शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्हीच झाले ‘नजरे’आड

By admin | Updated: March 2, 2017 00:19 IST

सुमारे पाच वर्षाआधी महात्म गांधी तंटामुक्त ग्राम समितीने मिळालेल्या पुरस्कार निधीअंतर्गत गावात विविध सामाजिक उपक्रम राबविले होते.

अडगळीत धूळखात पडले : अड्याळ ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाला पडला विसर विशाल रणदिवे अड्याळसुमारे पाच वर्षाआधी महात्म गांधी तंटामुक्त ग्राम समितीने मिळालेल्या पुरस्कार निधीअंतर्गत गावात विविध सामाजिक उपक्रम राबविले होते. त्यात बसस्थानकावर नागरिकांच्या सुरक्षेसाठी व पोलीस प्रशानाच्या दक्षतेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. वर्षभरापूर्वी बसस्थानक तसेच तेथील अतिक्रमण हटले आणी त्याच दिवशी ते दोन कॅमेरेही हटले. तेव्हापासून ते आजपर्यंत पुन्हा ते कुणालाही दिसलेच नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी असलेल्या कॅमेरा लावण्यावर कोणाची ‘नजर’ पोहचेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.महत्वाचे म्हणजे ते कॅमेरे आहेत कुठे? त्यावेळी कोणी काढले होते? आणि असतील तर आजपावेतो लागले का नाही? असा प्रश्न यावेळी ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.पवनी तालुक्यातील भंडारा ते चंद्रपूर या राज्य महामार्गावर वसलेल्या व जवळपास २० हजार लोकसंख्या असलेल्या अड्याळ बस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा पहिला मान व महाराष्ट्रात एकमेव स्तुत्य उपक्रम ठरला असल्याचा दावा तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी या सिसिटीव्ही कॅमेरा उद्घाटनप्रसंगी केला होता. तत्कालीन ठाणेदार प्रदिप सिरस्कर यांनी याकडे गांभीर्याने लक्ष ठेवले होते. कारण पोलीस स्टेशन मध्येच त्याचे रिमोट होते. यामुळे पोलिसांचे २४ तास लक्ष असायचे. यामुळे बसस्थानक परिसरात कोण कुठून येतो कुठे जातो. अप्रिय घटना घडलीच तर तात्काळ पोलीस यंत्रणा यायची अशी मोलाची मदत व्हायची. तत्कालीन ठाणेदार गेल्यानंतर डी. एम. गोंदळे त्यानंतर अजबराव नेवारे हे ठाणेदार म्हणून आले. पंरतु या विषयाला गंभीरतेने कुणी घेतलेच नाही. कारण गंभीरतेने घेतले असते तर कॅमेरे केव्हाचेच सुरु झाले असते.लावण्यात आलेले कॅमेरे दुरुस्त करण्याची जबाबदारी कोणाची असणार? ग्रामपंचायत की पोलीस प्रशासनाची? ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या हिताची राहू शकते. परंतु पोलीस प्रशासन ग्रामस्थांची सुरक्षा ही करते. मग बंद अवस्थ्ेत असणारे धुळखात पडलेले कॅमेरे लावणार कोण? पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून हे कॅमेरे कामात येतात पण याची जाणीव ठाणेदार अजबराव नेवारे यांना लवकर जर आली तर ग्रामस्थ व प्रवासी दोघांचीही सुरक्षा रामभरोसे न राहता त्यांचा फायदा पोलिसांनाही होईल यात काही शंका नाही. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या स्तुत्य उपक्रमामुळे येथील ठाणेदार व ग्रामस्थांचे कौतुक केले होते. आणि याचा सर्वाधिक लाभ पोलिसांनाच होणार म्हणून पोलीस स्टेशन मध्येच थेट प्रक्षेपन दिसत होते. मग जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. विनिता साहु व येथील ठाणेदार अजबराव नेवारे यांना याचा फायदा होणार नाही का? काढुन ठेवलेले कॅमेरे नेमके कुणाकडे आहेत याचा जेव्हा शोध घेण्यात आला, तेव्हा ग्रामपंचायत मधील त्यांचे साहित्य ठेवण्याच्या खोलीत ते धुळखात पडलेल्या स्थितीत आढळले. याविषयी मागील अनेक दिवसांपासून काढून ठेवलेल्या कॅमेराचा शोध घेणे सुरू होता. कॅमेरे लावणे म्हणजे श्रेय लाटण्याचा कार्यक्रम नसुन एक सामाजिक व सुरक्षेच्या दृष्टीने अती महत्वाची बाब असल्याची प्रतिक्रिया अतुल मुलकलवार यांनी व्यक्त केले. राजू रोहणकर, कमलेश जाधव, निरंजन देवईकर, प्रकाश मानापुरे यांनी कॅमेरा लावण्याची मागणी केली.सीसीटीव्ही कॅमेरामुळे पोलीस प्रशासनाला मदत आणि ग्रामस्थ व प्रवाशांच्या सुरक्षेच्या हेतुने हा उपक्रम राबविण्यात आला होता. पंरतु या संचाची देखभाल वेळेवर न झाल्याने बंद आहेत. हे संच त्वरित सुरु होणे ग्रामस्थ तसेच पोलीस प्रशासन दोघांचाही फायदा आहे.-रामकृष्ण कुर्झेकर, माजी तंटामुक्त समिती अध्यक्षअंदाजे १०,४०० रुपयांचा दुरुस्ती अंदाजपत्रक आला होत्क़ परंतु मध्येच बसस्थानक परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे तो विषय राहिला. समोर येणाऱ्या मासीक सभेत ठराव घेवून कॅमेरे लावण्यात येईल. याचा रिमोट कंट्रोल पोलीस स्टेशन येथेच देण्यात येईल.-एस ए. नागदेवे, ग्रामविकास अधिकारी, अड्याळहे बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे ग्रामपंचायतने सुरु करावे. त्यासाठी जी काही मदत लागेल त्यात आम्ही सहकार्य करु. कॅमेरे गावाच्या सुरक्षेसाठी महत्वाचे आहेत.-अजबराव नेवारे, ठाणेदार, पोलीस स्टेशन अड्याळ