोह दरम्यान खासदार नाना पटोले बोलत होते. यावेळी आमदार बाळा काशिवार, सरपंच तुकाराम बोपचे, पृथ्वीराज रहांगडाले, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर रहांगडाले, पंचायत समिती सदस्य मोरेश्वरी पटले, प्रेम बोपचे, अ‍ॅड. पुनात्री रहांगडाले, जगदीश येळे, अशोक येळेकर, भास्कर बावणकर, हेमचंद्र बोपचे, रामेश्वर बिसेन, ज्ञानेश्वर येळेकर, उपराज टेंभरे, अशोक पटले, वनिता येळेकर, चैतराम हरीनखेडे, दिनेश येळेकर, आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी खा.पटोले यांनी, सर्व मागासवर्गीय समाजासह आदिवासी लोकांनी एकजुट होऊन सर्व क्षेत्रात विकास करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. बहुजन समाज विभीन्न जाती - जातीमध्ये विभागला आहे. काही षडयंत्रकारी शक्ती बहुजन समाजाला विभागण्याचे कार्य करीत आहेत. हे षडयंत्र हाणून पाडून बहुजन समाजाने संघटीतरित्या विकास साधावा. चक्रवर्ती राजाभोज यांनी त्यांच्या काळात अशा शक्तीविरोधात लढा देऊन सर्व समाजाला जोडण्याचे कार्य केले. सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याकरिता ते लढत राहिल्याचे त्यांनी सांगितले. सर्व मागासवर्गीय जातींनी एकत्र येवून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाच्या मार्गावर ओबीसी समाजाने विकास कार्याची कास धरून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता क्षेत्रातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जनता दरबार बोलावल्याचे सांगितले व याचा लाभ सर्व समाजाच्या पीडित लोकांनी घेण्याचे त्यांनी प्रतिपादन केले. याप्रसंगी ते पुढे म्हणाले की, बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त तालुक्याच्या ठिकाणी ओबीसी समाजाच्या मुलांकरिता १२५ व मुलींकरिता १२५ विद्यार्थ्यांचे वसतिगृह अनुसूचित जाती जमातीची धर्तीवर राज्य शासनाने सुरु करावे व क्रिमीलेअरची अट रद्द करावी अशी मागणी केली. यावेळी त्यांनी शासनातर्फे सुरु असलेल्या योजनांना लाभ घेण्याचे प्रतिपादन खा.पटोले यांनी उपस्थितांना केले. यावेळी पटोले यांनी खा.विकासनिधी अंतर्गत मंजूर समाज भवनाचे भूमिपूजन केले. समाजबांधवांनी या समाजभवनाचा लाभ घेवून येथे सामूहिक विवाह आयोजित करण्याचेही आवाहन केले. याप्रसंगी पटोले यांनी सुरुवातीला पोवारी भाषेत मार्गदर्शनाला सुरुवात करून स्व.पी.डी. रहांगडाले यांच्या कार्याचा आवर्जून उल्लेख केला व ते आम्हा सर्वांसाठी आदर्श असल्याचे सांगितले.बाळा काशिवार यावेळी म्हणाले, पोवार समाजातील युवकांनी व महिलांनी विकास कामाकरिता पुढे यावे, राजाभोज यांचा आदर्श समोर ठेवून युवकांनी व महिलांनी कुटुंब, समाज आणि राष्ट्राचा विकास करण्याचे आवाहन केले. यावेळी इतर मान्यवरांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. पोवार समाजातील युवक युवतींनी पोवारी भाषेत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मन मोहीत केले. प्रास्ताविक राष्ट्रीय पवार महासभेचे महासचिव व या जयंती समारोहाचे संयोजक जगदीश येळे यांनी केले. तथा आलेल्या मान्यवरांचे राजाभोय क्षत्रीय पवार समाज सिंदीपारचे सहसचिव अशोक येळेकर यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला छगन राहांगडाले, धनराज पारधी, शिवराम बघेले, प्रदीप राहांगडाले, सी.टी. पारधी, मनोज पटले, पुरुषोत्तम राणे, पुरुषोत्तम टेंभरे, रेवता पटले, सरिता येळेकर, प्रतिभा येळेकर, रत्नकला पटले, नूतन ठाकरे, सहसराम पटले, राजाभोज जयंती समारोह, राजाभोय क्षत्रिय पोवार समाज सिंदीपारचे सर्व कार्यकर्ते, राजेगाव, मोरगाव, सालेभाटा, केसलवाडा, परसोडी, मासलमेटा, उसगाव, पळसपाणी, किन्ही, सराटी, चिचगाव येथील समाजबांधवांनी सहकार्य केले. यावेळी समाजबांधवांची मोठी उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)