शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

केंद्र सरकारने अघोषित आणीबाणी सुरू केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:58 IST

केंद्र व राज्य सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत आहे. सत्तेत येण्याअगोदर दिलेली आश्वासने फोल ठरली आहेत. सामान्य जनतेने भाजपला नाही तर विकास होईल यादृष्टीने मत दिलीत, परंतु सत्तेत येताच त्यांना विसर पडला.

ठळक मुद्देजयंत पाटील : भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँगे्रसच्यावतीने कार्यकर्ता बैठक उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र व राज्य सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत आहे. सत्तेत येण्याअगोदर दिलेली आश्वासने फोल ठरली आहेत. सामान्य जनतेने भाजपला नाही तर विकास होईल यादृष्टीने मत दिलीत, परंतु सत्तेत येताच त्यांना विसर पडला. इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमाच्या काही पत्रकांरानी विद्यमान सरकारचे पितळ उघड केल्याने त्यांच्या मुसक्या बांधण्याचे काम सुरू केले. देशात केंद ्रसरकारने अघोषित आणी-बाणी सुरू केली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी येथे केले.जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील सार्वजनिक वाचनालयात आयोजित कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार मधुकर कुकडे होते. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार प्रकाश गजभिये, माजी राज्यमंत्री नानाभाऊ पंचबुद्धे, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार अनिल बावनकर, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, धनेंद्र तुरकर, रामलाल चौधरी, विवेकानंद कुर्झेकर, रेखा ठाकरे, जनबा मस्के, देवेंद्र चौबे, ईश्वर बाळबुद्धे, महेश जैन उपस्थित होते.पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रामीण भागाच्या हिताचे नाहीत. त्यांनी सामान्य जनतेला भुलथापा देवून सत्ता प्राप्त केली. हे आता जनतेला कळू लागले आहे. त्यांच्याच परिणाम भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातून राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांना प्रतिनिधी म्हणून निवडून दिले. आता आपल्याला पुढील २०१९ ची लढाई जिंकण्यासाठी बुथ कमिटी निर्माण करून तिला सक्षम करणे आवश्यक आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी प्रत्येक जिल्ह्यात जावून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. याप्रसंगी नवनिर्वाचित राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष माजी राज्यमंत्री नानाभाऊ पंचबुद्धे यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. या बैठकीला खासदार मधुकर कुकडे, माजी मंत्री अनिल देशमुख यांनी मार्गदर्शन केले.यावेळी कल्याणी भुरे, अभिषेक कारेमोरे, बबन मेश्राम, डॉ. रविंद्र वानखेडे, राजकुमार माटे, अविनाश ब्राम्हणकर, जगदिश निंबार्ते, शैलेश मयुर, नरेंद्र झंझाड, देवचंद ठाकरे, लोमेश वैद्य, डॉ. विकास गभने, बालु चुन्ने, असपाक पटेल, सुनिल शहारे, बाबुराव मते उपस्थित होते. प्रास्ताविक धनंजय दलाल यांनी, संचालन विजय डेकाटे यांनी तर आभार प्रा. एन.आर. राजपूत यांनी मानले. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस